tag:blogger.com,1999:blog-28101344434672878382024-02-21T14:36:03.045+05:30अनन्या!एक वेध...
मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा!
मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा,
उमलत्या,फुलत्या जाणिवांचा
मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा,
श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा,
गुणांचा,दुर्गुणांचा,
मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा,
दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा
हा एक वेध...!
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.comBlogger106125tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-55642338448751343662022-03-27T08:55:00.001+05:302022-03-27T08:55:58.472+05:30गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..<p dir="ltr" id="docs-internal-guid-86d20375-7fff-2294-a593-e743fb13e8c6">गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..</p><br><p dir="ltr">फेसबुकवरच्या विषयांना,लोकांना कंटाळून तरुण पिढी इंस्टाग्रामकडे वळली याबद्दल अनभिज्ञ असलेल्या अनेकांना कसेही असले तरी इथेच करमते कारण त्यांच्यासाठी तोच कम्फर्ट झोन आहे. लोक म्हटले की करमणूक आली तशी भांडणे,वादविवाद देखील आले. अलिकडेच एका परंपरावादी पोस्टवर केलेल्या मुक्त, वैचारिक कॉमेंटसाठी एका स्त्रीला अनेकांनी कॉर्नर केले. आपला मुद्दा लोकांना पटवण्याच्या नादात ती त्या वादात निष्कारण गुंतत गेली. तिला दूषणे देण्यात,नावे ठेवण्यात काही स्त्रियाही सहभागी होत्या. तिच्या वॉलवरच्या इतर पोस्ट्स,फोटोज 'उथळ' ठरवून त्या स्त्रीच्या चारित्र्यापर्यंतही मंडळी पोहोचली. विषय भांडणांपर्यंत वाढल्याचा संबंधित महिलेला प्रचंड मनस्ताप झाला. </p><p dir="ltr">अनेकांच्या मनोव्यापरांवर,जगण्यावर विपरित परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आज सोशलमीडियाच आहे. लोकांच्या विचार,भावनांना चालना देणारा,अभिव्यक्तीची प्रेरणा देणारा. असमान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा. शाळकरी मुलामुलींपासून कोणत्याही वयाच्या आणि चरितार्थासाठी कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी जोडणारा. विषयांचे ज्ञान आणि व्यासंग वाढवणारा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याची सोबत आहेच. </p><p dir="ltr"><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVd6kq0WxSNdq0u9I2lYlU0jNH30hUSD9rE36IJodIDtY-BQ02eadAj5DcUzRbSDPiRPKvtkJrUg1dpXV0mkLTLaSLS2NoWeFpFO87QGF2qA61_1HV7l4uBbR1kw1iRSs6jTcuwbBYnxY/s1600/1648351551724620-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVd6kq0WxSNdq0u9I2lYlU0jNH30hUSD9rE36IJodIDtY-BQ02eadAj5DcUzRbSDPiRPKvtkJrUg1dpXV0mkLTLaSLS2NoWeFpFO87QGF2qA61_1HV7l4uBbR1kw1iRSs6jTcuwbBYnxY/s1600/1648351551724620-0.png" width="400">
</a>
</div></p><div><br></div><p dir="ltr"><br></p><p dir="ltr">कित्येक सामाजिक,राजकीय,पारंपरिक,</p><p dir="ltr">कौटुंबिक आणि अनेकदा वैयक्तिक अगदी "आज भाजी काय करू" पासून अनेक सांसारिक,खाजगी प्रॉब्लेमची चर्चाही यावर लोक बिनधास्त करतात. यामुळे प्रत्यक्ष जगणे सोपे होणार असेल तर हरकत नाही. पण कित्येकदा इतरांच्या प्रतिक्रियांमुळे मूळ प्रश्नाला फाटे फुटलेले दिसतात. विषय सोडून लोक टीका आणि टिंगलटवाळीकडे झुकतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या चढाओढीत विषयांचे गांभीर्य निसटून जाते. परखड,प्रतिकूल प्रतिक्रिया केवळ विषयापुरती मर्यादित असू शकते, हा मोकळेपणा उरत नाही. लोक व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपात अडकतात. </p><p dir="ltr">मनातला एकटेपणा,अनिश्चितता यासाठी विरंगुळा म्हणून माध्यमे सहज उपलब्ध असतात. घराच्या सुरक्षित भितींमधून ऑनलाइन फेरफटक्याचे थ्रिल अनेकींना खुणावते. इतरांच्या खोट्या बोलण्याला,भूल-थापांना बळी पडून स्वतःच्या खाजगी गोष्टी,फोटो अनोळखी व्यक्तींशी शेअर करणाऱ्या आणि त्यानंतर आत्यंतिक मानसिक ताण,भीती,नैराश्येच्या चक्रात अडकणाऱ्या शालेय,कॉलेजवयीन मुली आणि महिलांची संख्या खरोखरच जास्त आहे.</p><p dir="ltr">एका संशोधनानुसार रोज जवळपास 40 टक्के लोक ऑनलाइन माध्यमांमधील हिंसेची शिकार होत असतात. यात महिला,मुलं आणि तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात आहेत.</p><p dir="ltr">मानसिक ताण असह्य होऊन आपल्या आयुष्याचा शेवट करणारेही यात आहेत. </p><p dir="ltr">माध्यमांचा वापर करणारे 73 टक्के लोक अशी हिंसा घडत असलेली बघणारे केवळ 'बघे' असतात. त्यांचा एक लाईकही अत्यंत धोकादायक ठरू शकतो.</p><p dir="ltr">फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर यावरच्या इन्स्टंट ज्ञानामुळे "सगळ्याच विषयातले सगळेच कळते" असे अनेकांना वाटते. कोणताही विषय खोलवर जाऊन समजून घेण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी आणि वेळ देण्याची मानसिकता नसते. सोशलमीडियाचा हा एक मोठा अडथळा सगळ्याच क्षेत्रात जाणवत असला तरी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकांना याचाच आधार वाटतो. मग बहुतेकवेळा माहिती अनेक विषयांची पण परिपूर्ण ज्ञान मात्र एकाचेही नाही असे चित्र दिसते. 'पेशन्स कमी असणे' वृत्तीही सर्वत्र वाढतांना दिसते आहे. आक्रमकपणे व्यक्त झालं तरच आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचतं हा अनुभव आज सगळीकडे येतो आहे.</p><p dir="ltr">सोशलमीडियाचा वापर योग्य पद्धतीने, जबाबदारीने करणे कोणाला माहीत नाही?</p><p dir="ltr">खरं सांगायचं तर बहुतेकांना नाही!</p><p dir="ltr">केवळ सवय म्हणून,नोटिफिकेशनचा रेडडॉट अस्वस्थ करतो म्हणून लोकांचे स्टेटसचेक करणाऱ्यांना आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागलेय मान्य नसते.</p><p dir="ltr">समाजकारण,राजकारण,अर्थकारण,देश-विदेशातील घडामोडी,वातावरण प्रत्येक विषयावर आपले मत मांडायला हवेच याचा अट्टाहास कशाला? लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंगही सार्वजनिक होतांना दिसतात. व्यक्तिस्वातंत्र्य संपून समूहात 'आपले','परके' गट तयार होतात. त्यातून प्रवास करणारा विशिष्ट समाजगट वैचारिकदृष्ट्या समृद्ध होण्याकडे नाही तर दिवसेंदिवस अधिकाधिक संकुचित होण्याकडे निघाला आहे.</p><p dir="ltr">यातल्या पुरुष आणि महिलांच्या प्रतिक्रिया वेगवेगळी मानसिकता दाखवतात.</p><p dir="ltr">धार्मिक,जातीय,राजकीय प्राधान्यक्रम घडवले जातात.</p><p dir="ltr">निकोप,निरीगी संवादाचे अनुभव मोजके असतात पण शाब्दिक चिमटे,बोचकारे पासून फटकारे आणि ताळतंत्र,भान सोडलेली भांडणे,मान-अपमान,रुसवे-फुगवे,तावातावाने अकाउंटच डिलिट करणे,पुन्हा परत येऊन त्याच चक्रात अडकणे यांचे नाट्य कमालीचे रंगलेले दिसते.</p><p dir="ltr">त्यात टार्गेट झालेल्या आणि केल्या गेलेल्या व्यक्ती कधीकधी आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी एखाद्या कंपूत,गटात असणे स्वीकारतात. कारण इथे मैत्रीबरोबर शत्रूत्त्वही सांभाळले,फुलवले,जोपासले जाते. </p><p dir="ltr">विशिष्ट गटातील स्त्रियांचा सांभाळ, खास दखल,अवाजवी स्तुतीच्या प्रतिक्रिया लक्षात येण्यासारख्या असतात. त्यातून स्पर्धा, एकमेकांत कुरघोडी निर्माण होतात. गटातील सुमारदेखील विचारवंत बनतात ते याच लोकांच्या मदतीने. इतरांना मदतीचा हात देणे हे कौतुकास्पद नक्कीच पण त्याचवेळी गटाबाहेरचा सकस विचारही जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. टीका करून, नाहक वाद घालून नाकारला जातो. समविचारी एकत्र येतात. काहींना घरबसल्या भावभावनांचा असा तीव्र रोलरकॉस्टर किक देतो. कोणाच्या अवास्तव मानसिक गरजा त्यातून भागतही असतील पण अनेकांच्या मनोशारीरिक आजारांचे कारणही हेच असते. </p><p dir="ltr">इथे एक गोष्ट आठवतेय,</p><p dir="ltr">मांजराची दहशत वाटणाऱ्या उंदराची दया येऊन एक जादूगार उंदराला मांजर बनवतो. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात येते की मांजराला कुत्र्याची भीती वाटतेय मग त्या उंदराचा कुत्रा होतो. आता कुत्र्याला बिबट्याची भीती वाटते, मग जादूगार उंदरालाच बिबट्या बनवतो. 'उंदीर आता सगळ्यात शक्तिमान' असं जादूगाराला वाटतंय तोवरच त्याच्या लक्षात येतं बिबट्या शिकऱ्याला,माणसांना घाबरतोय. शेवटी जादूगाराला समजतं की आपण उंदराला कोणीही बनवलं तरी त्याचं हृदय तर अखेर उंदराचंच असणार आहे! </p><p dir="ltr">अशी भल्याभल्यांचं रूपांतर कशाकशात करणारी जादू सोशलमीडियाकडेही आहे. </p><p dir="ltr">मग काय करायचं? ही माध्यमेच नाकारायची का? ते तर अशक्य आहे. पण मग निदान 'सुरक्षित वापर' करणे तर शक्य आहे?</p><p dir="ltr">आपलं मूळ म्हणजे हृदय,मेंदू माणसाचा आहे,हे कायम लक्षात ठेवायला हवं! </p><p dir="ltr">माणूस का श्रेष्ठ तर त्याच्याकडेच स्वतःसाठी 'योग्य निवड' करण्याची क्षमता आहे. </p><p dir="ltr">ती कशी समजेल? तर इतरांचे फोटो,पोस्ट्स बघतांना कळतनकळत त्यांच्या जगण्याशी आपण तुलना तर करत नाही ना यासाठी सतत जागरूक राहायला हवं. मनात येणारे विचार, सेल्फटॉक जाणीवपूर्वक तपासून बघायला हवा. </p><p dir="ltr">इतरांना मिळणारी लोकप्रियता आणि लाईक्स आपली गुणवत्ता कमी किंवा जास्त करू शकत नाहीत. हे त्यासाठी असणाऱ्या 'अस्वस्थ' मनाला कधीतरी सांगायला हवं. </p><p dir="ltr">एखाद्या पोस्टवरून किंवा प्रतिक्रियेवरून संपूर्ण व्यक्तीला महान बनवणे किंवा तिचा तिरस्कार करणे जितके आततायी तितकेच स्वतःला त्याबद्दल ग्रेट समजणेही धोकादायक आहे. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या कोणत्याही समस्येला जगातील दुसरा कोणीही कधीही तयार,रेडिमेड उत्तर देऊ शकणार नाही. कारण आपल्यापुढचे प्रश्नच वेगळे आहेत आणि त्यांची उत्तरेही आपली आपल्याच शोधावी लागणार आहेत. </p><p dir="ltr">पोलिसाने पकडू नये म्हणून हेल्मेट घालायचे,बेल्ट लावायचा की आपल्या सुरक्षेसाठी? याचे प्रामाणिक उत्तर ज्यांना माहीत आहे त्यांना समाजमाध्यमांचा वापर सुरक्षितपणे का करायचा हेही नक्की समजेल.</p><p dir="ltr">© डॉ अंजली औटी.</p><br><br><br><br><br>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-45669415859656281512021-06-08T13:08:00.001+05:302021-06-08T13:08:44.400+05:30#मानसआरोग्य डायरी 8<div>एकदा मनाने स्वीकारलं ना की काही दिवस,महिने, कदाचित अजून वर्षही हे असंच चालणार आहे की मग अचानक चष्म्यावरची धूळ पुसली गेल्यासारखं सगळं स्पष्ट दिसायला लागतं. </div><div>जगण्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा.</div><div>स्वतःच्या टिकून राहण्याच्या क्षमता वाढवण्यात सगळी जीवनऊर्जा वापरायला हवी.</div><div>रोजचा दिवस जसा उगवेल तसे आपण जगत जातो. आपल्यासाठी जगणं असतं फक्त पुढे पुढे जाणं. </div><div>ध्यानी मनी नसतांना आपली अनेक माणसं निघून गेली अचानक, विचारही नसेल आला त्यांच्या मनात की पुढचा पावसाळा,हिवाळा बघण्यासाठी असू आपण?</div><div><br></div><div>हे नुसतंच बघतोय आज आपल्या आजूबाजूला. मनातलं शहाणपण अजूनही डोळस होऊ नये?</div><div>भरभरून जगण्याचे क्षण जाणिवेतून पूर्ण निसटण्याआधीच जागं व्हायला हवंय.</div><div>जगण्याची मूल्य पुन्हा पुन्हा तपासायला हवीत.</div><div>कधीतरी आपणच संकुचित केलेल्या जाणिवेच्या कक्षा ओलांडून जगण्याकडे पुन्हा नव्याने बघायला हवं. </div><div><br></div><div>माझीतरी पूर्ण ओळख आहे मला? जग जाऊदे पण माझ्या माणसांची तरी किमान?</div><div>जगात कुठे काय चाललंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे,असेलही.. पण माझ्याच माणसांची प्रेमाची भाषा अनोळखी,अपरिचित राहून?</div><div>माहीत आहे का मला, काय आवडतं 'तिला' मनापासून आणि 'त्याला' दिलखुलास आनंद कशात मिळतो हे?</div><div>इतर सगळ्यांची भाषा समजते आणि तिच्या स्वरातली केवळ कटकटच का कानावर पडावी?</div><div>त्याच्या हाकांसाठी मनाची कवाडे बंद का असावीत?</div><div><br></div><div>मनातल्या असमाधानाचे रस्ते बाहेरच्या दिशेने वळत जातात आणि 'हे हवं','ते हवं' यांच्या शोधात स्वतःला विसरायला होतं.</div><div>आयुष्याचे क्षण तेवढे भुरुभुरु निसटून जातायेत. </div><div>निसटून जातं त्यातलं काहीच तर पुन्हा परत येत नाही.</div><div>अपयश,अवहेलना,असमाधान,दुःख हे समोर आलं की मनात नकोसेपण दाटून येतं.</div><div>'नकार'च जर मनभर घुमत असेल तर अजून काय होणार?</div><div>या भावना जाणवल्या की नाकारायच्या,आणखी त्यांचं काय करायचं हे कोणीच कसं कधी शिकवत नाही?</div><div>मला खूप राग येतो तो दुसरं कोणी आपल्याशी वाईट वागल्यावर.</div><div>वाईट वाटतं, ते दुसरा कोणी काही बोलला त्याचं.</div><div>जे काही आवडत नाही ते सगळं कायम दुसऱ्याच कोणामुळे.</div><div>ही दुसरी लोकं माझ्याशी प्रेमाने,आपुलकीने वागली तरच मला आवडेल, मग मी एकदम आनंदी. कोणी प्रश्न विचारायचे नाहीत,कोणी विरोध करायचा नाही,कोणी तक्रार करायची नाही. यापैकी काही केलं की माझं सगळंच बिघडणार. मला वैताग,राग,चिडचिड होणार.</div><div>का? याला मी नाही,दुसरे जबाबदार.</div><div><br></div><div>माझं वाटणं, माझ्या भावना माझ्या ताब्यात नाहीत? न आवडणारी परिस्थिती समोर आली तर तिला जीव तोडून विरोध करण्यात माझी सगळी शक्ती एकवटते. </div><div>लहानपणापासूनच मनाला काही आवडलं नाही तर त्याचा सामना कसा करायचा हे का नाही सांगत कोणी आपल्याला?</div><div>त्यांनाच माहीत नसेल का ते?</div><div><br></div><div>आजूबाजूला असलेला निसर्ग निःशब्दपणे सांगत असतो अनेक गोष्टी. </div><div>झाडांना,पक्षांना, प्राण्यांना तक्रारी करतांना, आरोप करतांना बघितलंय कोणी?</div><div>तुम्ही राहू दिलं तर ते तुमच्या आजूबाजूला आनंदात राहतात,नाही राहू दिलं तर निमूट बाजूला होतात. </div><div>"अपेक्षा नाही" हे जगण्यातलं साधं,सोपं तत्त्वज्ञान त्यांना कोण समजावतं?</div><div>त्यांना जो परिस्थितीचा स्वीकार आपसूक जमतो, समजतो,तो आपल्याला कसा नाही?</div><div>आपल्या आनंदासाठी आपण इतरांवर अवलंबून का? </div><div>परिस्थिती,संधी नेहमीच माझ्या मनाप्रमाणे,मला अनुकूल कशी असेल?</div><div>तशी ती नसेल तेव्हा संयमाने ती चांगली होण्याची वाट बघण्याचं आणि वाट बघतांना स्वतःची मानसिकता संभाळण्याचं,टिकून राहण्याचं कौशल्य माझं मला शिकायला हवं.</div><div>त्यासाठी माणसं वाचावी लागतील,निसर्ग समजून घ्यावा लागेल. प्रयत्नांनी दृष्टिकोन बदलावे लागतील. </div><div>समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट माणसं, परिस्थिती हे तिचं फक्त वरवरचं स्वरूप आहे.</div><div>माणसांच्या वागण्यामागे असलेलं त्यांचं मन आणि परिस्थितीच्या आत दडलेल्या कारणांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी विचार,भावना आणि कृतीत समतोल येईल इतका माझ्याच मनाचा शोध मला घ्यावा लागेल. </div><div>आज कडक,न सोसवणारे,चटके देणारे ऊन असेल तर हेदेखील टिकणारे नाही..बदलणार आहे हा माझ्या मनातला विश्वास मला टिकवून ठेवायला हवा.</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div># मानसआरोग्य डायरी 8</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPaAzVvxToP2pS4J4JIVbthL8q2biekZxCs4-aDgMEJ0QTqf8RbBvoRzhzWeYc3yZfWuq0phWLKN0SYC4OhCk_GMwIo2BJUpHbK-Ee8dKDr-p9Q3knd_nmMuf1tsagV6eANvuCOTaHIH4/s1600/1623137918019914-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPaAzVvxToP2pS4J4JIVbthL8q2biekZxCs4-aDgMEJ0QTqf8RbBvoRzhzWeYc3yZfWuq0phWLKN0SYC4OhCk_GMwIo2BJUpHbK-Ee8dKDr-p9Q3knd_nmMuf1tsagV6eANvuCOTaHIH4/s1600/1623137918019914-0.png" width="400">
</a>
</div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-64664549971857192132021-06-06T05:59:00.001+05:302021-06-06T05:59:25.074+05:30चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...<div>चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...</div><div><br></div><div>फेसबुकवरच्या ओळखीतून सुरवात होऊन आता आम्हाला एकमेकांविषयी इतकी ओढ वाटतेय की गेल्या दोन महिन्यांपासून त्याने अचानक माझ्याशी बोलणं थांबवलंय याचा मला आता प्रचंड त्रास होतोय. तो ऑनलाईन इतरांशी बोलतोय हे जाणवते मग माझ्याशीच का नाही? माझं सगळंच बिघडलंय,खूप दडपण,भीती वाटतेय. या अस्वस्थतेचं उत्तर त्याच्याकडे नाही, तुझ्याचकडे आहे हे लक्षात येण्यासाठी तिच्या अस्वस्थ मनाला किती वेळ लागेल?<br></div><div>तिच्यासारखीच अजून एक, प्रत्यक्ष एकदाही न भेटलेल्या आपल्या व्हर्चुअल मित्राला त्याने पाठवलेल्या व्यक्तीजवळ एक लाख रुपये कॅश सहजतेने देते आणि यात तिला रिस्क नाही तर निरपेक्ष प्रेमाची खात्री वाटते.</div><div>यासारख्या समस्यांमधल्या स्त्रिया भाबड्या,अनुनभवी,अशिक्षित असतात का? अजिबातच नाहीत. पण तरीही जाणता-अजाणता अनेकींच्या आयुष्यात डोकावणारी व्हर्चुअल नात्यांमुळे त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातला ताण वाढतांना दिसतोय.</div><div>भरपूर वेळ,श्रम आणि परीक्षा बघणाऱ्या खऱ्या नात्यांना न्याय देतांना मनात साचत गेलेले नकोसेपण,हतबलता,नकार,अवहेलना, भावनिक- मानसिक पोकळी या व्हर्चुअल नात्यांनी भरून निघते.</div><div>कधी केवळ वेळ चांगला जावा,विरंगुळा,चेंज मिळावा असेही अनेकींना वाटते.</div><div>वैचारिक देवाणघेवाण,मैत्रीचा हा ऑनलाईन अनुभव हवासा वाटतो. खऱ्या जगण्याला समांतर चालणारे आभासी जग आणि इतरांसोबत असलेले नातेसंबंध याचा मानसिक आधार वाटतो.</div><div>संवादाची सुरवात वैचारिक पातळीवर झाली तरी अनेकींच्या बाबतीत अशी नातीही आदिम शारीर प्रेरणांपर्यंतच येऊन पोहोचलेली दिसतात. </div><div>आभासी जगातल्या स्त्री-पुरुषांच्या मनातल्या मूळ गरजा, इच्छा,आकांक्षा,वासना स्वप्नं,प्रेरणा खऱ्या असतात. सामाजिक दडपणातून किंवा हिंमत नसल्यामुळे लपवलेल्या,दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली की हमखास वर येतात. एकमेकांचे खाजगीपण जपण्याची हमी मिळाली की अत्यंत उत्कटतेने,मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या या भावनांमध्ये गैर काय? असाही युक्तिवाद लोक करतात. </div><div>अनेकदा असे जाणवते की बहुतेक स्त्रियांची गरज मुख्यत्त्वे मोकळ्या मैत्रीची,सोबतीची असते. मैत्रिणींपेक्षा एखादा छानसा मित्रच तिला अधिक भावतो. कारण तो तिला उगीचच जज करत नाही, पावलोपावली टोकत, लेबल्स लावत नाही, तुलना,स्पर्धा यापलीकडे जाऊन तिला समजून घेऊ शकतो. स्त्रिया मनमोकळेपणाने असे नाते स्वीकारतांना दिसतात.</div><div>मनाचा ताबा घेणारी प्रेमासारखी प्रभावी भावना व्हर्चुअल जगात अधिक मोकळेपणाने व्यक्त केली जाते. जगण्याच्या संघर्षात 'प्रेम'अनुभवण्याचे निसटून गेलेल्या अनेकांना</div><div>आयुष्यात स्थैर्य आलं की एरवी लक्षातही न येणाऱ्या पोकळ्या जाणवायला लागतात. प्रेम ही मानवी मनाची अत्यंत मूलभूत गरज. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे किंवा आपण कोणावरतरी प्रेम करावे असे वाटण्यात वय हा मुद्दाच गौण ठरतो.</div><div>कोणत्याही वयात प्रेमात पडल्यावर व्यक्तीला सोळाव्या वर्षात आहोत असेच वाटते. प्रेमात फसण्यासाठी, अविवेकी वागण्यासाठीही वयाची अट नाही. एरवी अनुभवी, परिपक्व वाटणाऱ्या व्यक्तीही स्वतःच्या मनातल्या भावना ओळखण्यात,हाताळण्यात फसू,चुकू शकतात.</div><div>"दमलीस?" या एकाच शब्दावर अनेकींची सपशेल विकेट पडते. अजूनही आपण सुंदर,आकर्षक दिसतो, या सुखवणाऱ्या भावनेतही अडकायला होते. मनावर फिरलेले प्रेमाचे मोरपीस जगणे सुंदर,रंगीबेरंगी करून टाकते. त्यासाठी आभासी माध्यमांचा अत्यंत कल्पक वापर अनेकांकडून केला जातो. वयाच्या पस्तिशीनंतर काही कारणांनी मनातून एकट्या पडलेल्या स्त्रिया या भूल-भुलैय्यात जोरदार अडकतात. </div><div>नवख्या,अनुनभवी स्त्रियांना तर हे संपूर्ण जगच मोहात पाडते. यातली मजा आणि थ्रिल अनुभवण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय मात्र त्यांचाच असतो.</div><div>सोशलमाध्यमांपासून सुरू झालेली मैत्री खाजगी होऊन आपली माहिती,नंबर,फोटो,व्हिडीओ यांचीही देवाणघेवाण होते. एरवी शारीरिक गरजेचा उच्चार, स्वीकार आणि उघड अपेक्षा करणे यासाठी समाज आणि परंपरांची बंधने व्यक्तींवर असतात. समाज म्हणून ती गरजेचीही आहेत परंतु बंधने, नियम जितके कठोर तितक्याच पळवाटाही मग शोधल्या जातात. आपल्या सामाजिक धारणेनुसार पकडला गेलेलाच गुन्हेगार ठरतो,आणि काही उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळेच साव असतात,सगळीच कृत्ये नैतिक असतात.</div><div>एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक दावे, छातीठोक विधाने केली जातात. मग या नाही तर त्या निमित्ताने बोलण्यातले वैचारिक विषय वैषयिक होत जातात. सेक्सविषयीच्या व्यक्तिगत आवडीनिवडींबद्दलही बोलले जाते.</div><div>सेक्सटिंगचा अनुभवही एकदम वेगळा,उत्तेजक वाटतो.</div><div>एकमेकांवरच्या विश्वासाची हमी कायम टिकली तर गुपचूप आणि स्वखुशीने इथे अनेक ऑनलाईन मनोव्यापार चालतात. </div><div>प्रत्यक्षात काही करत नसल्यामुळे यात कोणाची फसवणूक,प्रतारणा नाही,असा मनाचा समज असतो.</div><div>कोणी आनंद कशातून मिळवावा, ही प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक गोष्ट. जोपर्यंत मर्यादा ओलांडली जाऊन कोणाला त्रास झाला नाही तर तो टिकतो सुद्धा. पण अनेक केसेसमध्ये ही मर्यादा ओलांडली जाते आणि व्हर्चुअल नात्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यात गोंधळ,</div><div>भांडणे,गुंतागुंत,समस्या निर्माण होतात. </div><div>आभासी जगातील दुःख,वेदना तर काही आभासी नसतात, खऱ्याखुऱ्या असतात. तोंड दाबून सहन कराव्या लागतात. प्रत्यक्ष आणि आभासी मधला तोल सावरण्यापलिकडे गेला की मनाचा बांध वेडावाकडा फुटतो. त्यामुळे आत्यंतिक मानसिक,शारीरिक ताणाला सामोरे जावे लागून अनेकांना त्यातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. </div><div>अनुभवी, शहाणी माणसे मोठ्या वयातही का फसतात? याची कारणेही वेगवेगळी असतात. </div><div>एकच कारण मात्र सगळ्यांमध्ये समान दिसते ते म्हणजे करतांना सगळे कळत असले तरी वेळेवर ते वळत अजिबात नाही. म्हणून आपण फसलो असे कितीही म्हटले तरी तीदेखील स्वतःच स्वतःसाठी केलेली निवड होती,याचा विसर पडतो.</div><div>एखाद्याच्या मैत्रीआड असलेले छुपे हेतू अनेकींच्या लक्षात फसल्यावरच येतात. </div><div>असे फसणे केवळ शारीरिकच नसते तर अनेक प्रकरणांमध्ये स्त्रिया स्वतःचे फार मानसिक अवमूल्यन करून घेतात. </div><div>यातल्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे आणि मागे फिरणे शक्य असते पण 'आभासी'मधली जबरदस्त किक मोहात पाडते. माणूस आपल्याच सवयींच्या जाळ्यात अडकतो,आवड व्यसनात बदलते.</div><div>प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तीचे हेतू वाईट,फसवण्याचेच असतात असेही नसते. </div><div>मन भरल्यांनंतर त्यांनी फक्त सहजतेने गीअर चेंज केलेला असू शकतो. मूळ गरजच नात्यांचे वैविध्य असू शकते. कोणी आपल्याशी सतत बोलायलाच हवे यात अवास्तव मागणी आहे,हट्ट आहे.</div><div>अनेकांच्या आयुष्यात अनेक संघर्ष,वेदना असू शकतात. त्यांच्या गरजा त्याप्रमाणे बदलत जातात. म्हणून अमूक एक 'चांगले म्हणून नैतिक आणि अमूक एक 'वाईट' म्हणून अनैतिक असा ठोकळेबंद विचार ना लोकांच्या बाबतीत करता येत ना त्यांच्या वागण्याच्या बाबतीत करता येत. </div><div>सगळे वाईट अनुभव फक्त स्त्रियांनाच येतात, असेही अजिबातच नाही. पण स्त्रिया यासारख्या अनुभवांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भरडल्या जातात. स्त्रियांसाठी असलेली पारंपरिक सामाजिक चौकट अजूनही आखीव, पुरुषधार्जिणी आहे.</div><div>काही घडले तर पुरुष सहज सुटका करून घेतात आणि त्यातला दोष बऱ्याचदा स्त्रियांकडे येतो. स्त्रियांचे वागणे,बोलणे, दिसणे,कपडे घालणे यावर लगेचच टीकात्मक बोलले जाते. स्त्रियांचा अपमान,नुकसान झाले अशा प्रसंगातही दोष,वाभाडे अनेकदा तिचेच काढले जातात. </div><div>खरंतर मुद्दा स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असा नसतोच,नाहीही.</div><div>मुद्दा आहे आपल्याच मनातल्या भावनांचे आणि विचारांचे योग्य नियोजन करू न शकण्याचा. विचार आणि कृती यांचे भान येण्यासाठी मनातला विवेक जागा हवा. </div><div>स्वतःच्याच भावनांची योग्य जाण आणि भानही हवे. त्यांची पूर्तता करण्याचे रास्त पर्याय ओळखायला हवेत.</div><div>कारण आपली समज, बुद्धी वाढवणारे आणि अनुभवांच्या कक्षा विस्तारणारे अनुभव येथेही येऊ शकतात. आभासी जगही खऱ्या माणसांच्याच भावभावनांवर स्पंदणारे आहे. कधी इथे जीवलग मित्र-मैत्रिणी मिळतात तर कधी कोणतेही नाव नसलेले पण मैत्रीपलीकडचे भाव मनात उमलवणारे सुंदर,उस्फुर्त नातेही जोडले जाते. एकमेकांची स्पेस सांभाळून आधार,आनंद देण्याइतके ते समंजस आणि शहाणेही असू शकते. वैचारिक,भावनिक आणि मानसिक पोषण करण्याइतकी निरोगी, एकमेकांची वाढ करणाऱ्या चर्चा,संवाद त्यात घडू शकतो. मनाची माती सुदृढ,सुपीक, सक्षम बनत जाते. </div><div>अशा नात्यांना मुद्दाम इतरांपासून लपून राहण्याची,खाजगीपण सांभाळण्याची गरज नसते आणि मुद्दाम स्वतःची जाहिरात करत मिरवण्याचीही गरज नसते. असं मैत्र,प्रेम असलेलं कोणी असणं आणि मिळणं हा आयुष्याकडून मिळालेला सगळ्यात अनमोल खजिना असू शकतो, पण तो मिळाला नाही तरी आपल्या आजूबाजूचे प्रत्यक्ष किंवा आभासी जग आणि त्यातली वेगवेगळ्या चेहऱ्या-मुखवट्यांनी वावरणारी माणसे ओळखण्याइतकी आधी आपण आपल्या स्वतःशीच मैत्री तरी नक्कीच करू शकतो?</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div><br></div><div>मनःपूर्वक आभार दैनिक म.टा.'मैफल पुरवणी'<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbSA1xjqeT71pPkb79uF7CQmmF_RlVjEvyUDTSyaJU1NBVoBDRQoGYyaMD1aGOPN5UNhDsGQb25xp1V6UW8mxeD-kNtkHHmoYwhk3uYW9fZXMJ0GvGHCHIvuwU4wwnJdA4ZEKanV5h_Vs/s1600/1622939312636041-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbSA1xjqeT71pPkb79uF7CQmmF_RlVjEvyUDTSyaJU1NBVoBDRQoGYyaMD1aGOPN5UNhDsGQb25xp1V6UW8mxeD-kNtkHHmoYwhk3uYW9fZXMJ0GvGHCHIvuwU4wwnJdA4ZEKanV5h_Vs/s1600/1622939312636041-0.png" width="400">
</a>
</div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHMOA9cTYPLL3wp5xnqKAcoFt_hs_XdVVVHgj3Nx3kfN0qWr_5j7DHUv4deO9A333LqQxQf70shXcfOtEnt4_xUyzd8fm0d_6Hly9SJGV12M7vl3IMlYlvBod-scV10guUTAOXzO0T6Iw/s1600/1622939296000731-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHMOA9cTYPLL3wp5xnqKAcoFt_hs_XdVVVHgj3Nx3kfN0qWr_5j7DHUv4deO9A333LqQxQf70shXcfOtEnt4_xUyzd8fm0d_6Hly9SJGV12M7vl3IMlYlvBod-scV10guUTAOXzO0T6Iw/s1600/1622939296000731-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-7359323317090869962021-05-03T18:22:00.001+05:302021-05-03T18:22:14.712+05:30# मानसआरोग्य डायरी 7<div>आपले शरीर काहीतरी बिनसले आहे याची सूचना अचूक देते.</div><div>करोनाची लक्षणे दिसल्यावर पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे. लक्षण वेळेत ओळखणे हे लवकर बरे होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. </div><div>आपली लक्षणे नाकारणे,दुसऱ्याच कशाचे आहे असे समजणे,त्यावर स्वतःच घरगुती औषध घेणे,इतरांपासून लपवणे हे सगळं करून आपण स्वतःला खूप मोठ्या धोक्यात टाकतोय </div><div>आणि आपल्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त असते.</div><div>"एखादी क्रोसीन घेतली की बरं वाटेल" असं स्वतःच ठरवू नये.आजार वाढल्याशिवाय डॉक्टरांची गरज नाही, हा अनेकांचा समज असतो. नैसर्गिकपणे बरे होण्यासाठी शरीराला अवधी दिला पाहिजे हा विचार करोनाबाबतीत केला तर लक्षात ठेवा हा आजार दिवसागणिक उग्र रूप धारण करतो. थेट जीवाशी गाठ आहे.</div><div>मायनर लक्षणे आहेत म्हणून घरीच बसू नका.</div><div>लहानात लहान लक्षणेही दुर्लक्षित करू नये.</div><div><br></div><div>करोना इतर शारीरिक आजारांपेक्षा वेगळा आहे. पाहिले लक्षण दिसल्यावर लगेच त्यावर उपचारांना सुरुवात नाही झाली तर ते विषाणू शरीरात दुप्पट वेगाने वाढत जातात. </div><div>सुरवातीला पहिल्या दिवशी नाक,तोंड,घसा यांच्या आतल्या भागात असलेले विषाणू तिसऱ्या दिवशी श्वासनलिकेमार्गे फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतात. </div><div>करोनाचे पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे.</div><div>डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घेणे महत्त्वाचे.</div><div>त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करणे गरजेचे.</div><div>करोनावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांशिवाय इतर कोणतीही औषधे, सल्ला शक्यतो मनाने घेऊ नये. काही औषधे सोबत चालू शकतील.</div><div>केवळ घरगुती उपचारांनी करोना बरा होत नाही.</div><div>प्रत्येकाची immunity वेगळी असते आणि शरीराचा response ही वेगळा असतो. </div><div>लक्षणेही वेगळी असू शकतात किंवा </div><div>काहीही लक्षण नसतांना दुसऱ्या कारणासाठी केलेली टेस्ट कधी positive येऊ शकते.</div><div>तरीही डॉक्टरांच्या संपर्कात असावे. </div><div>टेस्ट्स खोट्या positive आणल्या जातात. यात डॉक्टर आणि इतर यंत्रणा सामील आहेत हे सगळे पैसे मिळवण्यासाठी कोणी करतंय या भ्रमात मुळीच राहू नये,अंगाशी येईल.</div><div><br></div><div>डॉक्टरांना आता करोनाच्या लक्षणांचा चांगला अंदाज आल्यामुळे लक्षणं दिसल्यावर लगेच,कधी तर टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वीच डॉक्टर औषधे सुरू करतात ते पुढचे सगळे धोके टाळण्यासाठी.</div><div>तुमच्या भल्यासाठी.</div><div><br></div><div> "डॉक्टर रिपोर्ट काय येतो बघू ना,मग ठरवू" हे म्हणणे म्हणजे आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणे आहे. त्यांचं न ऐकण्यात आपले भरून न येणारे नुकसान आहे.</div><div>जास्तीतजास्त काय होईल?</div><div>समजा तुमचा रिपोर्ट 'करोना नाही' असा आला तर तुमच्या पोटात तोपर्यंत औषधांचे एक किंवा दोन डोस गेलेले असतील. एकवेळ ते परवडले पण करोना लक्षणे वाढायला नको. </div><div>कारण जर 'करोना आहे' म्हणून रिपोर्ट आला तर तोपर्यंत या औषधांची मदत विषाणूंची वाढ खूप मोठ्या प्रमाणात रोखते. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आपल्याच निष्काळजीपणाने किंवा अज्ञाना मुळे चुकल्यामुळे अनेकांना आत्तापर्यंत त्याचा खूप जास्त त्रास भोगावा लागला आहे.</div><div><br></div><div>पाचव्या दिवशी ठरते आपला आजार वाढणार की आपल्याला बरे वाटणार.</div><div>पहिल्या 3 दिवसात काहीही कारणांनी आपण उपचार सुरू करायला उशीर केला तर साधारण 3,4 व 5 या दिवसांमध्ये करोना विषाणूंचा प्रवास फुफ्फुसापर्यंत होऊन न्यूमोनियाची लक्षणे म्हणजे खोकल्यात वाढ ,ढास, धाप लागणे, ताप 101पेक्षा जास्त वाढायला लागणे आणि रक्तातील CRP चे प्रमाण अचानक वाढणे असे काही झाले तर मात्र आपल्याला हॉस्पिटलला admit होऊनच उपचार घ्यावे लागतात. असे करणे टाळू नये. ज्यांना हे उपचार वेळेत मिळाले त्यांचा जीव वाचण्याची शक्यता पण खूप जास्त आहे. अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.</div><div>ज्यांनी याला देखील उशीर केला किंवा इतर काही कारणांनी उदा.पूर्वीचे गंभीर आजार त्या लोकांचा या लढाईत दुर्दैवी अंत झाला.</div><div>योग्य आणि वेळेत उपचार घेतले तर अनेक पेशंटमध्ये 5 ते 7 दिवसानंतर लक्षणे कमी व्हायला सुरुवात होते. काही कारणांनी Complications वाढायला लागली तरी याच दिवसानंतर वाढतात. म्हणून लक्षणांच्या बाबतीत सावध असावे.</div><div>करोना झाल्यावर पहिला,तिसरा आणि पाचवा आणि सातवा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.</div><div>अशा कितीतरी घटना आपण आजपर्यंय अनुभवलेल्या आहेत. अनेक जवळच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी,ओळखीच्या अगदी तरुण लोकांनीही काही कारणांनी treatment घ्यायला उशीर केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडलेली आपण बघितलंय.</div><div>आपण आपल्या हाताने त्रासात भर घालतो, असे होऊ देऊ नये. आजार होणे आपल्या हातात नसते पण घाबरून न जाता योग्य उपचार करणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.</div><div>वेळेत उपचार झाले तर हा आजार वेळेत आटोक्यात येतो हे मी स्वतः माझ्या मुलाच्या अनुभवातून सांगते आहे. त्याचे पाहिले लक्षण ताप हे होते. रात्री अडीच वाजता त्याला ताप आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या सगळ्यांच्या टेस्टस केल्या आणि त्याचे रिपोर्ट्स मिळण्याआधीच सगळी औषधं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केलेली होती. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी positive आला त्यावेळी त्याच्या पोटात औषधांचा तिसरा डोस गेलेला होता. </div><div>त्यानंतर त्याला पुन्हा फारसा ताप आला नाही पण तिसऱ्या दिवशी थोडा खोकला यायला लागला, औषधे,Isolation आणि योग्य काळजी यामुळे तो खोकलाही फार वाढला नाही. मात्र औषधांमुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढला आणि दोन्ही डोळे लाल झाले पण डोळ्यांच्या डॉक्टरांना व्यवस्थित फोटो काढून पाठवल्यावर त्यांनी दिलेल्या औषधांनी 2 दिवसात ती लक्षणे कमी झाली. </div><div>दहा दिवसात करोनाची सगळी लक्षणं हळूहळू संपली. 14 व्या दिवशी तर सगळे काही नॉर्मल होते आणि isolation ही संपले.</div><div>त्यांनतर आलेला थोडा अशक्तपणा आता महिन्याभरात भरून येईल. </div><div>आजार नीट समजून घेणे आणि वेळेवर अचूक निर्णय घेणे या गोष्टी आपल्या नक्की हातात आहेत. नुसतेच घाबरण्यापेक्षा आपण हे समजून घ्यायला हवे.</div><div>आजाराचं स्वरूप न समजता आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या,निर्णय घेणाऱ्या लोकांचं कोणीही काहीही करू शकत नाही.</div><div>अजून सगळ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेली नाही. त्यांनतर कदाचित आपल्याला करोना झाला तरी त्रास कमी होईल,निदान जीव जाणार नाही. पण तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.</div><div>करोना झाल्यांनातर प्रत्येक क्षण आणि दिवस महत्त्वाचा आहे. </div><div>वेळेत निदान,सकारात्मक मानसिकता आणि योग्य उपचार ही करोनातून वाचण्याची त्रिसूत्री आहे. लक्षात ठेवा, सावध तो सुखी.</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF8UwVn3nTnlcyf8zMeOkQ2Ax-b-WnLe-rU9LzluMO2FAw1Il-VEbqYQ4jNZ-iQIH2tJ7A5dClRIioIgEpbXwzgQiX9qHmA1QJIL30rkVmLlMRxd7i5GBSQf5_qiyLHoj0qElWc2ujM2w/s1600/1620046328341741-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF8UwVn3nTnlcyf8zMeOkQ2Ax-b-WnLe-rU9LzluMO2FAw1Il-VEbqYQ4jNZ-iQIH2tJ7A5dClRIioIgEpbXwzgQiX9qHmA1QJIL30rkVmLlMRxd7i5GBSQf5_qiyLHoj0qElWc2ujM2w/s1600/1620046328341741-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwMphmR352mZPRgVFhN0dbHa5G1RRr8mvVTh7OMVdeE2F16hl2Aoegw_tDyoZg1y_zyGQwmmYL5nrtNzoyjCIy4dSUkVEE6vZA9jgI0QbzwQTwrnc41aSz7Ruv1_I7LS5_VyuJbbF8hcM/s1600/1620046323954098-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwMphmR352mZPRgVFhN0dbHa5G1RRr8mvVTh7OMVdeE2F16hl2Aoegw_tDyoZg1y_zyGQwmmYL5nrtNzoyjCIy4dSUkVEE6vZA9jgI0QbzwQTwrnc41aSz7Ruv1_I7LS5_VyuJbbF8hcM/s1600/1620046323954098-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-26739735343599534002021-05-01T19:31:00.001+05:302021-05-01T19:31:47.060+05:30आभासी दुनियेतल्या वास्तव भावना<div><br></div><div><br></div><div>आभासी दुनियेतल्या वास्तव भावना<br></div><div><br></div><div>फेसबुकवर तावातावाने एकमेकींशी भांडणाऱ्या त्या दोन स्त्रियांच्या भांडणात हळूहळू इतर अनेकांची गर्दी वाढली. काही हिचे समर्थक,काही तिचे. विषय काही फार मोठा नव्हता. कोणीतरी लिहिलेला मूळ लेख तर बाजूलाच राहिला आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये भलत्या दोघींचीच जुंपली. बरं दोघीही आपापल्या क्षेत्रातल्या चांगल्या हुशार बायका. कोणीतरी मध्यस्थी करून शेवटी तो वाद मिटवला पण त्यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. सतत एकमेकींच्या विचारांवर, मतांवर केलेली कुरघोडी. काहींनी दुर्लक्ष केले,काहींनी मजा घेतली,काहींनी खिल्लीपण उडवली. पण त्या दोघी? त्यांची खुमखुमी कशानेच कमी झाली नाही. आता तर लोकांना सवय झाल्यासारखं झालंय.</div><div>हे सगळं आठवायचं कारण परवा एका श्रध्दांजलीच्या कॉमेंटमध्ये वाचलेली एक कॉमेंट.</div><div>या बाईंनी म्हणे जी स्त्री गेली तिला काही वर्षांपूर्वी झालेल्या भांडणांमुळे फेसबुकवर ब्लॉक केलं होतं. आज तिला त्याचा पश्चाताप होत होता जो ती जाहीरपणे सांगून स्वतःला तिची अपराधी वगैरे समजत होती. तिला श्रद्धांजली वाहता वाहता आता पब्लिक हिचीही खऱ्या खऱ्या आपुलकीने समजूत काढत होतं.</div><div>अंतरजालावरचं हे जग मायावी,भासमान आणि खोटं आहे असं कोणी कितीही म्हणो, इथे वावरणाऱ्या अनेकांच्या मनात दाटून येणाऱ्या वेगवेगळ्या भावनाही आभासी आहेत असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. यात स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी पुरुषही काही मागे नाहीत.</div><div>विद्वान आणि शहाणीसुरती लोकं कसं काय गुंततात यात इतकं? आभासी विश्वातला मानसिक ताण असह्य होऊन मदत घ्यावी लागल्याची उदाहरणे अनेक आहेत.</div><div>खरे आयुष्य आणि आभासी विश्वातील स्वतःची प्रयत्नांनी उभी केलेली प्रतिमा यांच्यात अनेकांच्या बाबतीत अंतर्विरोध असू शकतो. </div><div>याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनातला सतत चाललेला सेल्फटॉक. प्रतिक्रिया कधी उघड तर कधी दडपलेली,दबलेली.</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhIok_YkoAZnibJWh2_l38G1kNwtfGjDSnpwjhdRTPQxykq6C8AmHpAyYqEdzQtExORHEDrNz2n1AbdzFsIeQK1RVjALl13X3du45DVC_20Y9tRXexkUkmZQp3L3Iig8DFATavjUTrHPv4/s1600/1619877703208128-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhIok_YkoAZnibJWh2_l38G1kNwtfGjDSnpwjhdRTPQxykq6C8AmHpAyYqEdzQtExORHEDrNz2n1AbdzFsIeQK1RVjALl13X3du45DVC_20Y9tRXexkUkmZQp3L3Iig8DFATavjUTrHPv4/s1600/1619877703208128-0.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div><div>प्रत्यक्ष जगणे जास्त आव्हानांनी भरलेले आहे. त्यासाठी कधी क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यातच दमणूक होते. कुटुंब,नातेवाईक,समाज यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःसाठी काही करायचे राहून जाते.</div><div>उत्सुकता आणि विरंगुळा,विसावा म्हणून वापरायला लागलेल्या सोशल मीडियात 'आपण खरेच कसे आहोत' हे इतरांना समजण्याची गरज नसते. आपली मतं आणि आवडीनिवडी सारख्या असलेल्या लोकांशी कुठल्याही मानसिक,भावनिक अपेक्षांशिवाय संवाद साधता येतो याचाच आधी मोठा रिलीफ वाटतो. </div><div>प्रत्यक्ष आयुष्यातल्या व्यक्तींशी समोरासमोर सुसंवाद साधण्यापेक्षा ज्यांना आपण पूर्णपणे माहीत नाही अशा व्यक्तींशी संवाद साधणे आवडायला लागते.</div><div>अनेकांना लोकांच्या जजमेंट्सची, त्यांच्या टीकेची भीती मनात असते. त्यामानाने सोशलमीडियात चांगुलपणा टिकवून राहणे आणि वेगवेगळ्या लोकांशी मैत्री करणे सोपे जाते. माहितीही खूप मिळते आणि करमणूकही भरपूर होते.</div><div>हळूहळू रोजच्या संबंधांमधून आभासी विश्वातही समविचारी लोकांचे निरनिराळे गट तयार होतात आणि यात एकमेकांना सावरून घेत,मोठे करत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र मजेत वेळ घालवता येतो. असेही कितीतरी गट इथे वावरत असतात. </div><div>नुसतेच 'हे वाईट', 'ते वाईट' म्हणून चालणार नाहीत,नाहीतर कोल्ह्याला द्राक्ष आंबट,असे होते. </div><div>एकटेपणाचा सोबती म्हणून आभासी विश्वातील मित्रमैत्रिणीचा आधार वाटतो, त्यांच्याशी रोज बोलण्याने समाधान मिळते. त्यातल्या मर्यादा माहीत असूनही काहीजण मिळेल त्यात समाधान शोधतात.</div><div>खरोखरच विवेकीपणे उपयोग करून घेतला तर ही वेगवेगळी सोशलमाध्यमे जगण्यातल्या आनंदाच्या आणि सुसंवादाच्या असंख्य शक्यता माणसांपुढे उभ्या करण्याची क्षमता बाळगून आहेत.</div><div>त्यातून किती घ्यायचे,काय घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे हे प्रत्येकाने आपल्या गरजेच्या सीमारेषा आखून ठरवावे. ही लक्ष्मणरेषा बुद्धीला जरी लवकर समजली तरी अनेकांकडून आखलेली सीमा कधीतरी ओलांडली जाते कारण त्यांनाही पुढे धावणारा मोहक कांचनमृग दिसत असतो.</div><div><br></div><div>मग या आभासी जगात जाणवणाऱ्या भावना खऱ्या कशा? </div><div>तर कांचनमृग जरी मायावी असला तरी त्याचा वाटणारा मोह ही भूल खऱ्या मनाला पडलेली असते. </div><div>त्याला मिळवण्यासाठी केलेली धडपड,आगपाखड खरी असते. </div><div>लोकं विशेषतः काही स्त्रिया यात जास्त अडकतात. त्यांचे स्वतःचे जगण्यातले अपुरेपण, येणाऱ्या अनुभवांबद्दल असमाधान,खदखद,दबलेल्या उर्मी त्यांना त्या दिशेने खेचत नेतात. </div><div>तुलनेचा राक्षस मनावर राज्य करत असतोच.</div><div>"भला तेरी सारी मेरी सारीसे सफ़ेद कैसे?"याचा भुंगा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग कधीतरी अशी वेळ येते की सोशल माध्यमांवरील या सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वॉलकडे पाठ फिरवून एकमेकींनाच ब्लॉक करतात. इतक्यावरच हे थांबत नाही घडलेल्या गोष्टींबद्दलची जखम त्यांच्या मनात सतत ठसठसत राहू शकते.</div><div>आभासी विश्वातले पाच "अ"</div><div>म्हणजे अवास्तव विचार,अतिरंजित वर्णन, अविवेकी धारणा, अपूर्ण ज्ञान आणि अंतहीन स्पर्धा आपण ओळखू शकलो तर आपल्याला सीमारेषाही ओळखू येईल. त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला हवा आपला दृष्टिकोन. आपले मूळ हेतू विसरले की माणसं असमाधानाच्या चक्रात अडकतात. बरोबरी करायला जातात. माझ्या फोटोवर,लिहिलेल्या मजकूरावर कमी लाईक्स आणि मी मात्र इतर सगळ्यांची दखल घ्यायची? मनात इर्षा,स्पर्धा निर्माण होते. दुर्लक्ष केल्यासारखे दाखवून लपूनछपून पहारा ठेवणे येते, त्यातून टोमणे मारणे होते,कान भरणे, भरवणे होते. रुसवे-फुगवे होतात. आणि इथल्या मैत्रीत कधी भांडणंदेखील होतात. त्यातून ब्लॉक केले जाते. </div><div>समोरच्याला याचा काहीच पत्ताही नसतो. कारण मुळात इतरांचा तुमच्या काहीही वाटण्याशी संबंधच नसतो. </div><div>या दुहेरी जगण्याचा ताण असह्य होऊन लोकं प्रत्यक्ष आयुष्यात बिथरल्यासारखी वागतात. कशातच चित्त न लागणं,वारंवार मोबाईल तपासून बघणं, उगीचच दडपण जाणवणं, काय खातो-पितो,करतोय याकडे लक्ष नसणं असे त्रास झाले की संपूर्ण घर अस्वस्थ होऊन जातं. कोणत्याच जगाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेली लोकं एकटी,एकाकी होऊन जातात,जगण्याचा आनंद गमावून बसतात.</div><div>समस्या प्रत्यक्ष आयुष्यातली असो वा आभासी आयुष्यातली त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत आपण स्वतःशी बोलत असलेली वाक्ये तपासून बघायला हवीत. मनातल्या अविवेकी धारणा आणि दृष्टिकोन तपासून बघायला हवेत. </div><div>प्रत्यक्ष आणि आभासी यांचा अनुभव घेणारे मन पुरेसे सजग असेल तर तारतम्य बाळगून स्वतःच्या आनंदासाठी कधी कशाची निवड करण्याची हे आपले आपण ठरवू शकतो.</div><div>जगण्यातल्या रिकाम्या जागा नक्कीच भरायला हव्यात पण मायावी मृगजळामागे धावण्यात नाही तर स्वतःसाठी आनंदाच्या दिशांचा शोध घेण्यासाठी.</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqEm8JZLgEpPTn428hKchztf6H7GnIlWSzyH-1bKXMrnVyomZsKREbKCC8qMLme0RYrVY0DbZzEdoe9X-SyUumfMXDDeumRQ_4s_-AlZLTuJkkFlngC7RgcSfxEEih6fQNE9kbz5gtjf4/s1600/1619877700170672-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqEm8JZLgEpPTn428hKchztf6H7GnIlWSzyH-1bKXMrnVyomZsKREbKCC8qMLme0RYrVY0DbZzEdoe9X-SyUumfMXDDeumRQ_4s_-AlZLTuJkkFlngC7RgcSfxEEih6fQNE9kbz5gtjf4/s1600/1619877700170672-1.png" width="400">
</a>
</div># महाराष्ट्र टाईम्स 'मैफल' पुरवणी<br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-73517957337098064122021-04-29T09:42:00.001+05:302021-04-29T09:42:36.779+05:30# मानसआरोग्य डायरी 6<div>एकवेळ मला काही झालं तरी चालेल पण घरातल्या इतर कोणालाच काहीही त्रास होऊ नये,असं उगीच आपलं आपल्या मनाला वाटत असतं. यामागे लॉजिक काय?</div><div>तर त्यांना आपल्याला काही होतंय हे पटकन समजणार नाही😎</div><div>खरंतर अगदी सहज गप्पांच्या ओघात घरातल्यांच्या शारीरिक,मानसिक स्वस्थतेबद्दल आपल्याला रोजच्या रोज विचारून खात्री करून घेता येईल. </div><div>याउलट होतं काय की अतिकाळजीपोटी अनेकदा आपल्या नकळत त्यांना नुसत्या काळजी घेण्याविषयी सूचनाच दिल्या जातात,जाब विचारले जातात आणि तेही झाडाझडती घेतल्याच्या अविर्भावात. उदा. स्वच्छतेबद्दल, कुठे जाण्या-येण्याबद्दल.</div><div>ऐकणाऱ्याला कधीकधी त्या इतक्या त्रासदायक होतात आणि वैतागल्यासारखं होतं कारण आता वर्ष झालं त्यांनाही त्या ऐकून ऐकून😊</div><div>तुम्हाला वाटेल इतकं कानीकपाळी ओरडलं तरी कोणी ऐकतंय का?😠</div><div>पण एखादी गोष्ट वारंवार सांगितली की तिचं महत्त्व ऐकणाऱ्याकडून सहजच कमी होतं आणि कधी राग म्हणून किंवा बंडखोरीने सांगितले गेलेय त्यापेक्षा एकदम विरुद्ध वागण्याची प्रवृत्ती होते. त्यांच्या मनात सूचनांचा राग असतोच वर परिस्थितीवरचाही राग असतो.</div><div>ना मनासारखे बाहेर जाऊन खेळता येत,ना कोणाला भेटता येत. </div><div>साधारण पंधरा वर्षापर्यंतची मुलं आणि साठी-सत्तरीच्या पुढची मंडळी यांना आता घरात अक्षरशः कोंडल्यासारखं झालं आहे.</div><div>एकतर इतरवेळी जास्तीतजास्त वेळ घराबाहेर असणारे मेंबर्स आता पूर्णवेळ घरातच आहेत. </div><div>त्यामुळे कुठेकुठे एकमेकांच्या स्वभावाशी अतिसहवासातून घर्षण तयार होतेय. </div><div>सगळ्यांनाच शांतता हवी, प्रायव्हसी हवी, आपल्या कामाच्या वापरासाठी फोन हवेत,लॅपटॉप हवेत. जागेची मुबलक उपलब्धता सगळ्यांकडे असेल असे नाही. म्हणून</div><div>मुलांनी शाळेच्या वेळेनंतरही दंगा,मस्ती करायची नाही कारण इतरांचं ऑफिस घरून सुरू आहे.</div><div>आजी-आबांच्या बेडरूममध्ये टीव्ही असेल तर मुलांचा मोर्चा थेट त्यांच्या वेळ आणि एकांतावर येतो. त्यांना तर ना दुपारी आराम मिळतोय ना सकाळ- संध्याकाळचा व्यायाम होतोय.</div><div>एकमेकांवर आरडाओरडा आणि रोजच्या नवीन तक्रारी यांनी सगळ्यांच वैतागायला झालंय. मुलांना वेगळी रूम असेल तर त्यांच्या</div><div>वाढलेल्या स्क्रिनटाईमचीही काळजी आहेच. </div><div>बदलांकडे संधी म्हणून बघितलेल्या कुटुंबांचे अनुभव मात्र वेगळे आहेत.</div><div>त्यांनी गेले वर्षभर मिळालेल्या एकत्र वेळेचा चांगला उपयोग करून घेतलाय. अभ्यासाच्या,कामाच्या,एकत्र खेळायच्या इतकेच काय व्यायामाच्या वेळाही एकमेकांच्या संमतीने चपखल अनुरूप करून घेतल्या आहेत.</div><div>स्वभावात पुरेशी लवचिकता असेल तर इतर लोकंही पटकन तडजोड स्वीकारतात. कुटुंबात एकमेकांमध्ये समन्वय, सुसंवाद आणि संघटितपणा प्रयत्न आणि पेशन्सने आणावा लागतो.</div><div>आज पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने त्यांच्या काळातले सुट्टीतले अनेक बैठे खेळ मुलांना शिकवले. त्यातून मुलांना खेळण्यासाठी नावीन्य मिळाले म्हणून मुलं खुश आणि मोठ्यांनाही आपले लहानपण पुन्हा अनुभवल्याचा आनंद. शिवाय यात आजी-आजोबाही सहभागी झाले. सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका झाला. </div><div>घराचे गोकुळ व्हायला अशीही फक्त इच्छाशक्तीच तर लागते😊 </div><div>आपल्यालाही असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला काय हरकत आहे?</div><div>दिवसभरातल्या वेळात आपल्याला मिळालेल्या छोट्या-मोठ्या मोकळ्या वेळेच्या संधी अनेक कल्पक उपायांनी भरता येतील. सगळ्यांच्या मनावरचा ताण त्यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.</div><div>सध्याच्या परिस्थितीबद्दल, अडचणींबद्दल तुम्ही मुलांशी जाणीवपूर्वक बोलता आहात ना?</div><div>कितीही लहान वयाचे मूल असेल तरी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांच्या शंकांना,प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. तुम्ही सुखरूप रहाल आणि त्यांच्या सोबत आहात ही जाणीव वेळोवेळी त्यांना करून द्यायला हवी. काही झालेच तर वेळेत त्यावर उपाय करता येतात, हा विश्वास त्यांना द्या. कारण तुम्हाला काही झाले तर? या दडपणाचे न पेलवणारे ओझे त्यांच्या चिमुकल्या मनावर असू शकते.</div><div>तीच खात्री वृद्धांनाही द्यायला हवी. काही झाले तर आपल्याला आपली माणसं पुन्हा दिसणार का, या कहाण्यांचा न पेलवणारा ताण त्यांच्याही मनावर असू शकतो.</div><div>एकत्र मिळालेला वेळ लहानमोठ्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडण्यात,तक्रारी करण्यात घालवला तर एकमेकांशी असलेल्या नात्यात सहज प्रेमाचा,</div><div>आणि सहजाणिवेचा हळूवार धागा नव्याने गुंफण्याची आयुष्याने दिलेली सुंदर संधी तुम्ही गमवाल आणि हाती उरेल फक्त आणि फक्त एकटेपणाचा ताण.</div><div>थोड्या जाणत्या,जबाबदार वयाच्या मुलांना समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवण्याची ही सुंदर संधी आहे. </div><div>त्यांना सोबत घेऊन आपल्या परिसरात असलेल्या वृद्ध व्यक्तींना योग्य काळजी घेऊन मदत करणे,जीवनावश्यक गोष्टी,औषधे आणून देणे, त्यांना बरे नसेल तर डबा देणे, विचारपूस करणे यासारख्या आपल्या अनेक छोट्या मोठ्या वागण्याकडे आपली मुले बारकाईने बघत आहेत.</div><div>संस्कार शिकवून कधीच येत नसतात ते मोठ्यांच्या उदाहरणातून मुलं अचूकपणे उचलतात.</div><div>मोठ्यांचं एकमेकांशी बोलणं आणि वागणं यातून त्यांच्या जाणिवा एकतर घडत आहेत किंवा बिघडत आहेत,याचं भान या परिस्थितीत अधिक बाळगायला हवंय.</div><div>कोणतेही संकट कायमस्वरूपी टिकत नाही.</div><div>आयुष्य खूप सुंदर आणि जगण्यायोग्य आहे.</div><div>कळत्या मुलांशी या गोष्टी जाणीवपूर्वक बोलण्याची गरज आहे. </div><div>आपले कुटुंब,समाज आणि निसर्ग यांची आज काळजी घेतली तर उद्याच्या संकटांची काळजी नसते. मानसिकदृष्ट्या सक्षम आणि निरोगी राहणे ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही.</div><div>ती आर्थिक बचतीसारखी जाणीवपूर्वक करावी लागते. </div><div>ज्यावेळी सर्वकाही सुरळीत सुरू असते तो काळ स्वतःला मानसिक,भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा असतो. </div><div>संकटांचा सामना कसा करायचा असतो,</div><div>त्यासाठी लागणारे शारीरिक मानसिक बळ आपल्या आतच असते फक्त ते वापरायचे की नाही,कसे वापरायचे असते हे आजच्या आपल्या वागण्यातून मुलांना समजते आहे, म्हणून सावध!</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div># मानसआरोग्य डायरी 6</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEges6rYGQbp_xnXN6gUuvMuV32HrnFPhXfWNgGbZq0m5AELaa58YmD9K0XxgPR9cOs_mMsmMTy6p3L9o-9fvCqLSTF7p-96QfTLd4H3tqS323_l1p-KuedzmM6PYjBqGSeCVDpkfb00he0/s1600/1619669550785350-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEges6rYGQbp_xnXN6gUuvMuV32HrnFPhXfWNgGbZq0m5AELaa58YmD9K0XxgPR9cOs_mMsmMTy6p3L9o-9fvCqLSTF7p-96QfTLd4H3tqS323_l1p-KuedzmM6PYjBqGSeCVDpkfb00he0/s1600/1619669550785350-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEVo8uHCzrqAx2gGB4w__4_UWu5wDxwdCDxR10FBQC0xpm_0nuWW0m4kTpmJZ1UUTrJ7UVdrcgYjlU03vDJw7XBY_qhx29gMG6ADDvCz_Uy0PzcQG2059ygM-KWTwJQ_hIBqMxRv2PI2g/s1600/1619669546098672-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEVo8uHCzrqAx2gGB4w__4_UWu5wDxwdCDxR10FBQC0xpm_0nuWW0m4kTpmJZ1UUTrJ7UVdrcgYjlU03vDJw7XBY_qhx29gMG6ADDvCz_Uy0PzcQG2059ygM-KWTwJQ_hIBqMxRv2PI2g/s1600/1619669546098672-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-64261600498335636962021-04-28T10:59:00.001+05:302021-04-28T10:59:24.365+05:30# मानसआरोग्य डायरी 5<div>अनेक लोकांना ज्यावेळी आपल्या घरात सुरक्षित राहायला मिळतंय त्यावेळी देशभरातील अनेक डॉक्टर्स,सिस्टर्स,इतर मेडिकल स्टाफ,औषध विक्रेते आणि संपूर्ण मेडिकल विश्वाशी निगडित असलेले सगळे लोक गेले वर्षभरापेक्षा जास्त काळापासून किती मानसिक ताणातून जात आहेत आपल्याला कल्पना नाही.</div><div>केवळ काही तासांची शारीरिक विश्रांती,अपूर्ण झोप,खाण्याच्या अनियमित वेळा आणि हात,मेंदू यांना अखंड फक्त काम आणि कामच.</div><div>हॉस्पिटल्स क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. संपूर्ण यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. </div><div>त्यात ओळखीचे,नातेवाईक,मित्रमंडळी यांचे सतत फोनवर फोन. कोणाला बेड हवाय,कोणाला सल्ला हवाय,कोणाला ऑक्सिजन हवाय,कोणाला vaccine हवीय.</div><div>रोज येणारे शंभरच्या वर कॉल्स. प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा,मागणी. </div><div>ती पूर्ण करता आली तर ठीक, नाही आली तर मनाला टोचणी.</div><div>कुटुंबातल्या माणसांसाठी वेळ नाही.</div><div>त्यांना आपल्यामुळे काही होणार नाही ना याची काळजी सतत मनात. मुलांना कुठे आहे vaccine चं संरक्षण?</div><div>घरी ना कोणाशी मनमोकळ्या गप्पा,ना एकत्र जेवण. घरी जायलाच रात्रीचे 11 वाजून जातायेत. </div><div>तोपर्यंत सगळे झोपलेले, कसेबसे दोन घास खाऊन पडत नाही तोवर कोणी सिरीयस झाल्याचा किंवा गेल्याचा फोन. </div><div>डोळ्याला डोळा लागणार कसा? झोप पूर्ण होत नाही,पुरेशी विश्रांती नाही. थोडावेळ स्वतःसाठी हवा आहे पण फोन बंद ठेवता येत नाही.</div><div>मनावर सगळ्याचा ताण येतोय.</div><div>शेवटी माणसंच आहेत ना ही सगळी मंडळी?</div><div>हॉस्पिटलपर्यंत आलेले बरेचसे पेशंट सिरीयस होऊनच आलेले असतात. </div><div>कधीकधी इच्छा असूनही त्यांना आत पण घेता येत नाही. खूप प्रयत्न करून,काळजी घेऊनही डोळ्यादेखत पेशंट जातो आहे, तरुण लोकांनाही वाचवता येत नाहीये. त्यांनी थोडं वेळेत यायला हवं होतं, सगळ्याचा खूप त्रास होतो, दाखवता येत नाही, त्यावेळी कितीही वेळ मारून नेली तरी नातेवाईकांचा आक्रोश बघून त्यांच्या जागी आपल्या माणसांचे चेहेरे दिसायला लागतात.</div><div>त्यांनाही हताश,निराश वाटतंय.</div><div>आजूबाजूचं मृत्यूचं थैमान बघून प्रश्न पडले आहेत. खरंच कधी थांबणार आहे हे सगळं?</div><div>की अजून एखादी लाट येणार आहे?</div><div>थांबणार आहे की नाही?</div><div>अनिश्चिततेचं भय त्यांनाही वाटतंय. </div><div>पण सांगणार कोणाला?</div><div>बोलणार कोणाशी?</div><div>माणसांच्या भावभावना आणि मर्यादा त्यांनाही आहेत हे लक्षात आहे ना आपल्या?</div><div>त्यांच्यासाठी थाळ्या बडवून त्यांना काहीही मदत होणार नाहीये. </div><div>नुसतीच कोरडी कृतज्ञता पण नको.</div><div>त्यांना मदत करण्यासाठी आपण फक्त तीन गोष्टी कटाक्षाने करू शकतो.</div><div>सगळ्यात पहिली योग्य पद्धतीने घातलेला मास्क. मास्क वापरण्याच्या लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या लाटेनंतर नावाला मास्क वापरणारे,गळ्यात बांधून फिरणारे,योग्य पद्धतीने मास्क न वापरणारे, मास्कच न वापरणारे लोक आपण बघितले. </div><div>घरात,गाडीत मास्क काढून टाकला की तो कुठे ठेवतोय,त्याला कुठे हात लावतोय मग तेच हात नाकाला,तोंडाला लावतोय या गोष्टीही लोकांकडून नकळतच होतात.</div><div>घरातली वयस्कर मंडळी आणि लहान मुलं सगळ्यांची नजर चुकवून मास्क काढतात. </div><div>गाडीत,विमानात अंधार झाला की मास्क काढून बसलेले लोक आहेत.</div><div>याचा अर्थ मास्क लावणे का गरजेचे आहे हे अजूनही समजलेलं नाही की आपल्याला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत, हा समज आहे? म्हणजे नेमकं अज्ञान आहे की बेपर्वाई?</div><div>Social distancing करणारेही तसेच. पूर्ण काम होइपर्यंत लांबच बसलो होतो. फक्त नंतर एकत्र चहा प्यायला,नाष्टा केला. नाहीतर खूप दिवसांनी भेटलो म्ह्णून मग सेल्फी काढले. </div><div>फक्त तितक्याच वेळ मास्क काढला..</div><div>बाकी कधीच काढत नाही,असे म्हणणारे लोक बघितले.</div><div>करोनाची लाट वाढण्यासाठी पुन्हापुन्हा येण्यासाठी आपला तर हातभार लागत नाहीये ना?</div><div>दुखणे अंगावर काढण्याची आपल्याला जुनी सवय आहे. आपल्याला होणारा त्रास आपोआप काही वेळानंतर कमी होईल असा समज मनात बाळगून खूप लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.</div><div><br></div><div>करोनाची टेस्ट positive आल्यावर तात्काळ औषधे घेतली तर आजार वाढण्याची शक्यता कमीतकमी आहे. </div><div>सगळ्यात महत्त्वाची गोष्ट vaccination बद्दल.</div><div>स्वतःला जास्तीतजास्त सुरक्षित करण्याचा तो एकमेव उपाय आहे. त्याने करोना झाला तरी त्याचा होणार त्रास खूप प्रमाणात कमी होतो हे लक्षात आलेले आहे. </div><div>अजूनही काही लोक लस घ्यायला घाबरतात आणि टाळत आहेत. सर्वांनी लस घेतली तर लवकरात लवकर हे सगळं संपू शकेल.</div><div><br></div><div>मेडिकलविश्वाबाबतीत काही तक्रारी आणि काही ठिकाणी आर्थिक लुटालूट हे प्रकार खूप वाढले आहेत,हे मान्य. ही सामाजिक कीड या क्षेत्रातही वाढते आहेच.</div><div>पण त्या मोजक्या लोकांसाठी प्रामाणिकपणे आणि अथकपणे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना सरसकट संशयाच्या नजरेने जोखणे योग्य नव्हे. </div><div>आज ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत,हे ही सत्य आहे.</div><div>आपण आपली जबाबदारी ओळखून वागावे,इतकीच त्यांची इतर समाजाकडून अपेक्षा आहे. </div><div>खरेतर ते त्यांच्यासाठी नाही,आपल्याला आपल्याच भल्याकरता करायचे आहे. </div><div>कृतज्ञतेची ही छोटीशी पावतीच आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे.</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div># मानसआरोग्य डायरी 5</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3XboFgJxj3ag5rsT6zgnhFEo-wFmvXtpZ_ExhYDTlw9Z3irpIG-Z6_MoasT9SEqpHZ9UY0Ox_gaync9j83GuhXjFTTTLFSZPGiJaR6QDRbrg5phx3j6-l9S5RXtgr5Xh4eNhIbS_nKcg/s1600/1619587759811466-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3XboFgJxj3ag5rsT6zgnhFEo-wFmvXtpZ_ExhYDTlw9Z3irpIG-Z6_MoasT9SEqpHZ9UY0Ox_gaync9j83GuhXjFTTTLFSZPGiJaR6QDRbrg5phx3j6-l9S5RXtgr5Xh4eNhIbS_nKcg/s1600/1619587759811466-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFaXSO6i-LSQ7ObofZ8nVQ2kPGJGKGyLDirSvFi6Z3K0AtNLyZ9ALszrLo2GipLmbaEb6PnHjAPI8q6A1Dt9FnpoazE5YqK4Lnyo2ovvm03A4NDnCBavyyJ6mj88yf2nyY2Fe6Lx0WniY/s1600/1619587756797567-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiFaXSO6i-LSQ7ObofZ8nVQ2kPGJGKGyLDirSvFi6Z3K0AtNLyZ9ALszrLo2GipLmbaEb6PnHjAPI8q6A1Dt9FnpoazE5YqK4Lnyo2ovvm03A4NDnCBavyyJ6mj88yf2nyY2Fe6Lx0WniY/s1600/1619587756797567-1.png" width="400">
</a>
</div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-17184038404124856282021-04-25T17:33:00.001+05:302021-04-25T17:33:36.526+05:30# मानसआरोग्य डायरी 4<div> बसलेले आप्पा निवेदकाच्या प्रत्येक शब्दाला घुटके गिळत होते,ओठ थरथरत होते,डोळे विस्फारलेले.</div><div>बातम्या सुरू होत्या. निवेदकाच्या आवाजाची पातळी, वेग, स्वर,त्यात भर घालणारे पार्श्वसंगीत आणि अत्यंत गंभीर,दुर्दैवी बातमी. </div><div>नाशिकच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू. </div><div>नाटकीय आवाजात वारंवार उच्चरलेली तीच ती वाक्ये आणि त्यात आणखी भर चित्रांची,व्हिडीओची.</div><div>नातेवाईकांचा आक्रोश बघून आप्पांना कसंतरीच व्हायला लागलं. घरातल्या कोणाच्यातरी लक्षात त्यांची ही अवस्था आली आणि ताबडतोब टीव्ही बंद झाला. पण कदाचित तोपर्यंत उशीर झाला होता,घडायचे ते नुकसान घडून गेले होते.</div><div>दुसऱ्याच दिवशी गेले वर्षभर चार भिंतींच्या आत स्वतःला सुरक्षित ठेवलेले आणि करोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले 60 वर्षांचे आप्पा घरात चालता चालता कोसळले. </div><div>आपल्याला माहीत नसलेले असे आणखी किती आप्पा असतील?</div><div>माणसांवर नकारात्मक,वाईट गोष्टींचा परिणाम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात का होतो?</div><div>आयुष्यातल्या सकारात्मक,चांगल्या गोष्टीं घडण्याचा वेग त्यामानाने इतका कमी कसा?</div><div>संवेदनशील मनात हा प्रश्न नक्की उमटतो.</div><div>असे होते कारण नकारात्मक गोष्टींचा हल्ला माणसावर अचानक होतो. आघात झेलण्यासाठी मनाची पूर्वतयारी नसते. </div><div>त्यावेळी जाणवणाऱ्या नकारात्मक भावनांचा वेग आणि तीव्रता खूप जास्त असते. </div><div>घटनेनंतर अनेक दिवसांनी अनुभवांची तीव्रता कमी झाली तरी त्या प्रसंगांची आठवण मात्र माणूस कधीही विसरत नाही. पुन्हा तसा अनुभव आला की माणूस त्यांच्याशी पटकन कनेक्ट होतो.</div><div>दुःखद काही बघून,ऐकून,वाचून आपल्या मनातल्या या आठवणींची केंद्रे लगेच जागी होतात. </div><div>त्यातल्या तीव्रतेनुसार मेंदू आपण पूर्वी अनुभवलेल्या दुःखद प्रसंगांच्या चित्रांची,आवाजांची, संवेदनांची मालिकाच मन:चक्षूंपुढे उघडून देतो. </div><div>चित्रपट,नाटक बघूनही आपल्या डोळ्यात पाणी येते कारण भावना आपल्या ओळखीच्या असतात. </div><div>इतरांच्या दुःखाशी,त्रासाशी आणि नकारात्मक विचारांशी माणसे सहानुभूतीने आपल्या नकळत जोडली जातात.</div><div>काही माणसे भावनांवर पटकन नियंत्रण ठेऊ शकतात तर काही अतिसंवेदनशील असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या विचारचक्रात अडकतात. </div><div>इथूनपुढे असे होत असेल तर मेंदूतल्या अशा files उघडल्या गेल्या आहेत त्या ओळखा. सावधपणे त्या चटकन बंद करा. </div><div>मनावरचा ताण वाढवणाऱ्या बातम्या ऐकायच्या की नाही,किती वेळ ऐकायच्या..लक्षात असू दे की टीव्हीचा रिमोट कायम आपल्याच हातात असतो. </div><div>युद्ध,साथीचे,सांसर्गिक आजार,नैसर्गिक आपदा, अपघात अशा संकटात एकाचवेळी अनेक लोक अशा अनुभवातून जात असतात. </div><div>दुःख, हतबलता,निराशा,अनिश्चितता यासारख्या नकारात्मक भावनांची तीव्रता जास्त असते. </div><div>भीती आणि सुरक्षिततेची भावना या सगळ्यावर हावी होते. </div><div>माणसे सारासार विचार करू शकतीलच असे नाही, कशावरही पटकन विश्वास ठेवतात.</div><div>प्रत्यक्ष आजाराने जितके नुकसान होणार नाही त्याच्या कितीतरी पट जास्त नुकसान अपूर्ण माहिती,अफवा आणि भीतीमुळे होत असते. </div><div>सतत कानावर येणाऱ्या मृत्यूच्या, जवळची लोकं, नोकरी गमावण्याच्या, हॉस्पिटल्स मध्ये इंजेक्शन्स नसण्याच्या,ऑक्सिजन नसल्याच्या,बेड नसल्याच्या बातम्या भीतीत भर घालतात. </div><div>त्यांच्यामुळे मनोधैर्य खचलेले लोक गंभीर परिणाम अनुभवतात आणि त्यांच्या गोष्टी अनुभवून आणखी काही लोक भीतीग्रस्त होतात. </div><div>दुष्टचक्र फिरत राहते. </div><div>मग वस्तुस्थिती खरीखरच अशीच नाहीये का?</div><div>संकट आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आहे. </div><div>अशावेळी सावध,चौकस असल्यामुळे आपल्यापर्यंत जे पोहोचते आहे त्याची शहानिशा करण्याचा संयम, विवेक बाळगला तर माहितीचा</div><div>वापर विनाकारण फोन करून एकमेकांची भीती वाढवण्यासाठी करणार की एकमेकांना मदत करण्यासाठी करणार, हा निर्णय घेण्याचा चॉईस आपल्या हातात आहे,हे लक्षात येईल.</div><div>करोना संकट आपल्यापर्यंत आलेच तर त्याचे शरीरातले पाहिले लक्षण ओळखण्यासाठी आपण ते ज्ञान वापरू.</div><div>कारण मनाच्या सैरभैर अवस्थेत अनेकांकडून ते दुर्लक्षित होतेय,असं लक्षात आलंय. </div><div>लवकर उपचार, लवकर मात,हे करोनातून बाहेर पडण्याचे पाहिले सूत्र आहे.</div><div>आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नकारात्मक गोष्टींपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात एकूणच आयुष्यात सकारात्मक,चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. </div><div>मनातली नकारात्मकता आगीच्या वणव्यासारखी आहे..अवचित लागणारा,धुमसणारा,निरपराध अनेकांना भक्ष बनवणारा. </div><div>वणवा लागू नये म्हणून आधीच काळजी घ्यायची असते. चुकून लागलाच तर विझवण्याची त्वरा करायची असते.</div><div>सकारात्मकता मात्र देवघरातल्या समईच्या ज्योतीसारखी आहे. </div><div>नियमित साधनेने प्रज्वलित ठेवावी लागते. </div><div>मनाच्या गाभाऱ्यात मंद मंद तेवणारी असते.</div><div>स्निग्ध तेजाने मनातला अंधार उजळवून टाकते. चैतन्याची ऊब आणि उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारी असते.</div><div>आज स्वतः मधल्याच त्याच तेजोमय ज्योतीचे स्मरण करूया.</div><div>तिच्या असण्यावर विश्वास ठेवा.</div><div>आपल्या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न आपल्याला या संकटातून बाहेर पडायला मदत करतील.</div><div>आपणही करोनायुध्दातले लढवय्ये सेनानी बनू या..🙏😊</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhv7_XF6k7vLIen6nJLVvRw3z_q1A9GoFyf5DcYpzvfjoo8hoZo9-hV21nQT9hkwRAGqmvg0uw9EwAQr9-xOYrXt34pK_z5SVi7llrPe4fgogwD1-EXK03yDyhYdeMesSOK7ZrEBcmT7Uo/s1600/1619352207002871-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhv7_XF6k7vLIen6nJLVvRw3z_q1A9GoFyf5DcYpzvfjoo8hoZo9-hV21nQT9hkwRAGqmvg0uw9EwAQr9-xOYrXt34pK_z5SVi7llrPe4fgogwD1-EXK03yDyhYdeMesSOK7ZrEBcmT7Uo/s1600/1619352207002871-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQA3rmhmgmX5pe3TBDp_zJEIktKRV1NAxrsDXdE7s-Hk3HkFpgjKcOyKFL7-WGJxisCQxPqGA0-yybRwYZdtiQO6Z2QH8bJx8nR6nl9dZinO8AUGtYyBX71GRJsM9j7iWndIyC-n8tBIs/s1600/1619352203858127-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQA3rmhmgmX5pe3TBDp_zJEIktKRV1NAxrsDXdE7s-Hk3HkFpgjKcOyKFL7-WGJxisCQxPqGA0-yybRwYZdtiQO6Z2QH8bJx8nR6nl9dZinO8AUGtYyBX71GRJsM9j7iWndIyC-n8tBIs/s1600/1619352203858127-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-80749952239856449362021-04-25T09:01:00.001+05:302021-04-25T09:01:51.659+05:30# मानसआरोग्य डायरी 3<div><br></div><div><br></div><div>मनात भीती असते,मला करोना झाला तर? </div><div>माझ्यामुळे माझ्या घरातल्या कोणाला झाला आणि त्यांना काही झालं तर? त्यांच्या मृत्यूचे भय. माझे आईवडील,भाऊ बहीण, मुलं जे लांब राहतात त्यांना काही झालं तर?</div><div>माझ्या नोकरी,व्यवसाय याबद्दलच्या आर्थिक चिंता. </div><div>याबद्दलची सत्यता, वस्तुस्थिती यावर संयमाने विचार न करताच आपली स्ट्रेसलेव्हल वाढत नाहीये ना?</div><div>आपल्या ओळखीचे,शेजारी,जवळचे रोज कोणीतरी संकटात असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. वारंवार बोलून ताण आणखी वाढतोय.</div><div>बोलणारा कदाचित मन हलकं करत असतो पण ऐकणारा? आपण नुसते ऐकत नाही. बातम्या सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आपल्या सवयीनुसार ऐकलेले amplified करतात. </div><div>आपल्या शत्रूवरदेखील वाईट वेळ येऊ नये अशी सदिच्छा बाळगणारे आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत अशी अनेक दिवाचित्रे,शक्यता आपल्या नकळत मनातल्या मनात रंगवत असतात.</div><div>आज करोनाची भीती असेल पण करोना नव्हता तेव्हा काळजी,चिंता आणि समस्या नव्हत्याच का? </div><div>चिंता करण्याची आपल्या मनाला सवय तर नाही? एकदा तपासायला हवंय.</div><div>घरातून कोणी बाहेर निघालं, तर त्याचा accident तर होणार नाही? पहिल्यांदा हा विचार मनात येणारे अनेकजण आहेत. </div><div>आपल्या जवळच्या लोकांबाबाबत इतका वाईट मनात येतो याचा अपराधभाव खूप जास्त असतो.</div><div>त्यातून भानावर येणे काहींना जमते. काही त्यात अडकतात, त्यात मानसिक व्याधींचे मूळ असू शकते. विचार असह्य होतात,सतत मनात येतात त्यावर मात करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात.</div><div>त्यांचा उपयोग होण्यापेक्षा आणखी त्रास होऊ शकतो. अतिविचार टाळता येणे शक्य आहे,त्यासाठी मदत उपलब्ध असते. गरज असते वेळेत आपल्याला होणारा त्रास लक्षात येण्याची.</div><div>मानसिक अस्वस्थतेबद्दल कोणाजवळ विश्वासाने बोलता येईल,त्यावर चर्चा करता येईल असे वातावरण घरात, समाजात मिळायला हवे.</div><div>आपले हसे होईल म्ह्णून या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. </div><div>लहान मुलांच्या मनात अशा असुरक्षितता,भीती खूप जास्त असतात. त्या व्यक्तदेखील होत असतात. अनेकदा घरातले मोठे" शुभ बोल रे नाऱ्या" म्ह्णून त्याला फटकरतात. </div><div>आपल्या आजूबाजूला असलेलं कोणी असं काही व्यक्त करत असेल तर सावध असा. </div><div>ती संवादाची संधी आहे. त्यांची कारणे ऐका, समजून घ्या. त्यांना विश्वास द्या, सांगा की</div><div>आपल्या मनात येणाऱ्या सगळ्याच विचारांवर विश्वास ठेवण्याची गरज नसते. त्यात कचरा भरपूर असतो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असते.</div><div>आपल्या मनातले असे विचार ताबडतोब खरे होतील याची शक्यता शून्य असते.</div><div>शक्यता केवळ आपल्या डोक्याचे खोबरे होण्याचीच जास्त असते. विनाकारण ताण वाढतो.</div><div>आजच्या वातावरणात नकारात्मक विचार जास्त प्रमाणात मनात येतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. </div><div>तात्पुरता विचार झटकला जातो, थोडावेळ चांगला जातो आणि पुन्हा कशावरून तरी त्याच विचारांची साखळी मनात पुढे सुरू होते. दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी वापरण्याचा खूप वेळ याच विचारात जातो. </div><div>परिणाम? </div><div>असुरक्षितता,भीती,मूड नसणे, दडपण.</div><div>दिवसातला किती वेळ?</div><div>शरीराने काम करत असते मन चोवीस तास यात अडकू शकते. </div><div>एक मिनिट थांबा..</div><div>जरा स्वतःला तपासा.</div><div>आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या सगळ्या</div><div>वाईट घटना आठवा. </div><div>अगदी जाणीवपूर्वक आठवा. </div><div>यात अपयश असेल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल,प्रेमभंग असेल,नोकरी जाणे असेल,अपघात असेल..</div><div><br></div><div>प्रत्यक्ष प्रसंग घडत असतांना असलेली आपली मनस्थिती, वागणे आठवा.</div><div><br></div><div>लक्षात येईल की त्यातल्या बहुतेक वेळा आपण अत्यंत धीराने आणि संयमाने वागलेलो आहोत. वेळेवर अगदी योग्य निर्णय घेतलेले आहेत. कितीही वाईट वाटलं,दुःख झालं तरीही त्यावर मात केलेली आहे. </div><div>काही काळानंतर त्यातूनही बाहेर पडलोय ते काहीतरी शिकूनच.</div><div>हे अगदी खरंय की कोणावरच वाईट वेळ येऊ नये पण आली तर?</div><div>आजही बघा ना जरा आजूबाजूला..</div><div>प्रत्यक्षात वाईट अनुभवातून जाणाऱ्या, झगडणाऱ्या लोकांकडे बघा.</div><div>कदाचित तुमच्या जवळचं कोणी त्यात असेल.</div><div>आत्ता या क्षणी त्यांच्या आणि तुमच्या मनात फक्त आणि फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं याचाच विचार नाही?</div><div>शारीरिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी मनाची सगळी शक्ती एकवटलेली नाही?</div><div>आपण आपले अगदी 100 टक्के देतोय.</div><div><br></div><div>हा आपल्यापैकी बहुतेकांचा अनुभव आहे की प्रत्यक्षात ज्यावेळी आपण संकटात सापडतो त्यावेळी बाकीचं सगळं विसरून सर्वशक्तीनिशी आपण त्यावर मात करतोच करतो.</div><div>हातपाय गाळून बसत नाही आणि त्यापासून पळूनही जात नाही.</div><div>स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा.</div><div>त्याच्यात परिस्थितीवर मात करण्याच्या सगळ्या क्षमता आहेत. </div><div>माणूस तेव्हाच विचारांनी,भावनांनी मजबूत होतो ज्यावेळी तो जास्तीतजास्त कठीण काळावर,दुःखावर मात करतो. त्यातून बाहेर पडतो.</div><div>आपल्या प्रत्येकाने आयुष्यात संकटांचा अनुभव घेतलेला आहे.</div><div>मग जर सामना करण्याची शक्ती आपल्यात असेल तर आत्ता नुसत्याच</div><div>त्रासदायक विचारांनी ताण का वाढवायचा?</div><div>प्रत्यक्षात वेळ आली तर बघू पण आता व्यर्थ चिंतेची भर खरंच नको.</div><div>मनाला खात्री देऊया? </div><div>त्याआधी अशी वेळ आपल्या कोणावरच येऊच नये म्हणून आज अधिक जबाबदारीने वागूया?</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div># मानसआरोग्य डायरी 3</div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiue7eb2eXGOVgrdC1Wl9K2wLfEyaOgvUQiPbLbZDkUiIcJn4Vo-nK0uNoGrRQPwYDQu3UnEcqdxkG9nG-BHbPM__BSzo9aVhzjOBsUZsDY1vR6Qfbw5v8g1_BSWAaCv7MeyqgY6-oH0GM/s1600/1619321501587888-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiue7eb2eXGOVgrdC1Wl9K2wLfEyaOgvUQiPbLbZDkUiIcJn4Vo-nK0uNoGrRQPwYDQu3UnEcqdxkG9nG-BHbPM__BSzo9aVhzjOBsUZsDY1vR6Qfbw5v8g1_BSWAaCv7MeyqgY6-oH0GM/s1600/1619321501587888-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsdifmGWKacB_aJhpoE9tTB2qmRzbddRpRQxbE8KFJi5lFVfEOovr32eeNTCWA9gpCm9cuT85wGJoEJFjhYXu0Ibcq2PKuc6BkUglhOTCDotsHnoOa5EuIKR4wpKoagAifvpMGtQeR7ow/s1600/1619321494920926-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsdifmGWKacB_aJhpoE9tTB2qmRzbddRpRQxbE8KFJi5lFVfEOovr32eeNTCWA9gpCm9cuT85wGJoEJFjhYXu0Ibcq2PKuc6BkUglhOTCDotsHnoOa5EuIKR4wpKoagAifvpMGtQeR7ow/s1600/1619321494920926-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-69567229706808617652021-04-22T10:23:00.001+05:302021-04-22T10:23:20.997+05:30# मानसआरोग्य डायरी पान 2<div><br></div><div>मनाला सतत चांगल्या मोडवर कसं ठेवायचं?</div><div>मन आहे..त्यात वाईट विचार येणं natural नाही का? उलट आधी वाईटच विचार येतात. </div><div>सगळ्यात जास्त बिघडवून,लाडावून आपण आपल्या मनाला ठेवतो.</div><div>काय हरकत आहे विचारांना थोडी शिस्त लावायला?</div><div>आजपर्यंत नाही लावली,ठीक आहे. आज, अगदी आत्तापासून सुरवात करूया.</div><div>कसं शिकायचं?...अनुभवांकडून.</div><div>वाईट विचार सतत मनात येत असतील तर आपल्याला कसं वाटतं?</div><div>मन नाराज असतं,भीती वाटत असते, जीव घाबरा होतो,धडधडायला लागतं, मनात आणखी विचार येतात. काय करावं समजत नाही. आजूबाजूने सतत काहीतरी वाईटच कानावर येतंय,कुठेच आशा दिसत नाहीये..</div><div>विचारांचा हा रस्ता आपण पकडला आहे हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी स्वतःला थांबवायचं.</div><div>कसं? आपल्याला सवयीचं आहे ते..</div><div>प्रत्यक्षात रस्त्यावर चालतांना अचानक खड्डा दिसला तर आपण काय करतो?</div><div>आपल्याकडून तो चुकवायचा जास्तीतजास्त प्रयत्न करतोच ना? की मुद्दाम त्यातून जातो?</div><div>नाही ना? </div><div>कारण आपण पडतो,लागतं, खरचटतं, खड्ड्यात पाणी असेल तर आपले कपडे खराब होतात, हे अनुभवलेले असते आपण. आपण तर गाडीसुद्धा त्यापासून वाचवतो.</div><div>ते शिकण्यासाठी आपल्याला किती अनुभवांची गरज लागते? </div><div>एका अनुभवातून गेलेलं पुरतं, हो ना?</div><div>तरीही नकळत किंवा नाईलाजाने अचानक पुन्हा खड्ड्यातून गेलो की आपण काय करतो? </div><div>सावध होतो,नीट चालतो आणि पुढचे अनेक खड्डे चुकवतो.</div><div>अगदी तसंच मनाच्या बाबतीत पण सतत येणाऱ्या अनुभवांकडून शिकायचं आहे.</div><div>मनात स्वाभाविकपणे वाईट विचार आधी आले तरी त्यात अडकायचं नाही..</div><div>सावध व्हायचं..थांबायचं..मागच्या अनुभवात आपल्याला असं करणं जमलं नाही मग त्याचा परिणाम मन उदास,अस्वस्थ होण्यात झाला होता, हे बोलायचं आहे स्वतःशी. </div><div>हे विचारांना शिस्त लावणं आहे, सातत्याने केलं तर जमणार देखील आहे.</div><div>आजूबाजूला वाईट गोष्टी घडत आहेत हे खरं आहे. त्या घडण्यात आपण जबाबदार असू नये हे मात्र आपण अगदी कटाक्षाने पाळायचं आहे.</div><div>प्रत्येकाने आपलं घर, जवळची माणसं सुरक्षित राहतील हा विचार आधी करायचा आहे.</div><div>समाजासाठी आपला खारीचा वाटा तो आहे, असं समजा.</div><div>आजपासून प्रयत्न करूया?</div><div>विचारांना शिस्त लावूया?</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div># मानसआरोग्य डायरी 2</div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKYVSbY_2isJXAVwTREOVGvHK6f83COkjUMK0JmFSFJiTxfn_FK3v-kxWEzwXG4mPf6j5BNZbkmiKruJ-pW4gba8oyP-3hEOCJ5yQ1dp81aybd-SonqRZxdn3hhAyMlgEVMm3_vOaquo/s1600/1619067192891570-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKYVSbY_2isJXAVwTREOVGvHK6f83COkjUMK0JmFSFJiTxfn_FK3v-kxWEzwXG4mPf6j5BNZbkmiKruJ-pW4gba8oyP-3hEOCJ5yQ1dp81aybd-SonqRZxdn3hhAyMlgEVMm3_vOaquo/s1600/1619067192891570-0.png" width="400">
</a>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkg9-xorBtcUNhacygFG5KFiMfSOA-ishblUJiPXUFX2v-PY9l06t79PBeXVLlnPs2PgemhjKom4vHFPkZ0d2O9g8YKlbv7p4JvFDWeGMLj8FpQvJrmEjLnsU9t6RygKJbWxML3gossU4/s1600/1619067189628768-1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkg9-xorBtcUNhacygFG5KFiMfSOA-ishblUJiPXUFX2v-PY9l06t79PBeXVLlnPs2PgemhjKom4vHFPkZ0d2O9g8YKlbv7p4JvFDWeGMLj8FpQvJrmEjLnsU9t6RygKJbWxML3gossU4/s1600/1619067189628768-1.png" width="400">
</a>
</div><br></div><div><br></div><div>(Photo: Internet)</div><div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-69730984570407362792021-04-21T20:11:00.001+05:302021-04-21T20:11:14.656+05:30# मानसआरोग्य डायरी 1<div><br></div><div><br></div><div>आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा आपण कसा विचार करतोय?</div><div>परिस्थिती गंभीर आहेच.</div><div>तुमच्या मनात त्याबद्दल काय विचार आहेत?</div><div>परिस्थिती चांगली नाही याची जाणीव आहे म्हणून मी आधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेईन आणि मग माझ्या कुटुंबियांची,जवळच्या नातेवाईकांची,मित्रमंडळींची आणि नंतर आपले मदतीचे हे वर्तुळ कितीही वाढू शकेल.</div><div>हा झाला एक दृष्टिकोन</div><div><br></div><div>आणि दिवसेंदिवस सगळं मोठं कठीण होत चाललंय,सगळंच out of control जातंय, काहीच समजेनासं झालंय, सरकार,डॉक्टर,लोकं कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाहीये,खऱ्या केसेस किती आणि काय कसं कळणार? हे सगळं कारस्थान आहे, यात नक्कीच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. हॉस्पिटल मध्ये गेलेले चांगले चांगले लोकं मरतायेत.. काही खरं नाही. नकोसं झालंय सगळं..</div><div>हा झाला दुसरा दृष्टिकोन.</div><div><br></div><div>पहिल्या दृष्टिकोनात परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं आहे तरीही मनात आशा आहे. </div><div>भीती असली तरी मार्ग निघेल याची खात्री आहे.</div><div>काळजी घेणे आहे पण अतिरेकी चिंता नाही.</div><div>लोकांच्या मृत्यूच्या बातम्या समजल्याने येणारी अस्वस्थता आहे पण या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत याची जाणीव आहे. </div><div>स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करता येईल याचे पर्याय शोधण्याची इच्छा आहे.</div><div>म्हणून अशा लोकांना या परिस्थितीत सुद्धा मार्ग दिसतात. आपल्या आजूबाजूच्या वाईट घटनांमध्ये यांना चांगलं काहीतरी उठून दिसतं. अगदीच काही नाही तरी स्वतःपुरते योग्य पर्याय आपोआप मनात पहिल्यांदा येतात जसे</div><div>माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने मी आणि इतर सुरक्षित राहणार यातली जबाबदारी समजलेले लोक उगीचच घराबाहेर पडणार नाहीत. योग्य पद्धतीने मास्क वापरतील, उगीचच येताजाता परिस्थिती किती वाईट आहे या चर्चेत स्वतःची भर घालणार नाहीत. आपल्याकडून होणारी योग्य मदत करण्यासाठी तत्पर असतील.</div><div>या घरातल्या सगळ्यांच्या विशेषतः मुलांच्या मनावर तुलनेने कमी ताण असेल.</div><div>एकत्र मिळालेल्या वेळात अभ्यास,काम,करमणूक यांचं नियोजन रोजच्या रोज केलं जाईल.</div><div>काळजी घेऊनही संकट आलंच तर त्यावर योग्य ती कृती करण्याचे भान जागृत असेल.</div><div><br></div><div>दुसऱ्या दृष्टिकोनाच्या लोकांना वाईट बातम्या अजून जास्त घाबरवतील,स्वतःला किंवा जवळच्या लोकांना नक्की काहीतरी होईल या भीतीचे दडपण मनावर असेल. कुठेही काहीही खुट्ट वाजलेलं यांना आधी समजेल कारण बातम्या आणि चर्चा ऐकल्या तरच आपल्याला सावध राहता येईल असे त्यांना वाटेल. कोणतंही काम करतांना आधी मनात येणारा विचार हा असेल. इंजेक्शन ची कमी,ऑक्सिजन नाही,हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशावेळी मला काही होऊ नये म्हणून दिवसरात्र दडपण मनावर असेल. काढे,वाफ आणि जिथून कोठून माहिती मिळेल ते सगळे उपाय न चुकता पार पाडले जात असतील आणि अतिकाळजी घेऊनही चुकून काही झालं तर अनेकांना फोनाफोनी करतील,ओळखीचे डॉक्टर्सना शक्यतो admit करण्यासाठी गळ घालतील आणि घरीच राहून बरा होईल असं सांगितलं तरी यांचा जीव थाऱ्यावर नसेल. तर काही आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही होऊ नये म्हणून नेमक्या वेळेवर योग्य उपाययोजना करायचं टाळतील.</div><div><br></div><div>आपली मानसिकता कोणत्या प्रकारात मोडते?</div><div>आत्ताच्या काळात कोणत्या दृष्टीकोनाची मदत होणार आहे हे बघितले तर त्यादृष्टिने मदत होण्यासाठी अजून काय काय करता येईल?</div><div>मार्ग काढूया</div><div>सोबत राहूया..</div><div>© डॉ अंजली औटी.</div><div><br></div><div># मानसआरोग्य डायरी </div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAFoSvq63yf2p0cm08CtjwlQmUJKyo1BqDRqf7iDlr3zw0OpRSUNIOrwfjsfImVsKnu_zHKa1VjtPYCCgreRIEyhQ6vFDUFsXM-aFk4MBZjMAjdcomOxNKBO5vNGmKmGjPr_P9Yr6fNwI/s1600/1619016066200019-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAFoSvq63yf2p0cm08CtjwlQmUJKyo1BqDRqf7iDlr3zw0OpRSUNIOrwfjsfImVsKnu_zHKa1VjtPYCCgreRIEyhQ6vFDUFsXM-aFk4MBZjMAjdcomOxNKBO5vNGmKmGjPr_P9Yr6fNwI/s1600/1619016066200019-0.png" width="400">
</a>
</div><br></div>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-40430649812149787332021-04-06T20:28:00.001+05:302021-04-06T20:28:43.950+05:30मुलांना झालंय तरी काय?<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="text-align: left;">तरुण मुलांच्या समस्या सांगणारे पालक बरेचदा घायकुतीला आलेले असतात. अविर्भावांमधून,बोलण्या वागण्यातून त्यांची अस्वस्थता जाणवत असते. मित्र,परिवार, टीचर्स यापैकी जमेल त्यांच्याकडून याबाबतीत मदत मिळवण्याचा प्रयत्न याआधी करून झालेला असतो. मुलांच्या वागण्यासाठी दृश्यअदृश्य अनेक गोष्टींना जबाबदार धरून झालेलं असतं. पालकांचं म्हणणं, त्यांना होणारा त्रास आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची चाललेली धडपड जाणवत असते. त्यांनी बळजबरीने आपल्यासोबत बसवलेल्या मुलांना समोरची व्यक्ती 'एकदाच'असे काही सांगेल की त्यामुळे अगदी जादू व्हावी तसे सगळेच त्रासातून ताबडतोब मुक्त होऊ,आपण आपले काम तर चोख केलेय असेही काहींना वाटत असते. अशावेळी मुलांआधी आपल्यालाच एकमेकांशी बोलायची गरज आहे, हे पालकांनी ऐकण्याच्या आणि संवादाच्या, समजण्याच्या पातळीवर येणं हा माझ्याही घडण्याचा प्रवास असतो.</span></div><p></p><p>मुलांचा साधारण वयोगट बारा ते बावीस मानला तर काय असतात पालकांच्या तक्रारी? </p><p>आक्रमकता, उद्धटपणा, कोणतीही गोष्ट ऐकून न घेणं, स्वतःचं म्हणणं खरं करणं, खोटं बोलणं,वागणं.. कोणतीच गोष्ट शेअर न करणं, स्वतःचा अभ्यास, भविष्य करिअर याबाबतीत बेफिकिरीने वागणं, मित्र,मोबाईल आणि मजा यातच मश्गूल असणं, घरापेक्षा घराबाहेर रमणं, बाहेरच खाणं,अस्थिरता, काही व्यसन आहे का असा संशय किंवा व्यसनांच्या आहारी जाणं. आपली मुलं आयुष्याबाबत आणि भविष्याबाबत कमालीची निष्काळजी आहेत आणि पुढे त्यांचं कसं होणार याविषयी पालक कमालीचे चिंताग्रस्त.</p><p>पालकांच्या तक्रारी नेमकं काय दाखवतात?</p><p>वर्तमानात जाणवणारा दृश्य परिणाम. </p><p>कशाचा? </p><p>मुलांच्या वय वर्षे एक पासून वय वर्षे बावीस,तेवीसपर्यंत येण्याच्या प्रवासात त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचे जे अनुभव घेतले, जे काही बघितले, ऐकले त्यातून त्यांनी स्वतःच्या अस्तित्वरक्षण आणि घडणीसाठी जे काही उचलले, घेतले, शिकले आणि स्वीकारले त्याचा. </p><p>मग तो योग्य आहे का?</p><p>तर योग्य आणि अयोग्य असा निवडा करण्याऐवजी पालक म्हणून आपल्याला आधी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पालकांचं म्हणणं असतं, आम्हाला समजलंच नाही तो किंवा ती इतके कधी आणि कसे बदलले!</p><p>हो असं होऊ शकतं.. कारण मुलांना जन्म दिला की ती आपोआप वाढतील तशी वाढू द्यावीत त्यांना घडवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न एका उच्चशिक्षित पालकाचा आहे.</p><p>अशी तर आपण आपल्या बागेतली झाडंपण नाही वाढू देत. त्यांची काळजी घेतो. जरा दुर्लक्ष केलं की झाडांच्या बरोबरीने वाढलेले तण दिसले तर आपण ते निसर्गाचे रक्षण करूया म्ह्णून तसेच ठेवतो का? कारण आपल्याला माहीत असते ते मूळ झाडाला उपद्रव देणारे आहे.</p><p>मग मुलांच्या विचारांमध्ये होणारे बदल आपल्याला आधी का जाणवत नाहीत? कारण कोणताच बदल एका रात्रीत होत नाही. ते जाणवत नाहीत कारण मुलांच्या मानसिक जडणघडणीच्या काळात पालकांच्या अतिव्यस्ततेमुळे त्यांच्यातला परस्पर संवाद कमी झालेला असतो. जिथे तो असतो तिथे वेळीच गोष्टी लक्षात येतात आणि त्यावर मार्ग, पर्याय शोधता येतात पण काही घरांमध्ये पालकांच्या लक्षात समस्या येते तोपर्यंत मुलांच्या मनातल्या तणांचे वेडेवाकडे फोफावणारे साम्राज्य झालेले असते. एकमेकांमध्ये अडकलेल्या फांद्यांचे जाळे पसरलेले असते. तिथे ना प्रकाश पोहोचू शकत ना आवाज. शिकण्याच्या टप्प्यावर कधी त्याचे त्यालाच हे उमगले तर तो हे सगळे पार करून आपला मार्ग शोधू शकतो, मात्र सगळ्यांनाच असे जमत नाही. काही त्या अंधारात हरवतात. तर काहींना बाहेर येण्यासाठी मदत लागते. मुलांची गरज वेळेत ओळखणे आणि ती स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे हा त्यादृष्टीने पालकांचा पहिला प्रयत्न असू शकतो. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNERtfOgRCoi0xn3OWYCvZ9GENTMvHMhoCOJRpYOmNfMegmx9W2STeKM2I_8jTxNcXmvf8bPFevFOeNB7G1ja7PO6gsp6rIeKuyYHjA9I2wpo9K_j3XAPjHyw1l6oWhzKKLx3icUjLlaA/s736/466f75c63199bec850d15803ca5f9017.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="492" data-original-width="736" height="429" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNERtfOgRCoi0xn3OWYCvZ9GENTMvHMhoCOJRpYOmNfMegmx9W2STeKM2I_8jTxNcXmvf8bPFevFOeNB7G1ja7PO6gsp6rIeKuyYHjA9I2wpo9K_j3XAPjHyw1l6oWhzKKLx3icUjLlaA/w640-h429/466f75c63199bec850d15803ca5f9017.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p>मग लक्षात येते आधी स्वतःलाच बदलायला हवे आहे आणि तसे ते सोपे नाही. पालक म्ह्णून असलेला निसर्गतः मिळालेला वरचा दर्जा आता मुलं अजिबातच जुमानत नाहीत म्ह्णून होणारा आपला तिळपापड कंट्रोल करता येत नाही मग आपण जाता येता मुलाला शाब्दिक शेरेबाजी करतो,वाट्टेल ते बोलतो हे 'मान्य'करणाऱ्या पालकांनी संवादाच्या दिशेने पाहिले पाऊल तरी टाकलेले असते.</p><p>आक्रमकता,बेफिकिरी,उद्धटपणा ही समस्येची केवळ दृश्य लक्षणे आहेत. प्रत्यक्ष संवादात त्याच्या मुळाशी काय काय सापडले माहीत आहे?</p><p>कमालीची असुरक्षितता,अनिश्चित भविष्याची भीती, आपली तसेच कुटुंबातल्या लोकांची टोकाची काळजी,रोजच्या त्याच त्या आयुष्याचा कंटाळा, परिस्थितीबद्दलची हतबलता, घरातल्या लोकांच्या प्रतिक्रियांचा राग, स्वतःच्या भावना समजण्यात आणि हाताळण्यात आलेले अपयश, काहीच नको अशी टोकाची निरिच्छ उदासीनता.. </p><p>आक्रमकतेच्या मुळाशी भीती असू शकेल, बेफिकिर वागण्यामागे घाबरणारे,कमकुवत मन आहे हे समजल्यावर पालकांना खजील वाटले पण आपली योग्य भूमिका काय असायला हवी यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा तर त्यातून मिळाली.</p><p>कुंभार मातीचे मडके मोठ्या कौशल्याने घडवतो, बाहेरून थापट्या मारल्या तरी आतला हात हळुवारपणे आधार देत असतो. त्याच्याकडे समज आहे, सजगता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याकडे निर्विवाद आहे. एक लक्षात आलं का?</p><p>याच्या बरोब्बर उलटे आपण करतो!</p><p>मुलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये त्यांच्या मनाची सुदृढ,निकोप वाढ व्हायला हवी असेल तर आपल्या वागण्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष सहवासातून त्यांची ती गरज वेळेत भागवली जावी. </p><p>पालकांकडे शिक्षण आहे,समज आहे,कौशल्यही भरपूर आहे पण संवादाकरता लागणारा पुरेसा वेळ मात्र नाही. </p><p>म्हणून मग आपल्या मुलांना कधीही काहीही कमी पडू नये यासाठी पालक आपल्या जीवाचे रान करतात. मुलांचे मागण्या,हट्ट त्याने न मागताच तत्परतेने पुरवले जातात. आपले असे वागणे म्हणजेच प्रेम, कर्तव्य समजणारे पालक कमी नाहीत. आपण बाह्य आधार, प्रेम पुरवतो आणि आतून मात्र थापट्या मारत बसतो. </p><p>पालक असणे नैसर्गिक देणगी असलीतरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. एकमेकांमधल्या घट्ट नात्यांची, प्रेमाची वीण दुहेरी असेल तर कदाचित ती आयुष्यातल्या कठीण प्रसंगातही सहजी उसवणार नाही आणि त्यातून निसटणाऱ्या आनंदाला ना पालक पारखे होतील ना मुलं. </p><p>आपण पुरेसे संवेदनशील आणि जागरूक असू तर मुलांच्या भावनिक,मानसिक विश्वाची दारे आपल्यासाठी आनंदाने उघडायला मुलंही नक्की तयार होतील.</p><p>अनुभव घेऊन बघा,अजूनही वेळ गेलेली नाही.</p><p>© डॉ अंजली औटी.</p><p><br /></p><p>(Photo Source: Google)</p><p><br /></p><p><br /></p>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-37913143657578664652020-11-07T13:09:00.000+05:302020-11-07T13:09:22.214+05:30रुजवू नवी दृष्टी...<p> </p><p dir="ltr" id="docs-internal-guid-0d735052-7fff-f98c-34d0-9ee525effe79" style="line-height: 1.295; margin-bottom: 8pt; margin-top: 0pt;"><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> </span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; font-weight: 700; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">रुजवू नवी दृष्टी...</span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">नवरात्र आलंय आणि माझी पाळी नेमकी त्याच काळात आहे. सासूबाई म्हणतायेत गोळी घे, काय करू?” आमचं बोलणं संपल्यावर तिने अचानक विचारलं. “तुला काय वाटतं?” मी विचारलं. “नाहीच घेणार,पण खरंचआली तर?” तिच्या ‘नाही घेणार’ म्हणण्यातला मानसिक दबाव मला जाणवला. आजच्या,उच्चशिक्षित मुलीला स्वत:साठी योग्य काय हे माहीत आहेच तरीही नव्या नात्यांमध्ये सुरवातीलाच ताण नको अशी स्पष्टता तिला विचारांमध्ये हवी होती. अशी अतार्किक अपेक्षा करणारी व्यक्ती बऱ्याचदा स्त्रीच असली तरी तिच्याही संपूर्ण आयुष्यावर असलेला परंपरांचा पगडाच त्यामागे असतो. त्यामुळे सगळा राग तिच्यावरच काढता येईल, इतकी ती दोषी नाही. न पटणाऱ्या परंपरा, त्रासदायक आहेत, व्यक्ती नाही. कोणत्याही परिस्थितीत उत्तरांच्या एकापेक्षा अनेक शक्यता असतात. विरोधासाठी दुराग्रह,हट्ट,भांडण हे पर्याय सगळ्यात आधी आणि नेहमीच वापरले जातात. त्याने मुद्दा साध्य झाला तरी माणसं मात्र मनाने दुरावतात. आपलं शिक्षण, शहाणपण वापरून यापेक्षा वेगळं काय करता येईल? परंपरांबद्दल आपली मते, ग्रह,पूर्वग्रह बदलण्याचा विचार लोकंही सामंजस्याने करतील,असे काही पर्याय निघू शकतील का? हा विचार करतांना परंपरा बदलायच्या की त्यामागे असलेल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी बदलण्याची, आग्रही भूमिका बदलण्याची गरज आहे? आपल्याच मनाला पटलेल्या गोष्टी आपण इतरांनाही सहज पटवून देऊ शकतो. म्हणून आधी त्यामागची स्पष्टता स्वत:लाच येणे गरजेचे आहे. मग जुन्या आणि नव्याची सांगड घालणे सहज शक्य होते. </span></p><p dir="ltr" style="line-height: 1.295; margin-bottom: 8pt; margin-top: 0pt;"><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">पूर्वीपेक्षा अनेक आघाड्यांवर आज सामाजिक, सांस्कृतिक वास्तव बदलले आहे. स्त्रियांना आपली जीवनपद्धती निवडण्याचे सामाजिक,आर्थिक स्वातंत्र्य आहे. आपल्या आयुष्याच्या विकासाचे मार्ग शोधण्याची आत्मनिर्भरता,स्वत्त्वाची जाणीव तिच्यात बऱ्याच प्रमाणात आहे. पण यापाठीमागे अनेक स्त्रियांच्या आयुष्यभराचा मोठा संघर्ष आणि सातत्याचा वारसाआहे. केवळ म्हणूनच आज अनेक शहरी, ग्रामीण स्त्रिया सक्षमपणे जगू शकतात. स्वत:बरोबरच समाजबदलासाठीही हातभार लावू शकतात.</span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">आजच्या युगाचे हे खरे आव्हान समाज,कुटुंब आणि व्यक्ती यांच्या मानसिक बदलाचे आहे. स्त्रीचे व्यक्तिगत अवकाश जितके व्यापक तितका त्या आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करू शकतात. म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा असलेला आजवरचा समज बदलून "पुरुष आणि स्त्री”यांच्या परस्परपूरक नात्याची गरज आजच्या युगाची आव्हाने पार पडण्यासाठी कुटुंबाला आहे. त्यांनी एकमेकांचा स्वीकार समानतेच्या पातळीवर करणे अपेक्षित असेल तर त्याची सुरवातही कुटुंबातूनच होऊ शकेल. कारण मुलगी आणि मुलगा दोघेही आपल्या कुटुंबातून जे मिळवतील त्यातूनच पुढे त्यांच्या भविष्यातल्या व्यक्त होण्याच्या पद्धती तयार होणार आहेत. स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे हे मुलांना आपल्याच घरातला अनुभव शिकवतो. आजूबाजूला हेच बघत,जाणवत मुलं मोठे होतात. जोपर्यंत पुरुष आणि त्याच्या सर्वार्थाने बरोबर असलेली स्त्री दोन्ही माणूसच आहेत,असे शिक्षण,संस्कार त्याला घरातूनच मिळत नाही तोपर्यंत तो तिला दुय्यमच समजत राहणार. आजही अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील मुलाला आणि मुलीला जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे वाढवले जाते. “स्त्री"ची माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र गणना, बरोबरी समाजात मान्य होईल या पातळीवरचा मानसिक बदल कुटुंबात होणे आज अपेक्षित आहे. कारण तिला ‘माणूस’ म्हणून मान्य करायला समाज अजूनही तयार नाही. तिच्यासाठी जगण्याचे निकषच वेगळे आहेत. ती ज्या कुटुंबात जन्माला येते त्यातल्या मान्यतांप्रमाणे आणि पद्धतींप्रमाणे ते आहेत. पालकांकडूनच असा फरक केला जातो. याचे कारण स्त्री निसर्गतःच वेगळी आहे असे सांगितले जाते. पण स्त्रीमधले नैसर्गिक स्त्रीत्त्व हीचतर तिची ताकद आहे. या वेगळेपणातच तिच्या सगळ्या क्षमता आहेत. केवळ ती ‘स्त्री’ आहे म्हणून असलेल्या मर्यादा नाहीत. पुरुषही निसर्गतः वेगळाच आहे पण ‘पुरुष’ असणे ही काही त्याची ‘गुणवत्ता’,‘दर्जा’ नाही. शरीरे वेगळी आहेत म्हणून त्यांच्या केवळ शारीरिक क्षमता वेगळ्या आहेत. या कारणासाठी स्त्रीच्या सर्वांगीण वाढीच्या संधी का मर्यादित असाव्यात? मानसिक,वैचारिक, बौद्धिक, तार्किक अशा अनेक बाजूंनी तर ती पुरुषांइतकीच सक्षम आहे. तिच्या जगण्याच्या नीतीमूल्यांबाबत परंपरेने बनवलेल्या फुटपट्टीनुसार वागायची फक्त तिच्यावरच सक्ती का? इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत,ओझ्याखाली फक्त तिनेच का राहावे? स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी,स्वतःचे अनुभव स्वतः घेण्यासाठी स्त्री पुरुषाइतकीच सक्षम आहे. पण काय योग्य काय अयोग्य हे तिच्या मनावर इतके बिंबवलेले असते की हे ओझे झटकून टाकून आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच तिला संघर्ष करावा लागतो. आपल्याला भविष्यातली इमारत पक्की हवी असेल तर कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात एकमेकांच्या क्षमतांचा,कौशल्यांचा आणि एकमेकांवरच्या विश्वासाचा पायाच मजबूत हवा. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते सुसंवादी आणि एकमेकांना सांभाळून घेणारे असेल तर मग कुटुंबातील आणि समाजातील पूर्वापार चालत आलेल्या अविवेकी धारणा, समजूती यांना पुरून उरण्याचे मानसिक धैर्य स्त्रीला मिळेल. या तकलादू चौकटी ओलांडून, आपण घेतलेले निर्णय स्वत: निभावून नेले तर तिला जगण्याचे समाधान मिळेल. कोणतीही चाकोरी मोडणे तसे सोपे कधीच नसते त्यासाठी खूप मोठे आत्मिक बळ लागते. म्हणूनच पूर्वी किंवा आजही आगळेवेगळे कर्तुत्त्व गाजवलेली स्त्री इतरांसाठी लगेच पूजनीय, जणू देवीच होऊन जाते. त्यावेळी तिच्या प्रवासातला सुरवातीचा टप्पा तिच्या हेतूंवर जहरी टीका करण्याचा,शंका घेण्याचा,तिचे पाय जमतील तसे आखडून ठेवण्याचाच होता हे सगळे सोयीस्करपणे विसरले जाते. एकतर अबला म्हणून तिला दाबून ठेवा नाहीतर सबला म्हणून तिची थेट पूजाच करा,अशी सवय आजवर समाजाला लागलेलीआहे. आपल्यावरील समाज संकेतांचे दडपलेपण दूर करण्यासाठी आपल्यापरीने धडपडणाऱ्या मध्यम मनोवृत्तीच्या इतर सगळ्या स्त्रियांना मग स्वतःच स्वतःसाठी उभे रहायला हवे. त्यांना एकमेकींचे अनुकरण करून जगण्याची गरज नाही. त्यांना आपले मत आहे,आवाज आहे. मुखवट्यांशिवाय असलेला खरा चेहरा आहे. स्वतःच्या समस्या नेमक्या समजून घेण्यासाठी त्यांना आपले विचार,संवेदना,भावना आणि जाणिवा स्पष्टपणे व्यक्त करता आल्या तर आपली मानसिक उर्जा एकमेकीना जोडण्यासाठी, संवाद, मंथन घडवून आणण्यासाठी त्या वापरू शकतील. सर्वसामान्य स्त्रीला विश्वासाने जगण्यासाठी स्वातंत्र्याचे मुक्त अवकाश जेव्हा तिच्या स्वत:च्या कुटुंबात आणि समाजात मिळेल तेव्हा खऱ्याअर्थाने स्त्रीशक्तीचा उत्सव साजरे करण्याची मानसिक,सामाजिक गरज संपेल,असे वाटते.</span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /><span style="font-size: 12pt;"> </span></span></p><p dir="ltr" style="line-height: 1.295; margin-bottom: 8pt; margin-top: 0pt;"><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"> <span id="docs-internal-guid-b4b2e3e5-7fff-53d6-8219-392d82d5b07f" style="font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline;">© डॉ.</span><span style="font-size: 12pt;">अंजली औटी </span></span></p><p dir="ltr" style="line-height: 1.295; margin-bottom: 8pt; margin-top: 0pt;"><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;">--</span><span style="font-family: "Nirmala UI"; font-size: 12pt; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; vertical-align: baseline; white-space: pre-wrap;"><br /><br /></span></p>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-37238158256067052182020-09-05T14:42:00.004+05:302020-09-05T14:42:45.704+05:30 प्रश्नांना उत्तरेही असतात <p> </p><p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><o:p> </o:p></span></p>
<p class="MsoNormal"><b><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">प्रश्नांना</span></b><b style="mso-bidi-font-weight: normal;"><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> <span style="mso-bidi-font-weight: bold;">उत्तरेही</span> <span style="mso-bidi-font-weight: bold;">असतात</span> </span></b><b style="mso-bidi-font-weight: normal;"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><o:p></o:p></span></b></p>
<p class="MsoNormal"><b style="mso-bidi-font-weight: normal;"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><o:p> </o:p></span></b></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">“<span lang="HI">तुला
काय सांगू</span>, <span lang="HI">दिवसाचे सोळा सोळा तास ड्युटी करून घरी आले तर घरातल्या
लोकांची तोंडं वाकडी</span>. <span lang="HI">तुला माहितीये ना नोकरी करण्यावरून झालेलं
महाभारत</span>? <span lang="HI">आता तर घरात कोणाला करोना झाला तर तो माझ्याचमुळे होणार
आहे</span>, <span lang="HI">कारण मीच एकटी बाहेर जाते ना</span>.” <span lang="HI">मैत्रिणीच्या
बोलण्यातला वैताग</span>,<span lang="HI">राग पोहोचत होताच</span>, <span lang="HI">शिवाय
तिच्या घरातले वातावरण</span>, <span lang="HI">प्रत्येकाच्या मनावर आलेला ताण तोही समजत
होता</span>. “<span lang="HI">माणसं मुळातून वाईट नाहीयेत ग</span>, <span lang="HI">पण
संधी आहे तर आत्ताच राजीनामा दे म्हणून मागे लागले आहेत</span>, <span lang="HI">काय
करू</span>?” <span lang="HI">अर्थात काय करायला हवंय हे तिचं तिलाही समजत होतंच पण बाहेर
आणि घरात परिस्थितीमुळे निर्माण झालेला ताण ह्याक्षणीतरी तिला असह्य झाला होता</span>.
<span lang="HI">सध्याच्या परिस्थितीत जुन्या प्रश्नाने उचल घेतली होती</span>. <span lang="HI">एका जबाबदारीच्या पोस्टवर काम करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला मनात निर्माण
झालेल्या भीतीचा आधार घेऊन ऐन मोक्याच्या क्षणी घरातल्या लोकांनीच कॉर्नर केल्यावर
तिने काय करायचं</span>? <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आठ वर्षांपासून
एका सोसायटीत राहणारे आजी</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">-<span lang="HI">आजोबा</span>, <span lang="HI">कोणाशी कधी बोलले नाहीत</span>. <span lang="HI">कोणाकडे कधी गेले नाहीत</span>. <span lang="HI">त्यांच्याकडे येणारी फक्त त्यांची
मुलगी आणि जावई</span>. <span lang="HI">अचानक चेअरमनला फोन करून रडत सांगतात</span>
“<span lang="HI">आमच्याकडे बघायला कोणी नाही</span>, <span lang="HI">आम्ही खूप जास्त
आजारी आहोत</span>, <span lang="HI">आमची मुलगी येत नाही</span>, <span lang="HI">आता आम्हाला
फक्त आत्महत्याच पर्याय दिसतोय</span>” <span lang="HI">सगळी सोसायटी हादरते</span>.
<span lang="HI">करायचं काय</span>? <span lang="HI">आजारी आहेत म्हणजे करोना तर नाही</span>?
<span lang="HI">मुलगीही येत नाही म्हणजे तसे असण्याची शक्यता</span>. <span lang="HI">मुलगी का येत नाही तर म्हणे जावई तिला आता येऊ देत नाही</span>. <span lang="HI">मुलगी वारंवार केलेले फोन कट करत राहते</span>, <span lang="HI">करोनाचा संशय
आणखी वाढतो</span>. <span lang="HI">त्यांना धीर दिला जातो</span>, <span lang="HI">काय
करता येईल यावर विचार</span>-<span lang="HI">विनिमय होतो</span>. <span lang="HI">शेवटी
जावयाच्या फोनवर मेसेज करून निरोप ठेवला जातो की</span> “ <span lang="HI">आम्हाला आलेल्या
फोनमुळे आणि तुम्ही फोन उचलत नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला हलवण्यापूर्वी आम्ही पोलिसांची
मदत घेण्याचा विचार करतोय आणि तुमचे नंबर पोलिसांना नाईलाजाने द्यावे लागत आहेत</span>”
<span lang="HI">पुढच्या पाच मिनिटात जावयाचा फोन येतो आणि पुढची सूत्र पटापट हलतात</span>.
<span lang="HI">आजोबा म्हातारपणामुळे आजारी असतात आणि आजी त्यांचं एकटीने करून दमल्यामुळे
त्रासलेल्या असतात</span>. <span lang="HI">अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेला
ताण त्यांना या टोकाकडे घेऊन आलेला असतो</span>. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><o:p></o:p></span></p><p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH6eEXvUlfRfzUzy63EwXvoSbpRAYr6vSNeCdXQMf5LZtJ2lpFpHFm-jUdAGiihGEZNWAwqs2O7IQJPMosLHMzgAwzHJVh0bXIhM62xsIb5SUkqoDfWHzpXQLqNKDgaItYuF3ipmGGDTk/s640/b12nature_animals_insects0301+%25282%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="480" data-original-width="640" height="375" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH6eEXvUlfRfzUzy63EwXvoSbpRAYr6vSNeCdXQMf5LZtJ2lpFpHFm-jUdAGiihGEZNWAwqs2O7IQJPMosLHMzgAwzHJVh0bXIhM62xsIb5SUkqoDfWHzpXQLqNKDgaItYuF3ipmGGDTk/w500-h375/b12nature_animals_insects0301+%25282%2529.jpg" width="500" /></a></div><br /><p></p>
<p class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आजूबाजूच्या
बदलत्या परिस्थितीतून निर्माण झालेले अनेक लहान</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">-<span lang="HI">मोठे प्रश्न</span>,<span lang="HI">समस्या</span>,<span lang="HI">ताण आणि त्यावर मार्ग शोधण्याची प्रत्येकाची आपल्यापरीने चाललेली धडपड असे
सध्याचे सामाजिक</span>,<span lang="HI">कौटुंबिक चित्र समजण्यासाठी ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक
आहेत</span>. <span lang="HI">अनेकांच्या आयुष्यात आधीचेच अनुत्तरित प्रश्न आहेत</span>.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">गेल्या पाच</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">-<span lang="HI">सहा महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक
लहानमोठ्या घडामोडी</span>,<span lang="HI">बदल वेगाने घडत आहेत</span>.<span lang="HI">आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीचा सामना करतांना आपण ना तिच्यापासून
पळून जाऊ शकत</span>, <span lang="HI">ना तिचा संपूर्ण प्रतिकार करणे आपल्या हातात आहे</span>.
<span lang="HI">मग </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">हातात काय </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आहे</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">? तर </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">परिस्थितीशी जुळवून </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">घेऊन </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आपल्या कुवतीप्रमाणे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">, <span lang="HI">जवळ असलेल्या कौशल्यांचा </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">योग्य </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">वापर करून मार्ग </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">काढणे.
प्रत्येकासमोरची आव्हाने,समस्या वेगळ्या असल्या तरी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">त्यासाठी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आपल्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">प्रत्येकाकडे असलेल्या आर्थिक</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,<span lang="HI">सामाजिक</span>,<span lang="HI">व्यक्तिगत क्षमता</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">ही</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">वेगवेगळ्या
आहेत</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">, <span lang="HI">मानसिकता वेगवेगळ्या आहेत</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">सगळ्या बाजूंनी निर्माण झालेला परिस्थितीमुळे
</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">असलेला हा </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">अनिश्चिततेचा</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">ताण हाताळण्यासाठी नेमके काय करायचे याच्या
जैविक</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,<span lang="HI">आदिमप्रेरणा आपल्या मेंदूत नक्कीच
आहेत</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">
</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">सुरवातीची घाबरण्याची</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">, <span lang="HI">अतिकाळजीची</span>, <span lang="HI">जीव एकवटून गोळा केलेल्या उत्साहाने आणि शोधलेल्या कल्पक मार्गांनी एकमेकांना
धीर देण्याची आणि घेण्याची जागा आता प्रत्यक्ष जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीने
घेतली आहे</span>. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">तरीही </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">काहीजण अजूनही स्तंभित आहेत काही हतबल</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,<span lang="HI">अगतिक</span>,<span lang="HI">असहाय होऊन टोकाची पावलं उचलत आहेत</span>. <span lang="HI">आपण आणि आपल्या जवळच्या
नात्यांचा विचार करणे</span>, <span lang="HI">त्यांना प्राथमिकता देणे काहीवेळा स्वार्थाकडेही
झुकल्यासारखे वाटतेय</span>. <span lang="HI">तर अनेकजण स्वतःबरोबरच इतरांना मदत करण्यासाठी
धडपडत आहेत</span>. <span lang="HI">प्रत्येक दिवसाचे नव्याने व्यवस्थापन करतांना प्रत्येकाला
वेगवेळ्या आघाड्यांवर काम करावे लागते आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक</span>,<span lang="HI">मानसिक</span>,<span lang="HI">शारीरिक आव्हानांचे प्रश्न आता खऱ्याअर्थाने सामोरे
आलेले आहेत</span>. <span lang="HI">ते कोणा एकट्याचे नाहीत तर आपल्या सगळ्यांचे</span>,
<span lang="HI">संपूर्ण समाजाचे आहेत</span>. <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">एकाच कुटुंबातल्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">व्यक्ती </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">सोडल्या तर </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवणं</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,<span lang="HI">स्पेस जपणं हे </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">सगळ्यांसाठी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">महत्त्वाचं आहे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">पण</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> सतत एकमेकांसोबत राहून </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">त्यांच्या मानसिक स्पेसवर तर आपल्याकडून अतिक्रमण
होत नाहीये ना</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">? <span lang="HI">हे</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">देखील समजून घ्यायला </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">हवंय</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. <span lang="HI">कोणतीही गोष्ट</span> ‘<span lang="HI">अति</span>’<span lang="HI">झाली की येणारं नकोसेपण</span>, <span lang="HI">परिस्थितीबद्दलची हताशा</span>,
<span lang="HI">अपरिहार्यता शेअर करण्यासाठी सध्या एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर आहेत
फक्त घरातली लोकं</span>, <span lang="HI">मग मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा करतांना
होणारी भांडणं</span>, <span lang="HI">कुरबुरी</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">ताणली गेलेली नाती</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">, <span lang="HI">एकूणच आलेला उबग</span>,<span lang="HI">कंटाळा</span>,<span lang="HI">ताण</span>,<span lang="HI">घुसमट याचं नेमकं काय
करायचं हे न समजल्यामुळे शाब्दिक</span>,<span lang="HI">मानसिक आणि </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">काही ठिकाणी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">शारीरिक तोल</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">ही</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">सुटतो आहे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. <span lang="HI">आक्रमकता</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">,हिंसा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">वाढते आहे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. <span lang="HI">मनात उमटणाऱ्या अशा अस्वस्थतेची योग्य ती दखल वेळीच घेतली नाही तर मनावरचा
ताण असह्य होऊन वागण्यावारचे नियंत्रण गमावून स्त्रियांवर</span>, <span lang="HI">मुलांवर</span>,<span lang="HI">वृद्ध व्यक्तींवर</span>, <span lang="HI">काही ठिकाणी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या
अनेक घटना सध्या समोर येत आहेत</span>. <span lang="HI">परिस्थितीवर तर राग काढता येत
नाहीये मग तो व्यक्तींवर</span>, <span lang="HI">वस्तूंवर आणि अगदी स्वतःवरदेखील काढला
जातोय</span>. <span lang="HI">हा ताण </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">कमी करण्यासाठी नेमके
काय करायला हवे, हे समजून घेता येईल.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आपल्या प्रत्येकाचे मन आणि शरीर निर्माण झालेल्या परिस्थितीशी अनुकूल
राहण्यासाठी प्रयत्न करत असते</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">.
<span lang="HI">त्यासाठी मनावर काहीप्रमाणात असलेला ताण हा मदत करणाराही असतो</span>,<span lang="HI">मार्ग काढणारा आणि आवश्यक असणारा असतो</span>. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">मग </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">अतिरिक्त असलेला आणि अनावश्यक ताण </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">वाढतो कसा</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">? <span lang="HI">तर तो</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> आपणच केलेल्या अतिविचारांनी
वाढत जा</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">तो</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. <span lang="HI">‘अनावश्यक ताण</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">’</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आहे हे कसे ओळखायचे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">? <span lang="HI">तर त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास जाणवत असेल तर</span>.
<span lang="HI">वर सांगितलेल्या मैत्रिणीच्या घरातल्या लोकांना</span> “<span lang="HI">आपल्याला करोना होईल</span>” <span lang="HI">अशी भीती वाटली तर तो आवश्यक ताण
असेल कारण त्यामुळे करोना होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जाईल</span>, <span lang="HI">पण त्यांना</span> “<span lang="HI">तिच्यामुळे करोना होणारच आहे</span>” <span lang="HI">असे वाटून त्यांच्याकडून तिच्यावर काही निर्णय घेण्यासाठी दबाव आणला जात आहे
तिथे तो</span> ‘<span lang="HI">अनावश्यक</span>’ <span lang="HI">ताण तयार झाला</span>.
<span lang="HI">आजी</span>-<span lang="HI">आजोबांच्या केसमध्ये त्यांना करोना झालाय या
भीतीमुळे त्यांचा जावई ऐन त्यांच्या आजारपणात त्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी जायला
अडवतो आहे</span>,<span lang="HI">हे वागणे अनावश्यक ताणाच्या प्रभावाखाली आहे</span>.
<span lang="HI">तर या प्रसंगामुळे कोणाला</span> “<span lang="HI">म्हातारे झाल्यावर आपली
मुलं आपल्याशी अशी तर वागणार नाहीत ना</span>?” <span lang="HI">असा मनात सतत उगीचच येणारा
विचार अनावश्यक ताण </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">आणि </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">समस्या वाढवणारा असतो</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">अशावेळी मनातले </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">विचार आणि भावना वेळीच तपासल्या नाहीत तर आपल्या वागण्यातून त्याचे प्रतिबिंब
दिसायला लागते</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">. <span lang="HI">प्रसंगानुरूप
वेगवेगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे आणि त्यांना अनुसरून वाटणाऱ्या आणि एरवी आपण
ज्यांना नकारात्मक समजतो त्या भावनादेखील नैसर्गिक आहेत</span>. <span lang="HI">पण त्यांचं
अधिक काळ मनात रेंगाळणं</span>,<span lang="HI">आणखी भर घालून आपलं त्या जास्त काळ चघळणं
यातून येणारा ताण हा त्या व्यक्तीचे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांचे नुकसान
करणारा असतो</span>, <span lang="HI">नातेसंबंध बिघडवून आयुष्यातला आनंद घालवून टाकणारा
असतो</span>. <span lang="HI">व्यक्तीच्या सवयी</span>,<span lang="HI">स्वभाव आणि व्यक्त
होण्याचे मार्ग आणि दृष्टीकोन आपल्याबाजूने ताणात भर टाकत असतात</span>. <span lang="HI">लहानपणापासून ज्या वातावरणात आपण वाढलो त्याचे</span>, <span lang="HI">कुटुंब</span>,<span lang="HI">समाज</span>,<span lang="HI">शाळा</span>,<span lang="HI">व्यवसाय अशा घटकांमधील
विविध अनुभव</span>,<span lang="HI">व्यक्तींचे प्रभाव त्यावर असतात</span>. <span lang="HI">ते इतके सवयीचे होतात की त्यातून घडणारा तोच</span> ‘<span lang="HI">आपला मूळ
स्वभाव</span>’ <span lang="HI">असा समज करून घेऊन आपण ते स्वीकारलेले असतात</span>.
<span lang="HI">पण आता लक्षात आलेच असेल की कोणाचाही स्वभाव</span>,<span lang="HI">वृत्ती
या जन्मजात नसतात</span>. <span lang="HI">मनावरच्या अनावश्यक ताणाचे</span> '<span lang="HI">नियमन</span>' <span lang="HI">करता येते त्यासाठी स्वतःला प्रतिप्रश्न विचारून
तो त्रासदायक का आहे हे समजून घेता येते</span>, <span lang="HI">स्वतःचे स्वतःला करणे
अशक्य होत असेल तर प्रत्येक पावलावर आपल्याला मदत उपलब्ध असते</span>. <span lang="HI">घटनांचे</span>,<span lang="HI">प्रसंगांचे आणि व्यक्तींचे मूल्यमापन करण्याचे
अनेक विवेकी पर्याय</span>, <span lang="HI">पद्धती उपलब्ध आहेत</span>. <span lang="HI">त्रासदायक ताणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं ही एकदाच करून भागेल अशी गोष्ट
नाही</span>. <span lang="HI">तो आपल्या स्वभावातील सातत्याचा आणि सरावाचा भाग बनायला
हवा</span>. <span lang="HI">तर सवयी बदलतील आणि स्वभावही बदलेल</span>. <span lang="HI">कारण आत्ता आपल्यासमोर असलेल्या परिस्थितीत जगण्याची आव्हाने कितीही कठीण आणि
प्रखर असली आणि संकटांमुळे पुढचा रस्ता कितीही अंधुक</span>,<span lang="HI">धूसर दिसत
असला तरी</span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span lang="HI">आपल्याच अंतर्विश्वात
स्वतःमध्ये त्यासाठी अनुकूल बदल घडवून आणण्याच्या असंख्य क्षमतादेखील आहेत</span>,
<span lang="HI">हे विसरून कसे चालेल</span>? <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">© <span lang="HI">डॉ
अंजली औटी </span></span></p><p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">(फोटो : गुगल)</span></p><p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";">लेख : दै. म टा 'मैफल पुरवणी'<br />
<br />
<br />
<br />
<br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><o:p> </o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-fareast-font-family: "Nirmala UI";"><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></p>ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-79356045822672401932020-03-29T15:24:00.002+05:302020-03-29T15:24:45.151+05:30एक क्षण स्वतःसाठी...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">माणसांना सगळ्यात जास्त भीती वाटत असते ती
अनिश्चित गोष्टींची. अंधार नकोस वाटतो. उजेडाचा हलकासा किरणही आधार देणारा</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">उबदार वाटतो.</span><br />
<span lang="HI">त्या प्रकाशात अनिश्चिततेवर मात करता येण्याच्या शक्यता दिसतात आणि
माणसं मार्ग काढतातही.</span><br />
<span lang="HI">कोणतेही संकट माणसाच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठे नसते. उलट संकट जितके
व्यापक तितकी त्यावर मात करण्याची आश्वासक ऊर्जा मनात निर्माण होते. ज्योतीने
ज्योत उजळत जा</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ते आणि</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
ती माणसांच्या मनामनात</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ला </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कानाकोपऱ्यात</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ला </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">अंधार निपटून टाकते.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> <br />
<span lang="HI">अशावेळी कितीही आत्मकेंद्री असलेली व्यक्ती तिने ठरवलं तर आपल्या
सवयींच्या कोषातून बाहेर पडू शकते. स्वमग्नतेच्या</span>, <span lang="HI">स्वार्थाच्या
भिंतींना तडे जातात. माणूस आपल्या व्यक्तिगत मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो. ही
वेळ असते आयुष्याचे खरे सौंदर्य मी</span>, <span lang="HI">माझं करण्यात नाही तर
एकमेकांच्या सोबतीत आणि सहचर्यात आहे याची नव्याने ओळख करून घेण्याची. कारण संकट
व्यक्तीवर येऊ दे किंवा समूहावर किंवा अखिल मानवजातीवर त्या संकटातले आव्हान जसे
तीव्र असते तसे त्यावर मात करण्याच्या शक्यताही अनेक असतात. त्यातूनच माणसातील
माणूसकी पुन्हा एकदा कात टाकून रसरशीत होण्याची सुरवात होते. </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">येणारा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">अनुभव खुल्या मनाने
घेण्याचे आव्हान प्रत्येक संकटात असते. इतिहास साक्ष आहे अशी माणसांच्या जगण्याला
आव्हान देणारी</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">माणुसकीची परीक्षा घेणारी अनेक संकटे
आपण आजपर्यंत परतवून लावली आहेत. कोणतेही संकट काळाच्या ओघात कधीही टिकलेले नाही. पण
त्याच इतिहासकडून आपल्याला विवेकी आणि अविवेकी निवडीचे परिणामही शिकायला हवेत.
म्हणजे मग लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाला या संकटकाळात स्वतःसाठी एक
"निवड" करायची आहे. म्हटलं तर ही एक संधी आहे</span>, <span lang="HI">म्हटलं
तर एक आव्हान आहे</span>, <span lang="HI">आपण त्याकडे कसं बघतो</span>, <span lang="HI">हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.</span> <br />
<span lang="HI">हीच संकटांची ताकद आहे. </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">कारण </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">संकटं स्वत:पलीकडे जायला
शिकवतात</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">नव्हे कसं जायचं याचे वेगवेगळे पर्याय शोधायला आणि निवडायला
शिकवतात. संकटं संकुचितपणाच्या मानवनिर्मित मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा
देतात. आपल्या आधी इतरांचा विचार करण्याची बुद्धी अशावेळी आपोआप सुचते. इतरांच्या
काळजी घेण्यातच आपलेही भले सामावलेले आहे याचा साक्षात्कार होतो. माणसांची
जीवनमूल्ये बदलतात आणि जगण्यावरची अम्लान श्रद्धा दृढ होते.</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9pniB3s8JzEHHDot2o2lZqq5EdfFP7ANhE086K6w06d4IJFlHAuZ8cUftz4mBnHch18lDUlpA6LyALo67QwnD8io_HpuYVYufj5OpTjHSiFPJ_OdFHd4Hwknit2KQfZBnFPNf1-Z_3Vc/s1600/5.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="198" data-original-width="254" height="498" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9pniB3s8JzEHHDot2o2lZqq5EdfFP7ANhE086K6w06d4IJFlHAuZ8cUftz4mBnHch18lDUlpA6LyALo67QwnD8io_HpuYVYufj5OpTjHSiFPJ_OdFHd4Hwknit2KQfZBnFPNf1-Z_3Vc/s640/5.jpg" width="640" /></a></div>
<br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p><br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">माझ्या मते </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आज </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">ती संधी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपल्याला </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आहे स्वतःसाठी एक पॉज</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">एक उसंत घेण्याची. तो घ्यायचा आहे आत्मपरीक्षण करण्यासाठी. आज
आजूबाजूचं जग थांबल्यासारखं वाटतंय कारण आपण थोडे स्थीर झालो आहोत. विश्वाची गती
अशी कासवासारखी होईल</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
कधी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">स्वप्ना</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">तही
आलं नव्हतं नाही</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">?</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सतत बाहेर धावणाऱ्या आपल्या शरीराचा वेग अचानक कमी झालाय</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">पण आपलं मन</span>? <span lang="HI">त्याने आपला वेग कमी केलाय का</span>?
<span lang="HI">की ते दुप्पट वेगाने कामाला लागलंय</span>? <span lang="HI">हेदेखील
तपासायला हवंय.</span><br />
<span lang="HI">ही संधी आहे</span>, <span lang="HI">धावणाऱ्या मनाला ब्रेक लावून हे
शोधण्याची की आयुष्यात जो मार्ग आपण निवडलाय तो आपल्यासाठी आणि आपल्या जीवलगांसाठी
योग्य दिशेने जाणारा आहे</span>?<br />
<span lang="HI">आजपर्यंत निसर्गातल्या पाच तत्त्वांकडून आपण सतत आणि अविरत फक्त
"घेत" आलेले आहोत</span>, </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">निसर्गाला
</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपण
कधी काय दिलंय</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">? <br />
'<span lang="HI">घेण्यातला</span>' <span lang="HI">आनंद आपण नेहमीच हक्काने अनुभवतो
पण </span>'<span lang="HI">देण्यात</span>'<span lang="HI">ला आनंद अनुभवण्यासाठी
आपल्या मनात पुरेशी जागा आहे</span>?<br />
<span lang="HI">त्यासाठी स्वतःपुरते प्रत्येकाला काय करता येणे शक्य आहे</span>? <span lang="HI">हे शोधण्याची ही वेळ आहे.</span> <br />
<span lang="HI">निसर्गतले केवळ सौन्दर्य टिपणारे आणि त्याबद्दल वरकरणी उमाळा
वाटणारे आपण प्रत्यक्षात जगण्यातल्या गरजांपायी निसर्गाला किती अपरिमित हानी
पोहोचवतो आहोत</span>, <span lang="HI">हे कधीतरी जाणवले आहे का आपल्याला</span>?<br />
<span lang="HI">आपल्या गरजा आपण तपासून बघितलेल्या आहेत</span>? <span lang="HI">आज
ती संधी आपल्याला आहे.</span><br />
<span lang="HI">कारण जर याबद्दल आजही पुरेसे जागरूक झालो नाही तर आपली इच्छा असो वा
नसो त्याच निसर्गतला एक यत्किंचित विषाणू आपल्या अस्तित्त्वालाच कसे आणि किती
आव्हान देऊ शकतो</span>, <span lang="HI">हे आपण सगळेच अनुभवतो आहोत ना</span>? <span lang="HI"><span style="mso-spacerun: yes;"> </span>ही संधी आहे</span>, <span lang="HI">निसर्गातल्या सौंदर्याबरोबर आपल्या जगण्याशी निगडित असलेले
"सत्य" जाणून घेण्याची. त्या सत्याचा आपल्यापुरता स्वीकार करण्याची. मी
स्वतःत बदल केला नाही तर माझ्यासमोरच्या परिस्थितीत बदल होईल हे वास्तव समजून घेऊन
माझ्या पातळीवर लहान-मोठे बदल आत्मसात करण्याची. आता तरी आपण सगळेच ते मनःपूर्वक
करूया</span>?<br />
<span lang="HI">पाणी</span>,<span lang="HI">कागद वाचवणे</span>, <span lang="HI">कमीतकमी
कचरा निर्माण करणे यासारख्या आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी आपण नक्कीच करू
शकतो</span>? <span lang="HI">इतकी साधी गोष्ट सांगतेय कारण आपल्यापैकी अनेकजण
अजूनही याबद्दल जागरूक नाहीत. कचऱ्याचे व्यवस्थापन</span>,<span lang="HI">पाणी जपून
वापरणे</span>, <span lang="HI">आजूबाजूच्या परिसराचे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून
भान ठेवणे हेदेखील आपल्याकडून कोणीतरी करवून घ्यावे लागते</span>?<br />
<span lang="HI">आज आपल्याला ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही अशा एका विषाणूची भीती
वाटते आहे</span>,<span lang="HI">पण अजूनही अनेकांना </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">त्याबद्दल </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">काहीच न वाटण्याइतपत
बेपर्वाई वाटते आहे. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">परिस्थितीचे
गांभीर्य न समजणारे लोक सगळ्यांचा त्रास मात्र वाढवत आहेत. </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">काही
लोकं इतकी घाबरलेली आहेत की त्यांना कुठूनही मिळालेली</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> कोणतीही माहिती अगदी खरी वाटते आहे.
काहींना आमचं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> असा आत्मविश्वास वाटतोय</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">काहींना अजूनही आपला दिनक्रम जराही बदललेला नाहीये</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> हे दाखवण्यात भूषण वाटतेय. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">दृकश्राव्य </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">माध्यमांना याही
परिस्थितीत बातमी चटकदार होण्याचा सोस </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">दिसतो </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आहे.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> आपण वापरलेले भडक रंग, आवाज आणि ट्यून कित्येकांच्या हृदयात धडधड वाढवतो आहे,की
यासाठीच ‘बातम्या’ तयार होतायेत?</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> दुकानदार मंडळी लोकांना
मदत करायची की आपण नफा कमवायचा या गोंधळात स्वतःला सांभाळत आपल्या सेवेचा </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">‘</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">रास्त मोबदला</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">’</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> मिळवण्याचा प्रयत्न करतायेत</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करणारे आणि स्वतःची
काळजी घेत दुसऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारे लोकही </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आजूबाजूला नक्कीच आहेत.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
यात मेडिकल क्षेत्राशी संबंधित</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">सुरक्षा आणि इतर
महात्त्वांच्या व्यवस्थेशी संबंधित लोकं तर आहेतच पण घरात राहूनही इतरांच्या अडचणी
सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे</span>,<span lang="HI">मार्ग सुचवणारे आणि प्रत्यक्ष
मदतीला तत्पर असलेली लोकंही आहेत. </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">एकूणच </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">एकाचवेळी अनेक गोष्टी घडतांना दिसतायेत.
माणसांच्याच एकमेकांशी वागण्याची वेगवेगळी रूपं दिसतायेत.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> <br />
<span lang="HI">एक यत्किंचित विषाणू दिवसेंदिवस </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">माणसाच्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">जवळ येऊ बघतोय </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तर </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">त्याला सामोरं जाण्यासाठी
आपण संपूर्णपणे तयार तरी आहोत का</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">? <span lang="HI">या प्रश्नाचा शोध </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">सगळ्या पातळ्यांवर घेतला जातोय. सगळेच सजग झाले आहेत,ही
चांगलीच गोष्ट पण हा शोध प्रत्येकजण स्वतःला वगळून घेतोय का, ते आपल्यालाच बघायला
हवंय. जगण्यातली जबाबदारी नाकारून कसे चालेल? <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तो शोध </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्या </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">सगळ्यांना </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आधी आपल्या रोजच्या
जगण्यातच घ्यावा लागेल. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपले</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
जगण्याचे मार्ग आणि पद्धती बघव्या लागतील. त्यामाग</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">चे</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> मनात</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ले</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">विचार</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,समाज,ग्रह,पूर्वग्रह </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आणि
दृष्टिकोन शोधावे लागतील.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> मग
लक्षात येईल या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सगळ्याचं मूळ आपल्या</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">च</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> आत </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तर आहे!</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">या संकटाचा सामना कसा करायचा अगदी याचंही</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> बळ आपल्यातच आहे. वर हे कसले थर आहेत मग? गरज
आहे,त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">ही संधी आहे विवेकाच्या काडीने मनातल्या ज्योतीची काजळी काढून
टाकण्याची. म्हणजे मनातले अंधारे कोपरे उजळतील</span>, <span lang="HI">असं करतांना
ज्योत विझणार नाही याची काळजी घेण्याची नजाकत आपल्या बोटांमध्ये आहे आणि मनातही. </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><span style="mso-spacerun: yes;"> </span>स्वतःच्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मनातल्या
चांगुलपणावर इतका विश्वास मला वाटतं आपल्या सगळ्यांचाच आहे!</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">आत्ता आपल्याला शक्य असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">या</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">स्वतःला आणि इतरांना होणारा
त्रास कमीतकमी कसा होईल हे तर नक्कीच बघू</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">या</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">. माझ्याकडून निसर्गावर
एकही ओरखडा उमटणार नाही याची काळजी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपण
नक्कीच </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">घेऊ शकतो.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">हे संकट आले तसे निघूनही जाणार आहे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि त्यानंतर मागे उरणार आहे या
संकटाची गोष्ट.</span> <br />
<span lang="HI">त्या गोष्टीत मला स्वतःबद्दल अभिमान वाटावा असं काहीतरी मागे उरेल
आणि त्याचा प्रकाश माझ्याबरोबर इतरांचंही आयुष्य उजळवून टाकेल ही संधी मात्र आज</span>,
<span lang="HI">आत्ता</span>,<span lang="HI">आपल्यासमोर असलेल्या </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आजच्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">क्षणात आहे!</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span><span style="font-family: "Nirmala UI", sans-serif; font-size: 12pt;">© </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI", sans-serif; font-size: 12pt;">डॉ. अंजली औटी </span></div>
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ansi-language: EN-IN; mso-bidi-language: HI; mso-fareast-font-family: Calibri; mso-fareast-language: EN-US; mso-fareast-theme-font: minor-latin;">
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br />
<!--[endif]--></span><div class="MsoNormal">
<span style="color: #202124; font-family: "Nirmala UI", sans-serif; font-size: 12pt; letter-spacing: 0.133333px;">(महारष्ट्र टाइम्स 'मैफल पुरवणी ) 28 मार्च 2020</span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="color: #202124;"><span style="letter-spacing: 0.133333px;"><br /></span></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="color: #202124;"><span style="letter-spacing: 0.133333px;">फोटो स्त्रोत : गुगल</span></span>
<br />
<br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p></span></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-22643124556923537502020-03-28T08:16:00.001+05:302020-03-29T15:17:08.810+05:30लैंगिक भूमिकेचा स्वीकार <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">त्यापेक्षा धरणी
दुभंगून पोटात घेईल तर बरं..काय पाप केलं म्हणून हे सगळं आपल्या वाट्याला. आता कसं
तोंड दाखवायचं कोणाला? आणि सांगायचं काय?” ही होती शुभदाची पहिली प्रतिक्रिया
ज्यावेळी तिला नीराविषयी समजलं. बसलेल्या मानसिक धक्क्याने आत्तापर्यंत जपलेलं,सावरलेलं
तिचं त्रिकोणी जग कोलमडून पडलं होतं. हातापायातलं त्राणच निघून गेलं. </span><span lang="EN-US" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">झालं असं की त्यांच्या
मुलीने नीराने, जी परदेशातील शिक्षण संपवून तिथेच एका मोठ्या कंपनीत चांगल्या
पोस्टवर काम करत होती. तिने आपल्या बाबांना अगदी स्पष्टपणे कसलीही सारवासारव न
करता आपण सेक्शुअली इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत आणि गेल्या सहा महिन्यांपासून
सुझानसोबत एकत्र रहात आहोत हे फोनवर सांगितलं. तिच्या या सांगण्याचा त्यांना धक्का
बसलाच नाही, असे नाही. पण त्यांनी त्यावेळी आलेली सगळी अस्वस्थता अत्यंत संयमाने
हाताळली. आपल्या आधी कसं काहीच लक्षात आलं नाही याचा त्यांना खेद वाटला. त्यांचे
सगळे कुटुंब,नातेवाईक आणि मित्रपरिवार अत्यंत सुशिक्षीत, सुसंस्कृत, पुरोगामी,
मोकळ्या विचारसरणीचे होते. पण असे एखादे जगावेगळे पाऊल प्रत्यक्ष उचलण्याची वेळ
आली तेव्हा त्यांच्याही मनावर विलक्षण ताण आलाच. शुभदापासून हे लपवणं शक्यच नव्हतं.
नाहीतर नीरा स्वतः आईशी बोलायला तयार होती. पण तिला सांगण्याची जबाबदारी त्यांनी
स्वतःहून स्वीकारली. त्याआधी नीराचं म्हणणं हे परदेशातलं केवळ एक फॅडतर नाहीये ना,
आपल्या भावनिक-मानसिक गरजा भागवण्याचा तिने शोधलेला केवळ एक मार्ग तर नाहीये ना याची
त्यांनी खात्री करून घेतली. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPmwak7UcxvHYAhh53QNM2a_As0vRFVaIwnvKTGLGmLGU3zcslBeybg9gj0yqrq0jXbE0eYtgkwQluFjTrMZorRJiue7h4ffHcGKsNDrMTkxDmhF0j9p94YabMlOT1lFrZ6n-3Qj_n5rQ/s1600/ls.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="490" data-original-width="750" height="418" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPmwak7UcxvHYAhh53QNM2a_As0vRFVaIwnvKTGLGmLGU3zcslBeybg9gj0yqrq0jXbE0eYtgkwQluFjTrMZorRJiue7h4ffHcGKsNDrMTkxDmhF0j9p94YabMlOT1lFrZ6n-3Qj_n5rQ/s640/ls.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मोठं होतांना समज येऊ
लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची नीराला होत गेलेली जाणीव, त्यानंतर
घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि मागच्या पाच वर्षात सुझानसोबत आपल्या विचारांमध्ये
आणि समजूतींमध्ये आलेली स्पष्टता,त्यातून झालेले बदल,स्वीकाराची प्रक्रिया, असा
सगळा प्रवास नीराने बाबांना विनासंकोच,अगदी मोकळेपणानं सांगितला. एकमेकींसोबत
आयुष्य सुखाने घालवू शकतो ही खात्री झाल्यावर आता दोघीही आपल्या नात्याचा कायदेशीर
स्वीकार करायला तयार होत्या. सुझानच्या घरच्यांची याला परवानगी होती. आता प्रश्न
होता नीराच्या घरी सगळं सांगण्याचा. <span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">शुभदाचा अंदाज घेऊन बाबांनी
तिला याबद्दल सांगितले तर खरे पण त्यानंतर तिची जी काही प्रतिक्रिया झाली त्यातून
गेल्या तीन महिन्यांपासून दोघेही वेगवेगळ्या मानसिक दबावाखाली जगत होते.<span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span>कासावीस
मनाने शुभदाने स्वतः </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">ही गोष्ट </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्या जीवलग
मैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितली. कोणीतरी तर आपल्या मुलीला
त्यापासून परावृत्त करण्याचा उपाय सांगेल. पण त्यांच्यासाठीही हे काहीतरी अघटितच
होतं. तोपर्यंत असं वाटत होतं की असं काही फक्त सिनेमात दाखवतात. आणि प्रत्यक्ष
आयुष्यातही घडत असेल कोणाच्या तरी ते जग काही आपलं नाही. अतिश्रीमंतांचे असतात हे सगळे
चोचले. आपल्यासारख्यांच्या घरांमध्ये आजपर्यंततरी ऐकलं नाही असं काही. त्यांनाही शुभदासारखाच
धक्का बसला,पण या क्षणी मात्र स्वतःला सावरून सगळ्यांनी शुभादाचेच सांत्वन करायला
सुरवात केली. कितीही हुशार असली म्हणून काय झालं, नीराला बारावीनंतर लगेच परदेशात शिकायला
पाठवलं तेच चुकलं. त्याचाच हा परिणाम.उच्च शिक्षणाचे फायदे असतात तसे तोटेसुद्धा. ताबडतोब
भारतात बोलावून तिचं लग्न लावून द्यायला पाहिजे, मदत राहिली बाजूला पण असल्या <span style="mso-spacerun: yes;"> </span>बडबडीचा उबग येऊन शुभदा एकदम जी गप्प झाली ती
आपल्या रूममधून बाहेरदेखील पडेनाशी झाली. एरवी शांत आणि संयमी असणाऱ्या शुभदाची
आता बाबांना काळजी वाटायला लागली. मनातला गोंधळ आणि कालवाकालव थोडी शांत झाली की
ती आपोआप सुसंगत विचार करायला लागेल आणि मग हळूहळू तिला बोलतं करता येईल असा
विश्वास आणि अनुभवही त्यांना होता.झालंही तसंच. काही दिवसांनी शुभदा थोडी स्थीर
झाल्यासारखी वाटली आणि मग बाबांनी मदत घेतली. मित्र आणि नातेवाईक सोडून त्रयस्थ
दृष्टीकोनातून विचार करू शकणाऱ्या मानसतज्ञांची. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपलं मूल हे कितीही
आपलं असलं तरी त्याचं आयुष्य आपल्याला नाही तर त्याचं त्यांनाच जगायचं असतं हे आपल्या
आयुष्यात पालकांना कधीतरी मान्य करावंच लागतं. त्यांचा रस्ताही वेगळा असतो आणि
त्यावरचा प्रवासही. आपल्यापैकी प्रत्येकजण जसा वेगळा असतो तशाच प्रत्येकाच्या गरजादेखील
वेगळ्या असतात. त्या गरजा भागवण्याचे पर्याय,मार्ग माणसे शोधतात. माणसांच्या आर्थिक,सामाजिक
गरजा जशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असतात तशाच वैचारिक,भावनिक आणि शारीरिक गरजादेखील.
समाज पातळीवर सर्वांना सुस्थितीत राहण्यासाठी सोय म्हणून आपणच काही नियम बनवतो.
काही परिस्थितींमध्ये त्यात बदलदेखील केला जातो. <span style="mso-spacerun: yes;"> </span>कोणाशी लग्न करायचं,करायचं की नाही? असे निर्णय पूर्णपणे
व्यक्तिगत असले तरी त्याला सामाजिक पैलूही असतो. कारण आपला समाज आपल्याच आजूबाजूला
असलेले लोक असतात आणि आपल्या निर्णयांचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. असे असले
तरी प्रत्येकाचे आयुष्य हा त्याचा खूपच व्यक्तिगत प्रश्न आहे. जगतांना आपण इतरांना
त्रास होणार नाही अशी कोणती जीवनशैली स्वीकारायची हे ठरवण्याचा हक्क प्रत्येक
व्यक्तीला आहे. कारण आपण लोकशाही एक मूल्य म्हणून स्वीकारलेले आहे. कोणत्या
व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवायचे हा निर्णय दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर सहमतीने
आणि स्वीकाराने असेल तर त्याला इतर कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समलिंगीसंबंध भारतासह जगभरातील
अनेक देशांनी कायदेशीर मानलेले आहेत. यामागे लोकशाहीतले व्यक्तिस्वातंत्र्य हेच
मूल्य प्रामुख्याने जपलेले आहे. म्हणजे ‘समाजमान्यता’ हा मुद्दा तसा गौण आहे. शुभदासारखी
व्यक्ती घाबरते कशाला तर शक्यतो परंपरांनी घालून दिलेले नियम आणि चौकटी मोडायला. कारण
त्यामागे असुरक्षितता येते. कधी ती थेट सामाजिक स्वीकाराची असते तर कधी इतर चारचौघींसारखे
आपल्या मुलीचे जग का नाही,याबद्दल असते. त्यात अनिश्चित भविष्याची अकारण चिंता सामावलेली
असते. माणसांना चाकोरीत जगणे का आवडते? कारण ते सगळ्यात जास्त सुरक्षित असते म्हणून.
त्यात संघर्ष नसतो. चाकोरी तोडण्यातून निर्माण झालेली जगण्याची आव्हाने,संघर्ष आपल्या
मुलीला झेपतील का याचीही काळजी आईला वाटू शकते.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">पुरुष म्हणून किंवा
स्त्री म्हणून आजपर्यंत निभावत आणि मान्य असलेल्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन या
प्रश्नाचा एक माणूस म्हणून विचार करणे आपल्या सगळ्यांसाठीसुद्धा महत्त्वाचे आहे.
त्यापलीकडेही माणसात काही क्षमता असतात त्यांचा स्वीकार व्हायला हवा. शुभादालाही
आपल्या वाटण्याचा खोलवर विचार हळूहळू करावा लागला. त्यानंतर स्वीकाराच्या दिशेने
प्रवास सुरु झाला. निर्माण झालेली परिस्थिती काही आपल्या हातात नाही. नीराच्या या
निर्णयामुळे ‘आई’म्हणून तिच्यावर संस्कार करायला ‘मी कुठे चुकले का’ हा विचार
संपूर्णपणे वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाणारा आणि नुकसान करणारही आहे, हे तिच्या लक्षात
आले. त्यापेक्षा तिला असे आकर्षण नैसर्गिकपणे असू शकते हे मान्य करून <span style="mso-spacerun: yes;"> </span>केवळ ‘समाज काय म्हणेल’ आणि ‘लोक काय म्हणतील’
याचा विचार करणे आणि तिच्या मनातल्या इच्छा दडपून,तिच्यावर भावनिक दबाव टाकणे हा
तर तिच्यावर अन्याय आहे. आपला नैसर्गिक कल समजण्याइतकी आणि आयुष्याचे निर्णय घेण्याइतकी
ती सक्षम,स्वतंत्र आहे, हे तिनेही मान्य केले. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समलैंगिकतेच्या संदर्भात
हेदेखील वास्तव आहे की आपला नैसर्गिक कल नीट समजण्याआधीच काही कारणांमुळे अनेकांच्या
लैंगिक जाणीवांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. त्यात समवयीन लोकांच्या सवयी,माध्यमांमधून
दाखवलेल्या अतिरंजित गोष्टी, यौनशोषणासारख्या अपप्रवृत्तीचा लहान वयात आलेला अनुभव
असे अनेक घटक असू शकतात. गोंधळलेल्या अशा तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शनातून
आपल्या लैंगिक गरजांची ओळख करून घेता येऊ शकते. म्हणजे त्यांना दुहेरी लैंगीकता
स्वीकारण्याची गरज उरणार नाही. त्यातून जर ते खरोखरच समलिंगी आहेत हे लक्षात आले
तर संपूर्ण कुटुंबाचे या प्रश्नावर गंभीरपणे वैचारिक मंथन गरजेचे आहे. कारण त्यावर
भलतेच उपाय केले गेले तर होणारे दुष्परिणाम फक्त त्या एका व्यक्तीवर नाही तर
संपूर्ण कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर होऊ शकतात. शिवाय बळजबरीने त्यांचे इतर
कोणाशी लग्न लावून देणे म्हणजे तर ते अनेक संभाव्य संकटाना आमंत्रण असते. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समलिंगीसंबंधाना
कायद्याची मान्यता असली तरी तशी समाजाची संपूर्ण मान्यता अजूनही नाही. म्हणून यासंदर्भात
निर्माण झालेले पेच शिक्षण,समजूतदारपणा आणि सहकाराच्या मार्गे विवेकाच्या प्रकाशात
सोडवायला हवेत. भिन्नता स्वीकारात जशी आहे तशी नकारातसुद्धा आहेच. ज्यांच्या
लोकांपासून,घरांपासून हा मार्ग दूर आहे त्यांनी या मार्गाचा संपूर्णपणे निषेध
करण्याची एकांगी भूमिका घेण्याचीही गरज नाही. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समलिंगी लोकांनीही
आपली लैंगिक गरज नीट समजून घेऊन, आपल्या भूमिका आग्रही,आक्रमकपणे न मांडता ही
गोष्ट खाजगी,संपूर्णपणे वैयक्तिक आहे हे लक्षात घेतले तर कदाचित संघर्षाशिवाय
त्यांच्या <span style="mso-spacerun: yes;"> </span>वेगळेपणाचा स्वीकार करणे इतरांना
शक्य होईल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समाज म्हणून जगण्याच्या
अशा वेगळ्या वाटांच्या शक्यता असू शकतात, हे आता आपल्याही लक्षात येत आहे. आपल्या
आजूबाजूला असलेली नवीन पिढी अनेक पातळ्यांवर बदलणारे वास्तव जगते आहे, जशी शुभदाची
नीरा जगाच्या पातळीवर आपली स्वतंत्र ओळख रुजवते आहे. हा होणारा बदल फक्त त्यांचा
नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे असा समंजस विचार करणे हा आपल्याही प्रगल्भ होण्याचा
प्रवास आहे. <span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">©</span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> डॉ
अंजली औटी</span><span style="background: white; color: #222222; font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span><br />
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;">(महारष्ट्र टाइम्स, 'मैफल पुरवणी")</span></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-67427604247186817612020-03-21T09:31:00.002+05:302020-03-21T09:38:54.503+05:30पैशाची जादू... <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">"<span lang="HI">सोड ना</span>,<span lang="HI"> तुला कधीच
कळणार नाही" अचानक तो म्हणाला आणि त्या दोघांनी विषय बदलला. मैत्रिणीच्या
नवीन जॉबबद्दल बोलत होते दोघं. कधीकधी भाषा</span>,<span lang="HI">बोलणं</span>,<span lang="HI">आवाज</span>,<span lang="HI">टोन सगळं योग्य असूनही संवाद अशक्य होतो,जणू
त्यासाठी ऐकणाऱ्याचे कान बंदच झालेले असतात. </span><br />
"<span lang="HI">मस्तपैकी रोज नवीन हॉटेल्स</span>,<span lang="HI"> फूडजॉइन्ट्समध्ये
जायचं</span>, <span lang="HI">पदार्थ टेस्ट करायचे आणि त्यावर रिव्ह्यू देणारा
व्हिडीओ शूट करून कंपनीमार्फत तो यूट्यूबवर अपलोड करायचा" यावर दुसऱ्याचं
म्हणणं होतं, "पण यात पैसे कितीसे मिळणार</span>? <span lang="HI">इतकं
शिकल्यावर हा कसला जॉब</span>?"<br />
"<span lang="HI">अरे पण ती किती एन्जॉय करतेय"</span><br />
"<span lang="HI">माझ्यामते टाईमपास आहे नुसता</span>, <span lang="HI">पैसे
कमवायचे दिवस वाया कशीकाय घालवतेय?"</span><br />
"<span lang="HI">अरे,शेवटी पैसे कशासाठी मिळवायचे</span>? <span lang="HI">काम
करण्यातला आनंद महत्त्वाचा की पैसे</span>?"<br />
<span lang="HI">दुसऱ्याला मात्र त्याचं बोलणं पटत नव्हतं</span>,<span lang="HI">
शेवटी विषय थांबला.</span><br />
<span lang="HI">पैसे कमावणं महत्त्वाचंच पण त्याशिवायही पहिल्यासाठी जगण्याचा केंद्रबिंदू
आनंद</span>,<span lang="HI">समाधान. तर दुसऱ्यासाठी केंद्रबिंदूच पैसा, आर्थिक
समृद्धी. मग आनंद आपोआपच मिळतो.</span><br />
<span lang="HI">यातल्या कोणाचं बरोबर</span>? <span lang="HI">हा प्रश्नच इथे
गैरलागू. कारण दोघेही आपापल्या दृष्टीने बरोबर. दोघेही आपापल्या भूमिकांमधून एकाच
परिस्थितीचा विचार करतायेत. आयुष्यातली आपली निवड करतायेत. </span><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">यात समस्या तेव्हा तयार होते ज्यावेळी
स्वतःला किंवा दुसऱ्याला आपली निवड त्रासदायक व्हायला लागते. अर्णवला पैसे चोरायची
सवय लागली होती. मागितले तर घरातून त्याला मिळणार होते</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">मग तो चोरतो का</span>? <span lang="HI">काही मानसिक आजार तर नाही ना याची
खात्री करून झाली. असे काहीही नव्हते</span>,<span lang="HI">मग काय कारण, ते
शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. लक्षात आले की त्याच्यासाठी ते केवळ एक थ्रील होते!
न मागता मिळणाऱ्या गोष्टींनी त्याला आयुष्य मिळमिळीत वाटत होते. मग कधीतरी गंमत
म्हणून केलेली गोष्टच नंतर सवयीत बदलली. पैशांपेक्षाही ते मिळवण्याचा मार्ग मनाला झिंग
देई. म्हणून दरवेळी मोठे धाडस. हे दुष्टचक्र त्याला कुठल्या दिशेने नेत होतं
त्याला समजतही नव्हतं.</span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मनोहरकडे वडिलोपार्जित श्रीमंती. तिचा गर्व
वागण्या-बोलण्यात. त्यापुढे सगळं तुच्छ. पैसे फेकले की वाट्टेल ते मिळतं या विश्वासावर
जगत राहिले आणि जवळच्या नात्यांचा वेळोवेळी अपमान</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">पाणउतारा
करत गेले. जवळची लोकंही आपोआप पांगली. अंगात रग होती तोपर्यंत ऐश केली पण हातपाय
थकत गेले तसं एकटेपण आलं. शेवटीशेवटी तर विस्मृतीची व्याधी जडली आणि स्वतःची ओळखही
विसरले. आपल्याकडे किती पैसे</span>,<span lang="HI">कुठे ठेवले आहेत कशाचाच पत्ता
नाही. एकट्यानेच मरण आलं तेही आजूबाजूच्या लोकांना आठ दिवसांनी समजलं. जवळ पैसे तर
उरले पण माणसं? </span><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपला मुलगा अत्यंत आक्रमक,उद्धट आहे</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">घरीदारी भांडणं</span>,<span lang="HI">मारामाऱ्या करतो म्हणून त्याला घेऊन
आलेल्या तरुणाचे वडील सांगत होते</span>, “<span lang="HI">आजवर मी त्याला काहीही
कमी पडू दिलेलं नाही. चांगल्या इंग्रजी शाळेतील शिक्षण</span>, <span lang="HI">मॅनेजमेंट
कोट्यातून इंजिनिअरिंगची अॅडमिशन. मोटारसायकल</span>,<span lang="HI">पॉकेटमनी. मी
एकवेळ कर्ज काढेन</span>,<span lang="HI">शेती विकेल पण मला वाटतं “मी जशा अभावात
जगलो तसं आयुष्य माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये” ही वडिलांची प्रेमाची भाषा.
आपल्याला न मिळालेलं मुलाला मिळावे. पण त्यांना अपेक्षित ते न घडता मुलागा वेगळेच
वागतोय, कारण त्याला खात्री आहे, आपण कसेही वागलो तरी पैशाने आपल्याला सांभाळून
घेणारे वडील खंबीर आहेत. त्यांचे काबाडकष्ट,तडजोडी याकडे दुर्लक्ष करून तो स्वतःचा
आनंद शोधतोय. त्यांची ‘समस्या’ त्यांच्या <span style="mso-spacerun: yes;"> </span>‘विचारांमध्ये’
तर नाही? </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span lang="HI"> </span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9t-PQVi9aB32kEGGsyH2bxkTzoEUdTdX9Isz2_ZEF9EI6-Ts1ETu0s5sfw4IC8ExFbxldfNAT4tVj_-5gVj2XLT5l6JL-zb9gh9AVOTRbxafFJ2BM_-krng9GH4_O5dHIK1TrEZPLekU/s1600/2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9t-PQVi9aB32kEGGsyH2bxkTzoEUdTdX9Isz2_ZEF9EI6-Ts1ETu0s5sfw4IC8ExFbxldfNAT4tVj_-5gVj2XLT5l6JL-zb9gh9AVOTRbxafFJ2BM_-krng9GH4_O5dHIK1TrEZPLekU/s640/2.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span lang="HI"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">वर उल्लेखलेल्या सगळ्यांची कौटुंबिक,सामाजिक
परिस्थिती वेगवेगळी आहे. वय,विचारसरणी आणि निर्णयप्रक्रिया वेगवेगळी आहे. पण
संघर्ष तोच आहे, पैशांमधून मिळणारा आनंद? की त्यापलीकडे असलेला आनंद? कोणत्या
दिशेने शोध घ्यायचा,याचा निर्णय प्रत्येकाचा वेगळा. कुटुंबासहित आनंदाने
जगण्यासाठी लागणारं पैसा हे एक साधन आहे आणि आयुष्याचे साध्य असलेला खरा ‘आनंद’ उपभोगायला
काहीच लागत नाही, हे समजण्यासाठी आधी आपल्याला जाणीवेने जगणं तर शक्य आहे? </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">एकदा पालकत्त्वावरच्या एका कार्यशाळेत
कुटुंब</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">एकमेकांमधली नाती या मुद्द्यावर चर्चा सुरू असतांना</span> "<span lang="HI">माणूस म्हणून आपल्या जगण्याचा आधार काय असतो</span>? <span lang="HI">तुम्हाला
काय वाटतं</span>?"<br />
<span lang="HI">या प्रश्नाला अनेकांनी ‘पैसे’किंवा ‘आर्थिक स्थैर्य’असं उत्तर दिलं.
आजच्या</span> <span lang="HI">काळाचा विचार केला तर मला हे प्रातिनिधिक वाटतं.
पैसे हे केवळ आपण स्वयंपूर्ण असण्याशीच निगडित नाहीत तर समाजात आत्मविश्वासाने
जगण्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे सर्वमान्य आहे पण जगण्याचा आधार
तोच एकमेव वाटावा इतपत? <span style="mso-spacerun: yes;"> </span>माणूस म्हणून
आपल्या एकमेकांशी असलेल्या नात्यात याचं स्थान कुठे आहे? जवळच्या नात्यांवरदेखील
या दृष्टिकोनाचा प्रभाव असावा इतकं प्रभावी ते आहे का? नात्यांमध्ये एकमेकांबद्दल
जाणवणारी भावना सगळ्यात प्रभावी असते की व्यवहार? </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातून काय
पोहोचतंय आपल्याला? आपण काय घेतो? अजून संस्कारक्षम असलेली आपली मुलं काय घेत
आहेत? सजग, सावध असायला नको? </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आजूबाजूला असलेल्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे
इतरांचे वागणे</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">बोलणे</span>, <span lang="HI">सवयींमधल्या
वेगळ्या गोष्टीं</span>, <span lang="HI">विरोधाभास याकडे मुलांचं कुतूहल वळतं. येणाऱ्या
कोणत्याही अनुभवाचा अर्थ त्यावेळी जरी पूर्णपणे समजला नाही तरी त्या अनुभवात
जाणवणारी भावना मुलांच्या मनात घर करते</span>, <span lang="HI">त्यातून त्यांची
स्वतःची, इतरांबद्दलची समज</span>,<span lang="HI">वेगवेगळ्या धारणा तयार व्हायला
लागतात.</span><br />
<span lang="HI">आजूबाजूला असलेल्या लोकांचं एकमेकांशी, पैशांशी असलेलं नातं
विश्वासाचं आहे की अभावाचं आहे</span>,<span lang="HI">असुरक्षिततेचं आहे की भीतीचं
आहे</span>, <span lang="HI">तिरस्काराचं आहे की उदासीनतेचं आहे यातून त्यांचाही पैशांकडे
बघण्याचा दृष्टीकोन घडत जातो. ही एक चौकट असते</span>,<span lang="HI">अनुभवांनी दृढ
होत जाणारी. विचार</span>,<span lang="HI">भावना आणि वागण्यावर प्रभाव टाकणारी. निर्णयप्रक्रियेला
आकार देणारी. याच टप्प्यावर कधीतरी पैशांशी प्रत्यक्ष पहिली ओळख होते.आईच्या कडेवर
बसलेल्या लहान मुलांच्या हातात पाहुण्यांनी पैसे दिले तर तुम्ही कधी बघितलंय
त्यांनी ते फाडून टाकले आहेत</span>? <span lang="HI">ते महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या
डोळ्यातली चमकच सांगते. पैसे जमा करणं</span>,<span lang="HI">मोजणं आणि मन:पूर्वक
जपणं यातून त्याचंही पैशांशी नातं जुळायला सुरवात होते. घरात पुरेसे पैसे असतील
आणि नसतील तर त्यातून येणारे अनुभव त्यांना शिकवत जातात. पैसे वापरून आनंद मिळतो</span>,
<span lang="HI">अनेक गोष्टी सोप्या होतात यातून पैशांची सांगड आनंदाशी,सुखाशी आहे यासारखे
समज तयार व्हायला लागतात. कुटुंबातल्या वातावरणातून मिळालेली मूल एकतर स्वीकारणार
किंवा नाकारणार. जास्तीतजास्त पैसा मिळवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे हे जसे एखाद्याच्या
मनावर बिंबते तशी त्याबाबतीतली तटस्थता,उदासीनताही मनात रुजू शकते. </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मोठ्यांच्या वागण्याच्या प्रकाशात मूल
स्वतःच्या मनाशी नकळत अंदाज,आडाखे बांधत जाते. कुटुंबाचा उंबरठा ओलांडून मुलं
ज्यावेळी परिसराशी आणि समाजाशी जोडली जातात त्यावेळी हा परीघ आपोआप विस्तारत जातो कारण
जवळ भरपूर पैसा असूनही गरजेसाठीसुद्धा खर्च करायला राजी नसलेली माणसे आजूबाजूला
असतात <span style="mso-spacerun: yes;"> </span>तशी जवळ पैसे नसतांनाही कर्ज काढून
मौजमजा करणारेही अनेक असतात. स्वतःकडे जे असेल ते <span style="mso-spacerun: yes;"> </span>मन:पूर्वक देऊन दुसऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे
लोक असतात तर केवळ स्वतःपुरतं बघणारेही असतात. श्रीमंतीचे प्रदर्शन करणारीही, सगळं
असूनही माझ्याकडे काहीही नाही,दाखवणारी, एकमेकांना फसवणारी</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">हिसकावून घेणारी</span>,<span lang="HI">उधळी</span>,<span lang="HI">काटकसरी</span>,
<span lang="HI">कद्रू</span>,<span lang="HI">कंजूस</span>, <span lang="HI">हिशेबी</span>,<span lang="HI">व्यवहारी</span>,<span lang="HI">दानशूर अशा अनेक शब्दांनी ज्यांचे वर्णन
केले जाते अशी सगळी माणसे आपल्या आजूबाजूला असतात. भावना बाजूला ठेऊन निर्ममपणे
व्यवहार बघणारी, आई-वडिलांना निराधार सोडून पैशांअभावी हाल सोसायला लावणारी, वेगवेगळ्या
वृत्ती-प्रवृत्ती विचारांची माणसे असतात. विचारांच्यामागे असलेल्या त्यांच्या मनातल्या
धारणा त्यांना विशिष्ट भूमिका घ्यायला भाग पडतात. एकमेकांशी असलेल्या संबंधांवर
प्रभाव असलेला घटक आहे पैसा. एकमेकांमधला ‘विश्वास’ आणि ‘प्रेम’ठरवणारा घटक आहे
‘पैसा’. </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">केवळ योग्य, अयोग्य या साच्यात न बसवता आपलं
त्याच्याशी जोडलं गेलेलं नातं शोधायला हवं. कारण पैसा तटस्थ आहे, त्याचे मूल्य
आपल्या ठरवण्यावर अवलंबून आहे. त्याआधी माझं इतरांशी आणि खुद्द माझ्याशीही असलेलं
नातं काय आहे, हेदेखील त्या प्रकाशात तपासून बघायला हवंय. शोधायचंय? मग छातीवर हात
ठेऊन सांगा</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI"> गूगलपे वरून १० रुपये कॅशबॅक आली की खुश
व्हायला होतं? आणि ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ आल्यावर</span>? <span lang="HI">हसू
नका, फक्त सांगा आपण त्याच्या ताब्यात आहोत</span>? <span lang="HI">की तो आपल्या</span>? <span lang="HI">पैसा आपली पकड घेतो</span>,<span lang="HI">जगण्याची दिशा ठरवतो की आपले
जगणे सुसह्य व्हावे यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे आपण तो वापरू शकतो</span>? <span lang="HI">या प्रश्नाच्या उत्तरात आहे तुमच्या मनातलं खरं उत्तर.</span> <o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कारण सगळ्यात शेवटी हेच खरंय की आपण
पैशांसाठी नाही तर पैसा आपल्यासाठी आहे. पैशांबरोबरच्या व्यवहारातून माणसाचं मन
दिसतं. पारदर्शक</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI"> स्वच्छ, आर्थिक, मानसिक, वैचारिक
<span style="mso-spacerun: yes;"> </span>व्यवहार असलेल्या माणसांचे जगणेदेखील तसेच
असल्याची उदाहरणे आपण आजूबाजूला अनुभवतो. विवेकी विचारांनी श्रीमंत असलेली कुटुंबे
आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटकाचा योग्यविचार आणि संतुलित विनियोग करून स्वतःचे
आणि इतरांचेही आयुष्य सुंदर,आनंदी बनवू शकतात. </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्यालाही बघायला हवे, आयुष्य सहज, सुंदर
करणारी ही जादू आपल्याला जमलीये का ते?</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<br />
© <span lang="HI">डॉ अंजली औटी</span><br />
<br /> (फोटो आंतरजालावरून साभार )</span><br />
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span>
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg880HGPe0x7ha9Gb1dRqtxxO9WZa2uEkyo7HYuesFsCUqpwCbSTZQV7SyofiS0aex2y83L2k5Hk5zDrTHXf-nwpBwKBGCf6uCqv-mv_nLjzoqp8nPkdppJOrb3NqSBpvI7fubjVkKUOrU/s1600/New+Doc+2020-03-21+08.30.19_1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="817" data-original-width="1600" height="326" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg880HGPe0x7ha9Gb1dRqtxxO9WZa2uEkyo7HYuesFsCUqpwCbSTZQV7SyofiS0aex2y83L2k5Hk5zDrTHXf-nwpBwKBGCf6uCqv-mv_nLjzoqp8nPkdppJOrb3NqSBpvI7fubjVkKUOrU/s640/New+Doc+2020-03-21+08.30.19_1.jpg" width="640" /></a></div>
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
( मन:पूर्वक आभार दै. महाराष्ट्र टाइम्स "मैफल पुरवणी")<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br style="mso-special-character: line-break;" />
<!--[if !supportLineBreakNewLine]--><br style="mso-special-character: line-break;" />
<!--[endif]--><o:p></o:p></span></div>
<br />
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-49848337494451088922019-11-22T15:27:00.001+05:302019-11-22T15:27:13.111+05:30कधी 'नाही' सुद्धा म्हण..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal",serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ascii-theme-font: minor-bidi; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-theme-font: minor-bidi;">सकाळी
सकाळीच मैत्रिणीचा फोन. तिच्या आवाजात वैतागापेक्षा हतबलता जास्त होती. तिच्याकडे
येणाऱ्या कामवाल्या बाईच्या मुलाला त्याचा चुणचुणीतपणा बघून तिने लहान असल्यापासून
मदत केलेली होती. त्याच्या शिक्षणासाठी</span><span style="font-family: "Mangal",serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ascii-theme-font: minor-bidi; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-theme-font: minor-bidi;">,<span lang="HI">दुखण्याखुपण्यासाठी</span>,<span lang="HI">सणासुदीला
असं प्रसंगाप्रसंगाने ती मदतीचा हात पुढे करे. आपल्या मुलांसारखाच हा एक</span>,<span lang="HI">अशी भावना मनात.</span><br />
<span lang="HI">त्यानिमित्ताने आपल्याकडून एक चांगलं काम होतंय अशी श्रद्धाही. तो
अनेकवेळा तिच्याकडे येई आणि तिथेच रमे. तो घरातल्या माणसांना इतका सरावला की हा </span>'<span lang="HI">माझा मानस मुलगा</span>' <span lang="HI">अशीच त्याची ओळख ती इतरांना मजेने
सांगे.</span><br />
<span lang="HI">तो शाळेत होता तोपर्यंत सगळं सुरळीत होतं तो अभ्यासपण चांगला करे पण
जसा तो कॉलेजला गेला तसं त्याचं वागणं बदललं.</span><br />
<span lang="HI">सगळ्यात आधी बदलला तो त्याचा हेअरकट..अशीच फॅशन आहे</span>,<span lang="HI">म्हणून तिने छेडल्यावर त्याने ठसक्यात उत्तर दिलं. पण मग हळूहळू त्याचं
वागणं</span>,<span lang="HI">बोलणं बदललं</span>,<span lang="HI">अभ्यासातलं लक्ष
उडालं. आत्तापर्यंत चांगले मार्क मिळवणारा तो अनेक विषयात नापास व्हायला लागला</span>,
<span lang="HI">असं होतंय याचं कारण आपण स्वतः कसे नाही हे तिला पटवून देण्यासाठी
तो नाना सबबी सांगून सगळं खापर इतरांवर फोडायला लागला. घरात भांडून घरातून निघून
गेला. समाजकल्याणच्या विद्यार्थी वसतिगृहात आपली राहण्याची सोय त्याने करून घेतली.
याच काळात तो मित्राची चारचाकी गाडी चालवायला शिकला आणि त्याने लायसन्सही काढून
घेतले. आता लोकांच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून तो जात असे</span>, <span lang="HI">त्याचे मिळणारे पैसे तो स्वतःवर खर्च करायला लागला. आता अभ्यास आणखीनच
मागे पडला आणि वयाच्या विशीच्या आत पैसे कामावण्यातली आणि खर्च करण्यातली नवी झिंग
त्याला चढली.</span><br />
<span lang="HI">तू हुशार आहेस</span>, <span lang="HI">आधी आपले शिक्षण पूर्ण कर</span>,
<span lang="HI">असं त्याला मैत्रिणीने खूप सांगून बघितलं पण तो काही बधला नाही.
कॉलेजची फी</span>,<span lang="HI">परीक्षा फी आणि कधी काही महत्वाचं समान आणायचं या
कारणाने तो सतत तिला पैसे मागे आणि मैत्रीणही त्याला आज नाही तर उद्या समजेल</span>,
<span lang="HI">म्हणून वेळोवेळी मदत करत राहिली. चालू असलेले शिक्षण अर्धवट सोडून
मग दुसरेच काही मी शिकतो</span>,<span lang="HI">माझं डोकं त्यात चालेल असं सांगून
तो एकही गोष्ट धड शिकला नाही. त्याचं गाडी चालवणं मात्र चांगलं होतं</span>,<span lang="HI">लोकं त्याला आवर्जून घेऊन जात</span>,<span lang="HI">व्यवस्थित पैसे देत
असत. मग निदान ते काम तरी तू प्रामाणिकपणे कर आणि एकीकडे शिक्षण चालूच ठेव</span>,
<span lang="HI">असं ती त्याला सांगत राही. पण मिळालेले पैसे उडवायला त्याला अनेक
मार्ग मिळत.</span><br />
<span lang="HI">महागडा मोबाईल</span>, <span lang="HI">ब्रँडेड शूज आणि कोणाचीतरी
घेतलेली सेकंडहॅन्ड गाडी यावर तो खुश होता.</span><br />
<span lang="HI">मैत्रिणीच्या मुलांना</span>, <span lang="HI">नवऱ्याला तो गावात
भटकताना दिसे. ते तिच्यावरच चिडत. एकदा त्याला कोणा मुलीबरोबर बघून खबरदार त्याला
पुन्हा मदत करशील तर या शब्दात नवऱ्याने तिला सुनावलं.</span><br />
<span lang="HI">तिचा जीव थोडा थोडा होई. हिच्याकडे काम करणारी त्याची आई तर कधीच
तिचं काम सोडून गेली होती. तिला बोलावणं पाठवून तिने तिला त्याच्याकडे लक्ष
देण्याबद्दल सांगितलं. पण तिने आता तो कोणाच्या बापाचं ऐकत नाही</span>, <span lang="HI">स्वतःला पाहिजे तेच करतो</span>,<span lang="HI">घरात पैसे देत नाही म्हणून
त्याला आम्ही घरातून काढून दिल्याचं सांगितलं.</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Mangal",serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ascii-theme-font: minor-bidi; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-theme-font: minor-bidi;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7dqQUTTD4r3ftqbbMo7oZ-YU4rXt-tQrjPSKKkWZ7E8iGH8Wx2Alud7oaUHmQcNd81IhvhwA4SGd2fAG596zoYaMsaKRhULRXApY64WymMpyLhmPLaen-g-WFmWLr1QhLqxCnKIP87LQ/s1600/78113234_2965992823413109_7903969216078807040_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="400" data-original-width="400" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7dqQUTTD4r3ftqbbMo7oZ-YU4rXt-tQrjPSKKkWZ7E8iGH8Wx2Alud7oaUHmQcNd81IhvhwA4SGd2fAG596zoYaMsaKRhULRXApY64WymMpyLhmPLaen-g-WFmWLr1QhLqxCnKIP87LQ/s640/78113234_2965992823413109_7903969216078807040_n.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Mangal",serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ascii-theme-font: minor-bidi; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-theme-font: minor-bidi;"><br />
<span lang="HI">तिला वाटे</span>, <span lang="HI">लहानपणी चांगलं असलेलं मूल वाईट
मार्गाला जात असतांना हातावर हात धरून कसं बसायचं</span>?<br />
<span lang="HI">पुन्हा मदत मागायला आला की तीच संधी समजून ती जीव तोडून त्याला
समजावत असे. तो ऐकूनही घेई आणि आता मी तुम्ही सांगताय तसं वागतो</span>,<span lang="HI">असं वचन पण देई</span>, <span lang="HI">कधी रडे</span>, <span lang="HI">आणि
निघतांना त्याला हवे असलेले पैसे देऊन</span>, <span lang="HI">ही शेवटची मदत बरंका</span>,
<span lang="HI">असं ती त्याला आणि स्वतःलाही बजावे.</span><br />
<span lang="HI">पण पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न.</span><br />
<span lang="HI">आता या चक्रातून बाहेर कसं पडू</span>? <span lang="HI">तिला समजेना.</span><br />
<span lang="HI">मी तर चांगलंच करायला गेले ना ग. माझी मुलं काय शिकली यातून</span>?
<span lang="HI">कोणाला मदत केली तर हे असं होतं</span>, <span lang="HI">म्हणून</span>?
<span lang="HI">बोलून दाखवतात मला ते. एखाद्याचं भलं करायला गेले तर माझ्याच
मुलांना हे काय जीवनमूल्य देऊन बसले मी</span>?<br />
<span lang="HI">मलाही आता कोणाला मदत करायची इच्छा होत नाही..या अनुभवाचा कडवटपणा
तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. तिची मदत वाया गेल्याचं शल्य तिला त्रास देत
होतं.</span><br />
<span lang="HI">तो लहान असतांना त्याला अभ्यासात</span>,<span lang="HI">मोठं होण्यात
मदत करण्याबद्दल तिच्या मनातला भाव स्वाभाविक होता</span>,<span lang="HI">कोणाला
मदत करणे यात वावगे काही नाही. पण त्यानंतर तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीसाहित
घडत असतांना त्याच्यात होत गेलेले बदल दिसत असूनही त्याच्या अवाजवी मागण्या मान्य
करत राहणं आणि त्याची गरज भागवण्यासाठी तयार असणं</span>, <span lang="HI">हे सगळं
घडलं ते तिच्या स्वभावातल्या भीडस्तपणामुळे.</span><br />
<span lang="HI">तिच्या या स्वभावाचा त्याच्यासारख्या चाणाक्ष मुलाने फायदा करून
घेतला हे तर दिसतच होतं.</span><br />
'<span lang="HI">मानस मुलगा</span>' <span lang="HI">असं कितीही म्हटलं तरी ते वाटणं
तिच्या एकटीचं होतं. त्यादृष्टीने त्याची गुंतवणूक कधी नव्हतीच. कुठे थांबायचं</span>,
<span lang="HI">हे तिला समजलं नाही. म्हणून तिने देऊ केलेली मदत नंतर त्याची सवय
झाली. त्यापेक्षा ठामपणे मदत नाकारून त्याला योग्य शब्दात समज देण्यातून तिच्या
मुलांनादेखील या अनुभवातून काय शिकायचे हे समजले असते आणि तिला होणारा मनस्तापही
वाचला असता.</span><br />
<span lang="HI">शिवाय त्याने चांगलं शिकावं आणि मोठा व्हावं हे फक्त तिलाच वाटून
काय उपयोग</span>?<br />
<span lang="HI">त्याला स्वतःबद्दल काय वाटतंय यातून त्याचं सगळं वागणं घडत होतं.
आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या चकाचौंधमध्ये या वयाच्या मुलांना भुरळ घालणारी कितीतरी
आमिषे आहेतच की. सुस्थितीतल्या घरातले पालक जसे आपल्या मुलांसाठीच जगतात तसे हे
कष्टकरी पालकही. हातावरच्या पोटाला चार घास मिळवण्याची कसरत करतांना आपल्या
मुलांनी शिकावे आणि मोठे व्हावे अशी स्वप्न बघणारे पालक यांचेही नक्की आहेत. सगळीच
मुले मोहमय जागाच्या आहारी जातात असे नाही. आजूबाजूच्या वातावरणातून स्वतःसाठी काय
निवडायचे याचे पर्याय त्यांच्यापैकीच अनेकजण किती वेगळे निवडतात</span>,<span lang="HI">याची उदाहरणे आपण नेहमी बघतो. आपल्याला मिळालेल्या संधीचे बोट धरून
स्वतःच्या आयुष्याचे सोने करून घ्यायचे की त्याच संधीचे संधीसाधू वृत्तीने मातीमोल
करायचे ही निवड प्रत्येकजण आपापल्या वृत्तींनुसार करतो.</span><br />
<span lang="HI">लोकांना मदत करण्याची प्रेरणा तुझ्यात नैसर्गिक आहे शिवाय या
अनुभवाने तुला योग्यवेळी ठामपणे नाही कधी म्हणायचे</span>, <span lang="HI">हे नाही
का शिकवले</span>?<br />
<span lang="HI">स्वभावात असलेला चांगुलपणा हा दुर्मीळ गुण आहे</span>, <span lang="HI">तो नक्की जपायचा मात्र त्याचे रूपांतर दोषात होणार नाही</span>,<span lang="HI">याची काळजी घेऊनच.</span><br />
<span lang="HI">आता तिच्या आवाजात तिचा नेहमीचा सौम्य गोडवा परत आला आणि माझी सकाळ
सत्कारणी लागली.</span><br />
© <span lang="HI">डॉ अंजली अनन्या </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-45318562440158590722019-10-07T17:55:00.000+05:302019-10-07T17:55:38.139+05:30हे जीवन सुंदर आहे! <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">परवा </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">एका </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आईने आपल्या तीन मुलीं</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">सह </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आत्महत्या केली.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">माध्यमांमधून अनेकदा
अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. असं कसं वागू शकतं कोणी? इतक्या टोकाचा निर्णय</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">?<span lang="MR"> थोड्याफार चर्चा,तर्क-वितर्क होतात आणि आत्महत्या
करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी त्रास असणार किंवा डोक्यावर काहीतरी परिणाम
झालेला असणार,असा विचार करून यामुळे आलेली मानसिक अस्वस्थता आपण काहीवेळातच झटकून
टाकतो. नकारात्मक गोष्टींचा विचार फारवेळ करायचा नसतो,हे खरे पण जेव्हा आपल्या माहितीतले
कोणी आत्महत्येचे पाऊल उचलते तेव्हा त्यातल्या भयानकपणा लख्ख जाणवतो. या व्यक्ती भेटणाऱ्या,
ओळखीच्या,आजूबाजूला वावरणाऱ्या असल्या तरी त्यांच्या कोणत्याच वागण्यावरून
आपल्याला त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा आधी पत्ता लागलेला नसतो. आत्महत्या करणारी
व्यक्ती तर जगातून निघून जाते पण तिच्या जवळच्या लोकांना त्यानंतर अनेक दिवस,वर्ष
मानसिक दडपणाखाली काढावी लागतात. कदाचित त्यानंतर आयुष्यभर ‘आपण समजून घ्यायला
नेमके कुठे कमी पडलो’हा सल टोचत राहतो. </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">भारतात पुरुषांपेक्षा
स्त्रियांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे कारण स्त्रियांमध्ये
नैराश्याचे प्रमाणही अधिक आहे, मग स्त्री शहरातली असो वा खेड्यातली. <span style="mso-spacerun: yes;"> </span>ग्रामीण </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">स्त्रियांसाठी
जगण्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अजूनही खूप </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मोठा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आहे,त्यातुलनेत शहरी
स्त्रियांचे प्रश्न वेगळे </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आहेत
तरीही केवळ ‘स्त्री’ म्हणून असलेल्या तिच्या समस्या ग्रामीण स्त्रीपेक्षा काही फार
वेगळ्या नाहीत. म्हणून </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">लौकिकअर्थाने </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">शिक्षण,नोकरी,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">पैसे,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">यश आणि </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">प्रसिद्धीच्या शिखरावर
पोहोचलेल्या स्त्रियाही अचानक स्वतःचे आयुष्य </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">अवेळी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">संपवतात त्यावेळी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ती घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित रहात नाही तर
त्यामुळे संपूर्ण </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">समाज</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मन ढवळून निघते.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">स्त्रिया इतक्या
हतबल,निराश आणि टोकाच्या निर्णयापर्यंत का जात असाव्यात? याचे कारण शोधत गेलो तर कितीतरी
स्त्रियांच्याबाबतीत पारंपारिक पुरुषी वर्चस्वाच्या अन्यायाची कारणे आजही समोर
येतात. सामाजिक परिस्थिती काही सगळ्यांसाठीच बदललेली नाही,घरांमधून मुलींनी शक्यतो
सामंजस्य दाखवावे,तडजोड करावी म्हणून दबाव असतो. ‘कोणताही अन्याय कधीच सहन करायचा
नाही’ याचेही काहींकडून इतके टोक गाठले जाते की मुली दुराग्रही,हट्टी आणि आक्रमक वागून
आपल्याच पायावर धोंडा पडून घेतात. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">घरी,दारी नोकरीच्या
ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांची अडवणूक होते. जवळच्या नात्यांमधला
विसंवाद,फसवणूक अशा सतत कसल्यातरी तणावाखाली आयुष्य जगल्यामुळे नैराश्य लवकर येते.
काहींचा स्वभावच त्यांचा शत्रू होऊन जातो. अनेकींना </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">छोट्या
छोट्या गोष्टी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मनात </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">धरून
बसण्याची</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">घडलेल्या अप्रिय घटनांची वर्षानुवर्ष उजळणी करण्याची </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सवय
असते. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">अपयश,नकार,अपमान,प्रेमभंग,मानहानी या
गोष्टी वारंवार मनात </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">चघळल्या जातात. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">व्यक्ती,परिस्थितीबद्दलचा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">राग</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">हतबलता,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">नाराजी अनेक वर्ष मनात
सांभाळली </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">जाऊन प्रसंगाप्रसंगाने
उगाळली जाते.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तुलना,स्पर्धा यांनी मन सतत अस्थीर असते. </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मोठ्यांनी
लहानांना काहीही म्हटले तर चालते पण लहानांना </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">जर </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मोठ्यांचा राग आला तर काय
करायचे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">याबद्दल कोणी मार्गदर्शन करत नाही. </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मुळात लहानपणापासून एखाद्या न आवडणाऱ्या प्रसंगी भावना कशा
हाताळायच्या,विचार कसा करायला हवा, हे न शिकवता कायम फक्त ‘कसे वागले पाहिजे’ ‘कसे
बोलले पाहिजे’ हेच मुलांना शिकवले जाते. म्हणून मनात अनेक गोष्टी अनैसर्गिकपणे साचत
जातात. </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">लोक आतल्याआत </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">कुढत </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span>राहतात.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> जगाच्या मागे राहतात. आत्मविश्वास गमावतात. वेगवेगळ्या आव्हानात्मक परिस्थितीपुढे
बऱ्याचशा स्वतःच्या आणि काही इतरांच्याही स्वभावमर्यादेमुळे निराश होत जातात. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">जसे शरीराला ताप येणं हा आजार नाही तर केवळ एक लक्षण आहे तसं
नैराश्य हा</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">देखील</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">
आजार नाही तर अनेक मानसिक आजारांचे </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ते </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">केवळ
एक लक्षण आहे.</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> म्हणून सतत नाराज, निराश
असलेली आपली किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची मनस्थिती दुर्लक्ष न करता
वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपण प्रत्येकजण आयुष्यात
कधी</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तरी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">नैराश्य
अनुभवतो. त्यावर आपापल्या पद्धतीने मात </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">करण्याचे उपायसुद्धा शोधतो. पण सगळ्यांनाच त्यातून लवकर बाहेर पडता येत नाही. <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">निराश मनस्थितीचा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कालावधी आणि
तीव्रता </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">इतर अनेक </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मानसिक
आजारां</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">साठी आमंत्रण ठरते.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कोणी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपल्या मनासारखे </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">वागले नाही तर राग
ये</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">तो</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">किंवा </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">वाईट वाट</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ते, कारण </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपण तसा विचार करण्याची सवय
लावून घेतली आहे. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">सगळे </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्या
मनासारखे झाले पाहिजे याचा आग्रह</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">अट्टाहास</span>,<span lang="HI">हट्ट आणि मागण्या</span>,<span lang="HI">आक्रमकता आणि इच्छा पूर्ण झाली
नाही की निराशा या पायऱ्या माणूस कधी चढतो समजत नाही. मग </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">नेहमी सगळे </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">माझ्याशी </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">असे</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">च</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> वागतात</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कोणालाच माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मी नकोसा/नकोशी झालेय सगळ्यांना</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सगळे स्वार्थी आहेत</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">जग स्वार्थी आहे</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">जगण्यातच काही अर्थ नाही</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">”</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">इथपर्यंत
विचारांची गाडी पोहोचते.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">विचारांच्या गाडीला </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">प्रयत्नपूर्वक </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">ब्रेक लावायचा</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> असतो </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">हे लक्षात येत नाही. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मग घडणाऱ्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">लहानसहान घटना</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ही</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> मनाला त्रास देतात. मनाची
जखम वारंवार चिघळते. ती बरी </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">करणे
इतर कोणाच्या नाही,तर आपल्याच हातात आहे हे समजून न घेता इतरांना दोष दिला जातो.
मन वाहवत जाते.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> बुद्धी</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">तर्क </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">काम करत नाही.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> मनात द्विधा नाट्य रंगते.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">सगळं जग आपल्याविरुद्ध गेलेय</span>,<span lang="HI">आपल्याला कोणीही
नाही</span>, <span lang="HI">आपण एकटे आहोत या कोशात माणूस स्वतःला गुरफटून घेतो.
वरवर दैनंदिन कामे यं</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">त्रा</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सारखी
पार पडली जातात. आजूबाजूचे लोक चार-सहा दिवस सहानुभूती दाखवतात</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">विचारपूस करतात पण ते यां</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">ना अपेक्षित असल्या</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">प्रमाणे नसल्याने ही लोकं मनाची दारे
घट्ट बंद करून आतल्या आत घूसमटत राहतात. आनंदाचे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="HI">उत्साहाचे
रंग </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">अनुभवणं थांबवून
टाकतात.</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> नात्यां</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">च्या </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">भावनिक चढउता</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">रात स्वतःचं जगणं विसरून जातात. <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
<span lang="HI">आपल्याच विचारांच्या तुरुंगात कैद होतात आणि अक्षरशः सश्रम </span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">भावनिक </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कारावास भोगतात. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आत्महत्येशिवाय परिस्थितीतून सुटका होण्याचा दुसरा कोणताही
मार्ग आपल्यासाठी आता उरलेला<span style="mso-spacerun: yes;"> </span>नाही याची खात्री
होण्यामागे </span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">अनेक दिवसांचे विचारांचे</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">वृत्तींचे</span>, <span lang="HI">पूर्वग्रहांचे</span></span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,</span><span lang="HI" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> आणि अनुभवांचे साचलेपण असते. </span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त एकट्या पडतात म्हणून आत्महत्या
करण्याचे त्यांचे प्रमाण जास्त आहे.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkSx5Iw3-yY6geJM05OiZqVGQ7YD1WGugkJALKrGhoCgQdDgk4gyM4ncthygNu6OjubabpjygWO8oUr4DYbOMhmcvfOhuYd3msYaa87lNsB-Co1px-iVBfSmaC9hxQNfKYYTJspVELLZ4/s1600/life-is-beautiful.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="475" data-original-width="850" height="355" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkSx5Iw3-yY6geJM05OiZqVGQ7YD1WGugkJALKrGhoCgQdDgk4gyM4ncthygNu6OjubabpjygWO8oUr4DYbOMhmcvfOhuYd3msYaa87lNsB-Co1px-iVBfSmaC9hxQNfKYYTJspVELLZ4/s640/life-is-beautiful.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपल्या जवळच्या
व्यक्तीच्या अशा मनस्थितीबद्दल वेळीच सावध होणे शक्य आहे का? तर शक्य आहे कारण अशा
व्यक्ती काही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून किंवा गप्प बसण्यातूनही त्यांच्या मनस्थितीची
पूर्वसूचना देत असतात. आपल्या मरणाचा विचार कोणत्यातरी स्वरुपात व्यक्त करतात, हे वारंवार
दिसून आलंय. ते वेळ गेल्यावर समजून घेण्यापेक्षा वेळेत समजणं गरजेचं आहे. भावनेच्या
भरात नुकसानकारक निर्णय घेतलेले प्रसंग त्यांनी आपल्या याआधीच्या आयुष्यात घेतलेले
असतात. त्यासाठी गरज आहे, थोडे डोळे,पुष्कळ कान आणि किंचित मन उघडे ठेवण्याची. या
लोकांनी आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये,असं कुंपण बनवण्याआधी सावध होण्याची गरज
आहे. आपल्याही मनात कुठेतरी खोलवर असे द्वंद्व नाही ना, हे तपासून घेण्याची आणि
त्याचा वेळीच योग्य निचरा होण्याची गरज आहे. हो,कारण याबाबतीत आधी मदत स्वतःची आणि
मगच दुसऱ्यांची. प्रत्येकाला डोळसपणे आपल्या स्वतःकडे बघणं जमलं की स्वभावातले नुकसान
करणारे टोकदार भाग ओळखता येतात. मनातले विचार कोणत्या भावनांच्या प्रभावाखाली आहेत
हे समजून घेणं शक्य होतं. त्या हितकारक आहेत की अहितकारक हे नीट कळते. <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपलं आयुष्य निर्माण
करण्यात आपल्या स्वतःचं कर्तुत्त्व काहीच नसेल तर मग ते संपवण्याचा अधिकारही आपला नाही.
भावनेच्या भरात कोणाही व्यक्तीला आपल्यापुढचा प्रश्न अवघड वाटतो, त्या भावना
ओळखण्याचा आणि हाताळण्याचा संयम,सहनशीलता अंगात असेल तर कितीही मोठ्या संकटातून
बाहेर पडण्याची वाट सापडू शकते. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीच्या मनातला भावनांचा
गोंधळ शांत करायचा असेल तर त्यांच्या मनामधल्या विचारांचे स्वरूप ओळखता यायला हवे,
भावना समजून घेता यायला हव्यात. यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींची,नातेवाईकांची आणि
तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे यात कोणताही कमीपणा नाही. योग्यवेळी मागितलेली आणि
केलेली मदत एक अनमोल आयुष्य अवेळी संपवण्यापासून वाचवू शकते. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपल्या आजूबाजूला
असलेल्या माणसांकडे बघितले की सहज लक्षात येईल,अनेक लोक आपल्या आयुष्यातील
अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. पावलोपावली होणाऱ्या अपेक्षाभंगातून
समाधानाचे चार क्षण मिळवत असतात. कोणतीही गोष्ट संपवायला एक क्षणही पुरेसा आहे त्यासाठी
हिंमत लागत नाही ती लागते टिकवायला, सांभाळायला,जपायला आणि वाढवायला. आणि ती हिंमत
जगण्याचे बोट सोडणाऱ्याकडे कधीच नसते. ती असते मदत मागणाऱ्याकडे आणि देणाऱ्याकडेही.
त्या मदतीच्या एका क्षणात अनिश्चिततेच्या वादळात फडफडणारी एखाद्या आयुष्याची क्षीण
ज्योत सांभाळून ठेवण्याचे बळ नक्की असते. अशी ज्योत जपणारे बळकट मन आणि सहृदय हात
होऊया! <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">©</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> डॉ अंजली अनन्या <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br />
</span><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">फोटो सौजन्य गुगल </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-64228981237979981242019-09-22T08:06:00.004+05:302019-10-07T17:49:57.527+05:30देणे समाजाचे!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">“कठीण परिस्थितीशी सामना
कसा करायचा याचा निर्णय नेहमीच आपल्या हातात असतो.” हे कितीही खरे असले तरी आव्हानात्मक
परिस्थिती अचानक समोर आली की त्यावेळी मनात प्रभावी असलेल्या भावनांच्या आहारी आपण
जातो. आपल्यापैकी काही </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">जण मात्र </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">याच भावनांची उर्जा वापरून
स्वतःसाठी आणि इतरांसाठी आश्वासक पर्याय शोधू शकतात. आयुष्यातल्या संकटकाळात स्वतःला
सावरून इतरांचा विचार करणे सगळ्यांनाच कुठे जमते? <span style="mso-spacerun: yes;"> </span>पण ज्यांना जमते ते सगळे लोक मुळातच असामान्य
असतात का? तेही आपल्यासारखेच असतात. त्यांनाही भावना असतात. मग नेमक्या कोणत्या
क्षणी ते दु:खाच्या क्षणांवर मात करून पुढे जातात? असे काय घडते की ते इतर
सगळ्यांसारखे न वागता काहीतरी वेगळे वागून असामान्य ठरतात?</span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">यासाठी एक गोष्ट
सांगते, वीणाची. एक साधी मुलगी. सर्वसामान्य लहानपण आणि तरुणपण अनुभवलेली. एक साधी
गृहिणी आपल्या घरावर,संसारावर आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारी. दिलीपने सुरु
करून दिलेला ‘गिरीसागर टूर्स’चा पर्यटनव्यवसाय सक्षमतेने सांभाळणारी प्रेमळ पत्नी.
बाळ होण्याची वाट बघणं, हाच काय तो त्यांच्या आयुष्याचा संघर्ष. वयाच्या तिसाव्या
वर्षी वीणाला दोन जुळ्या मुली झाल्या. पूरवी आणि सावनी. कौतुकाचे आणि आईपणाच्या
नव्या नवलाईचे आठच दिवस संपत नाही तोच या कुटुंबावर एक संकट कोसळले. पूरवीला
फणफणून ताप आला. बघताबघता तो मेंदूपर्यंत पोहोचला. ‘मेनिंजायटिस’ निदान होऊन त्या
छोट्याशा बाळाला कायमचं मानसिक आणि <span style="mso-spacerun: yes;"> </span>शारिरीक
मतिमंदत्व आलं. </span><span style="line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">बाळाला जराही काही
झालं की आईचा जीव अगदी कासावीस होऊन जातो पण ती काही ते दुखणं आणि आजार वाटून घेऊ
शकत नाही. पूरवीला सतत फिट्स येत असत. एकेका दिवसात सत्तर ते ऐंशीवेळादेखील फिट्स
येत. ते नुसतं बघणंही कठीण होई. इथूनपुढच्या प्रवासाच्या,बाळाच्या काळजीने वीणा
हबकून गेली. बाळ काहीच दिवसांचे सोबती आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तर तिला
जबरदस्त मानसिक धक्का बसला. मानसोपचारांची मदत घ्यावी लागली. <span style="mso-spacerun: yes;"> </span>पण ती लवकरच सावरली. मुलींना सांभाळण्यासाठी त्यांची
सगळी शक्ती पणाला लागली. पूरवीसाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि सावनीच्या
जगण्यावर, वाढण्यावर घरातल्या वातावरणाचा कोणताही प्रभाव न पडता तिच्यातल्या
नैसर्गिक हुशारीला आपल्याला पूर्ण न्याय देता येण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. रोजचा
दिवस एक वेगळे आव्हान होते. कोणाची मदत मिळेल? शोध सुरु झाला.</span><span style="line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">त्यादृष्टीने काम
करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत का म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातातल्या अनेक सामाजिक
संस्थाना भेटी दिल्या गेल्या. वेगवेगळ्या संस्थांच्या भेटींमधून अनेक अनुभव त्यांना
आले</span><span lang="MR" style="font-family: "mangal" , serif; line-height: 107%;">.</span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">काही चांगली लोकं,संस्था भेटल्या त्यांची मदतही झाली. तर कधीकधी
पैसा,</span><span lang="MR" style="font-family: "mangal" , serif; line-height: 107%;"> </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">वेळ वाया गेला आणि वर मनस्ताप वाट्याला आला.</span><span lang="MR" style="font-family: "mangal" , serif; line-height: 107%;"> </span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">त्यातल्याच काही संस्था अशा होत्या की कोणत्याही बाह्य
मदतीशिवाय त्यांचे खरोखरच चांगले काम स्वनिर्मित फंड॒सच्या तुटपुंज्या मिळकतीवर
कासवाच्या गतीने का होईना पुढे नेत होत्या. त्यांचे प्रामाणिक काम समाजासमोर येण्याची
गरज दिलीपना जाणवली. कारण समाजातील अनेकांना चांगले काम करणाऱ्या लोकांना,संस्थांना
मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण मग असे दाते आणि खरे गरजू यांची सांगड,भेट
योग्यवेळी व्हायला हवी, त्याचा अनेकांना खरंच उपयोग होईल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन
दिलीपचे मन स्वस्थ बसेना,त्यांना याबद्दल खूप कळकळ वाटू लागली. </span><span style="line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"> </span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAI1EJmtVlsYEWyGBWEbkwAipPl_V6pqtb-8r67phyv2q50ozjCyJn6WTJ3pGuuOmAwld5YdjHPiZYqD_ofI3kcc0uxjS5_-QpA5bD1KaeAhy5aGOjIHMJK-iZLFzziQMRHHR5imEvmrs/s1600/FB_IMG_1568858755167.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="864" data-original-width="864" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAI1EJmtVlsYEWyGBWEbkwAipPl_V6pqtb-8r67phyv2q50ozjCyJn6WTJ3pGuuOmAwld5YdjHPiZYqD_ofI3kcc0uxjS5_-QpA5bD1KaeAhy5aGOjIHMJK-iZLFzziQMRHHR5imEvmrs/s640/FB_IMG_1568858755167.jpg" width="640" /></a></span></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhT79PjwnCDm0jawmQgN0oyhwbsK9wI2M470T9Ia0bfTvCImYF8zInmapkfajALo4wOMZcSBUKoe5bAwbSCvNabOQpmPWkxgxH0ObjIN4_V9602DLBIkWM8DEBAyyrT5PxvO7WXzxKeFzI/s1600/IMG-20190908-WA0006.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="1280" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhT79PjwnCDm0jawmQgN0oyhwbsK9wI2M470T9Ia0bfTvCImYF8zInmapkfajALo4wOMZcSBUKoe5bAwbSCvNabOQpmPWkxgxH0ObjIN4_V9602DLBIkWM8DEBAyyrT5PxvO7WXzxKeFzI/s640/IMG-20190908-WA0006.jpg" width="640" /></a></span></div>
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"> <span id="goog_175852423"></span><span id="goog_175852424"></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"> </span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif;">दिलीप आणि वीणा
दोघांच्याही सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. समाजातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध
होते. त्याच दरम्यान दिलीप एक प्रदर्शन बघण्यासाठी गेले आणि त्यांच्या मनात अशा संस्थांचे
कार्य समाजासमोर येण्याचा ‘प्रदर्शन’ हा सगळ्यात चांगला मार्ग असू शकतो, हा विचार
आला. त्यांनी मांडलेली ही कल्पना वीणालादेखील खूप आवडली. दोघांचे त्यावर विचारमंथन
झाले. निर्णय घेतले गेले आणि मग दोघांनी आपली ही कल्पना अनेकांना ऐकवली. ओळखीच्या लोकांनी,मित्र-मंडळींनी
ती उचलून धरली. अनेकांनी जमतील तसे पैसेही देऊ केले त्यात काही पदरचे पैसे घालून
2005 साली असे अनोखे प्रदर्शन पुण्यात भरवले गेले. संस्थांनी त्यांची संपूर्ण
माहिती पारदर्शकपणे लोकांना सांगायची, कार्याचे फोटो आणि माहिती यांचे प्रदर्शन
असे केवळ त्याचे स्वरूप होते. लोकांचे,लोकांसाठी असलेले काम लोकांपर्यंत केवळ
पोहोचवायचे. कोणतीही मागणी नाही. खरेदी-विक्री नाही. ज्यांना मदत करावीशी वाटेल
त्यांनी थेट त्या संस्थेला संपर्क करायचा. असे आगळेवेगळे प्रदर्शन लोकांनी
पहिल्यांदा बघितले. उस्फुर्तपणे मदत केली. यात अनाथ,अपंग मुलांसाठी,वंचीत
समाजघटकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था होत्या.
</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif;"> </span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">या प्रदर्शनाचे नाव
ठेवले “देणे समाजाचे” यात खरोखरच समाजाचे ऋण त्याला परत करण्याचा सच्चा हेतू होता.
असे प्रदर्शन एकदाच भरावून त्याचा फायदा नाही तर दरवर्षी हे घडून यायला हवे याची
प्रेरणा मिळाली. उत्साह वाढला. दोघांनी प्रत्यक्ष फिरून अशा गरजू संस्था वर्षभरात
शोधून काढून प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्याचे काही निकष ठरवले गेले. <span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">पूरवीसाठी त्यातील
काही संस्थांमुळे खरंच मदत झाली. वेगळी समज,दृष्टीकोन विकसित होत गेले. निर्णयांमध्ये
सुलभपणा आला. पण अनेक गोष्टींची घडी नीट बसतेय तोच अचानक वीणाला अंतर्बाह्य हलवून
टाकणारा एक मोठा धक्का बसला. 2008 सालच्या प्रदर्शनाची दोघेही जोरात तयारी करत
होते, केवळ पंधरा दिवस बाकी होते आणि ऐके दिवशी रात्री झोपेतच दिलीप अचानक हे जग
सोडून गेले. नियतीचा हा घाव निश्चितच मोठा होता. छोटेसे घर या वादळात उन्मळून
पडले. वीणाच्या दु:खावर कोणी काय समजूत घालावी?</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">दु:खाने सैरभैर झालेल्या
वीणाने ठामपणे यावर्षीचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. हाच तो क्षण ज्या क्षणी
इतर कोणीही हातपाय गाळून दु:खात बुडून जाईल त्या क्षणी आपल्या भावनांवर मात करून
वीणा वेगळं वागली. निर्णय भावनांनी नाही तर बुद्धीने घेतला आणि त्यानंतर तिचे
आयुष्यच बदलून गेले. दोघांनी एकत्र बघितलेले स्वप्न पुढे नेण्याच्या निश्चयाने
तिने उभारी धरली,कुटुंबातील इतर सदस्यही मदतीसाठी पुढे आले आणि त्यावर्षीचे
प्रदर्शन ठरल्याप्रमाणे पार पडले. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">सगळ्या जबाबदाऱ्या
वीणाने संपूर्ण ताकदीने सांभाळायला सुरवात केली. यात शरीरापेक्षा मनाची ताकद जास्त
मोलाची ठरली. एकीकडे पूरवी आणि सावनी मोठ्या होत होत्या. महाराष्ट्रभर दौरे करून
संस्थांना भेटी देणं,लोकांच्या संपर्कात राहणं हा सगळा वाढलेला व्याप सांभाळणं तसं
कठीण होतं पण इथेही तिने आपल्या बुद्धीचा कौल मानला. खऱ्या सामाजिक कामाचा आव आणता
येत नाही, त्यासाठी दिवसरात्र एक करावे लागतात. अनेक व्यक्तिगत गोष्टी दूर
साराव्या लागतात. इथे तर घर आणि व्यवसाय दोन्ही तारेवरची कसरत होती. दोन्ही
पातळ्यांवर ती प्रत्यक्ष हजर असण्याची गरज होती. तरीही “देणे समाजाचे” कार्यक्रम
पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेणे खूप जास्त आव्हानात्मक होते. ‘झेपेल तितकेच कर’,
‘आधी घर सांभाळ,लष्कराच्या भाकऱ्या आता नको” यासारखे सल्ले मिळाले नसतील तिला, असे
कसे होईल? अडचणी येत गेल्या आणि मार्गही निघत गेले. संकटं येत गेली पण निश्चयाचे
बळ कमी पडले नाही. अनेक लोकं या चळवळीला जोडली जात होती. 2010मध्ये या सगळ्या
कामामागची प्रेरणा असलेली पूरवी हे जग सोडून गेली. पण आता वीणाचं ‘आईपण’ अधिक
व्यापक झालं होतं. सामाजिक मातृत्व स्वीकारलं होतं, थांबणं शक्य नव्हतं आणि तिला थांबायचं
नव्हतंही. काम सुरूच राहिलं. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">ह्यावर्षी पंधरावे
वर्ष आहे ‘देणे समाजाचे’प्रदर्शन पुण्यात येत्या २० तारखेला भरते आहे. आता ते केवळ
प्रदर्शन नाही तर एक <span style="mso-spacerun: yes;"> </span>‘चळवळ’ झाली आहे. यावर्षीपासून
हे प्रदर्शन मुंबईतसुद्धा आयोजित केले गेले. यातून आजपर्यंत एकशेपासष्ठपेक्षा
जास्त सामाजिक संस्थाचे कार्य समाजासमोर आले आहे. अनेक दात्यांनी यथाशक्ती त्यांना
मदत केली आहे. काहींनी श्रमदानसुद्धा केले आहे. करोडो रुपयांची मदत आजपर्यंत थेट उपलब्ध
झाली आहे. वीणा गोखले आजही सामाजिक संस्था आणि समाज यांच्यातील केवळ एक दुवा
म्हणून काम करतात. आजही ती आपल्या सगळ्यांसारखीच एक साधी स्त्री आहे. एक प्रेमळ आई
आहे, एक कर्तबगार व्यावसाईक आहे आणि समाजभान असलेली अत्यंत पारदर्शी,प्रामाणिक
व्यक्तीदेखील आहे. <span style="mso-spacerun: yes;"> </span>“देणे समाजाचे” असले
तरी आपणही याच समाजाचा एक भाग आहोत, म्हणून आपलेही आहेच की! </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">वीणाचे प्रेरणादायी
आयुष्य आपल्याला इतकी प्रेरणा तर नक्कीच देतेय!</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;">©</span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"> डॉ. अंजली अनन्या </span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><o:p></o:p></span></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-35944670280278591872019-09-15T12:42:00.003+05:302019-09-15T12:42:33.713+05:30जगायचं कशासाठी?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
घरात जाण्यासाठी वळले तर पायापाशी एक छोटंसं मनीप्लॅन्टचं पान, थोड्या देठावर,कसंबसं तग धरून. हिरवा रंग पण थोडसं मलूल. तिथे कधीपासून होतं,माहीत नाही. तसा त्याचा वेल होता,आजूबाजूला जिकडेतिकडे पसरलेला. हे मात्र सगळ्यांपासून तुटून जमिनीवर..नशीब अजून कोणी त्याच्यावर पाय नव्हता दिलेला. पटकन उचललं. घरात एका ग्लासभर पाण्यात ठेवलं. किचनच्या खिडकीत, मला दिसेल असं. दोन दिवस जगेल की नाही, वाटत होतं. पण हळूहळू ते तरारलं. त्याला स्पर्श केला की कळायचं,आतून जगण्याची जिद्द होती त्याच्यात. काही दिवसातच त्याच्या तुटलेल्या भागाला पांढरट मुळं फुटलेली दिसली. कमाल वाटली मला त्याची. छोटासा जीव किती चिवट इच्छाशक्ती धरून होता! शब्दही न बोलता मला त्याची जगण्याची धडपड समजत होती. त्याच्या विश्वात मी होते की नाही,माहीत नाही पण माझ्या विश्वात मात्र त्याचं असणं होतं! अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं..तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला? दुसऱ्या दिवशी माझ्या हाताने कुंडी तयार केली. मातीत थोडे नैसर्गिक खतदेखील मिसळले. आणि अलगद बोटांनी त्याला मातीच्या कुशीत ठेवले. मातीला आणि पाण्याला त्याची काळजी घ्यायला सांगितले. तरी मला वाटत होते, नीट येईल ना मातीत? आवडेल ना त्याला हे नवीन घर? लगेच कसं समजेल? मला वाट बघायला हवी.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpiPgncjTwsGN_ELvLScsEeqz95ifVpKyf5wgZKVzAOXMpmlS7UAsJjo7nOkcFBkFwj1cGFakPkp-oNdKBVHFBq25JtORcaklLDPzlMcWsPl6RYJ4mCTt6xWAOdtOx_f_YE2QmG4U1Cvg/s1600/IMG_20190914_073257990-01+%25281%2529.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1132" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpiPgncjTwsGN_ELvLScsEeqz95ifVpKyf5wgZKVzAOXMpmlS7UAsJjo7nOkcFBkFwj1cGFakPkp-oNdKBVHFBq25JtORcaklLDPzlMcWsPl6RYJ4mCTt6xWAOdtOx_f_YE2QmG4U1Cvg/s640/IMG_20190914_073257990-01+%25281%2529.jpeg" width="451" /></a></div>
<br />
हा बदलदेखील त्याला मानवला. ते कोमेजले नाही. किती वेळ लागला त्याला तिथे जुळवून घ्यायला. पाणी जास्त व्हायला नको,कमी पडायला नको. ऊन कडक नको, उजेड मात्र भरपूर हवा, हवा खेळती असावी. माझं बारीक लक्ष होतं. “बस,मरना नहीं..” मनावर उमटलेलं मूव्हीतलं हे वाक्य त्यालाच किती वेळा म्हटलं मी. ऐकलं असेल का त्याने? ऐके दिवशी त्याच्या देठावर हिरवट पिवळा उंचवटा दिसला..इथून कोंब फुटणार..आता मला खात्री झाली आणि अगदी हळूहळू त्यातून नवे पान उगवले.. ..किती सावकाश झाले सगळे. त्याला कसलीही घाई नव्हती. मात्र घाई होती माझ्याच मनात. त्याने त्याचा वेळ घेतला. मग मला अपोआप समजलं, सगळ्या गोष्टींची वेळ ठरलेली आहे! त्याच्या त्या वेगाशी जुळवून घेणं मग एकदम जमूनच गेलं मला. आणि आवडलंही. पटापट एका विचारावरून दुसऱ्यावर धावणारं माझं मन आपोआप सैलावलं..घाई करून एखादं काम लवकर होईल फारतर. त्याने असा काय फरक पडतो? मला “स्लो डाऊन” होण्यातली मजा समजली. आता त्याच्याकडे अनेकदा बघूनही प्रत्येकवेळी नवेच काहीतरी दिसत होते. दिवसागणिक वाढणारा त्याचा ताजेपणा लक्षात येत होता. ऐकाका पानाचा प्रवास उमगत होता. सावकाश एका पानाची पाच-सहा पाने झाली होती. त्याच्याशी माझी जवळिक वाढली होती, खरंतर जवळिक वाढली होती माझी माझ्याशीही. <br />
इतक्यादिवस मला वाटे की मी त्याच्या सोबत आहे! पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की! त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे! मी असले नसले तरी त्याच्या असण्यात फरक पडणार नाहीये काही..पण माझ्यात मात्र हळूहळू खूप काही बदलतेय. माझ्या जगण्याच्या चौकटीतून मी त्याच्या जगण्याचा अर्थ शोधत होते, कसं शक्य आहे हे? माझ्या चौकटीत असलेले अनुभवांचे अर्थ अपूरे,माझ्या नजरेतून असू शकतील. त्यापलीकडे असलेलं त्याचं जग समजायचं असेल तर आधी मला माझ्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. अर्थ शोधायला न जाता त्याचं फक्त जगणं समजून घ्यावं लागेल. आणि मग मला समजलं,कशाला हवा आहे,प्रत्येक गोष्टीला अर्थ? नुसतं जगणं, नुसतंच असणंदेखील पुरेसं असतं. अनुभवतेय की मी ते त्याच्या सोबतीने. त्याच्याकडे बघतांना माझ्या मनात आपोआप जे उमटेल तेच आहेत त्याचे जगण्याचे बोल. ते पोहोचण्यासाठी कोणतेच शब्द लागत नाही. त्याशिवायच भाव पोहोचतो. आपल्या मरणासन्न अवस्थेबद्दल तरी त्याची तक्रार कुठे होती? त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले? मी उचलले नसते तर ते तितक्याच शांतपणे नाहीसेही झाले असते जगातून. त्याने अपेक्षा केली नव्हतीच,नंतर मात्र मी दिलेला मदतीचा हात घेऊन मन:पूर्वक जगण्याचा प्रयत्न केला. त्याने फक्त जे घडेल त्याची वास्तविकता स्वीकारली. त्या त्या प्रत्येक क्षणी. पाण्यातून मातीत आणून ठेवलं तरी. त्याची सगळी शक्ती फक्त टिकून राहण्यात एकवटली. त्याला माहीत होतं, जगणं महत्त्वाचं आहे,वाढ तर आपोआपच होणार आहे. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUmM_VUMTxpacgo4jaX-lrE0tWK_ulVF0hhEgBy2fGTBNrNo6RtWFJnKxV-1W_FBSGzGA2M4tIh25O4JDeuAuGP4LyfqbbDnyLCPnd9tkbJI1ZEx5CEXCIksSCYoIbd-M61T_nE4OkVvQ/s1600/IMG_20190914_072912153+%25281%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUmM_VUMTxpacgo4jaX-lrE0tWK_ulVF0hhEgBy2fGTBNrNo6RtWFJnKxV-1W_FBSGzGA2M4tIh25O4JDeuAuGP4LyfqbbDnyLCPnd9tkbJI1ZEx5CEXCIksSCYoIbd-M61T_nE4OkVvQ/s400/IMG_20190914_072912153+%25281%2529.jpg" width="300" /></a></div>
<br />
शून्यापासून सुरवात करून पुन्हा शून्यापर्यंत जाण्याचं नाव आहे नाही का, आयुष्य म्हणजे! या दोन शून्यांच्या दरम्यान जे काही आहे, तेच तर आहे प्रत्येकाचं जगणं..मग हेच करतांना आपण माणसं किती घाई करतो..? एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता..हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना..? कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना..त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत? मला का नाही अमूक रंगाची फुलं येत? माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही? इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत? ते ना कधी कोणाशी तुलना करत,ना स्पर्धा करत. ते स्वतः जगते आणि दुसऱ्यांना जगायला मदत करते. आजूबाजूच्या सगळ्याशी स्वतःला जोडून घेते. आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाशी असलेलं नातं प्रत्येक झाडाला अंतर्यामी माहीत असतं. “माझ्या जगण्याचा हेतू काय?” असले प्रश्न त्याला कधीच पडत नसावेत. आपला प्रवास तन्मयतेने करणे, हेच असतं त्याचं जगणं. तो प्रवास करतांना मातीशी, तिच्यातल्या वेगवेगळ्या घटकांशी, कृमी-किटकांशी, हवेशी, वातावरणाशी, या प्रत्येकाशी जोडले गेलेले त्याचे जगण्याचे हेतू. म्हणजे झाडांचा प्रवास आतून बाहेर आहे आणि माणूस म्हणून आपला प्रवास बाहेरून स्वतःकडे जाणारा,स्व-केंद्रित! प्रत्येकाचे वेगळेपण स्वीकारत,सामावून घेत,जोडून घेत, देवाण-घेवाण करत एकमेकांशी पूरक होत जाणारं आहे यांचं आयुष्य आणि आपण मात्र ‘मी’,’माझं’,’माझ्यापुरतं’ बघून स्वतःला मर्यादित करत,चौकटीत बांधत जगत रहातो. आणि म्हणूनच याच निसर्गात राहूनही आपण त्याचाच एक भाग होऊ शकत नाही. सगळ्यांमध्ये असूनही ‘वेगळे’ आहोत. ते वेगळेपण मिरवणं आवडतं आपल्याला. कधीकधी तर ते सर्वश्रेष्ठही वाटतं! ही आपली वाटचाल नैसर्गिक नाही, निसर्गाशी पूरक नाही, जोडून घेणारी तर नाहीच नाही. विचार करायला हवा,नाही का? निसर्गापासून दूर जातांनाच आपण आपल्या विचार,भावना आणि वागण्यातला समतोल गमावून बसलो. निसर्गावर अतिक्रमण करून आपण यश,प्रसिद्धी,पैसा आणि लोकप्रियता तर मिळवली आणि आता मनस्वास्थ्य बिघडले आणि शरीरस्वास्थ्य बिघडले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या निरोगी, निरामय आणि सशक्त आयुष्य जगणे आणि इतरांना त्यासाठी मदत करणे, हे माझे ध्येय आहे असे असे आता मनापासून वाटते आहे. माझ्या विचारांमधला हा बदल काही माझी स्वतःची समज आहे? सर्वांगाने मनापासून वाढणाऱ्या या माझ्या लाडक्या छोट्याशा रोपट्याने सहज, कसलाही आव न आणता समजावलेले हे जगण्याचे गुपित आहे!<br />
<br />
© डॉ अंजली अनन्या<br />
# कॅलिडोस्कोप </div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-85135087623980546142019-09-11T17:01:00.000+05:302019-09-22T07:47:17.012+05:30एकरूप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0.0001pt; text-align: left;">
</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12pt; line-height: 107%;">पावसाच्या
थेंबानी अतोनात उमललेली</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12pt; line-height: 107%;">, <span lang="HI">फुललेली सृष्टी आजूबाजूला. सवयीच्या
</span>'<span lang="HI">मी</span>','<span lang="HI">माझं</span>' <span lang="HI">या
अस्तित्वखुणा मग हलकेच विरघळतात. मन स्वच्छ,निरभ्र होत जातं. विचार,भावना हळूहळू
निवायला लागतात. हिरव्या रंगाची जादू</span> <span lang="HI">मनावर गारुड करते.
हलके हलके वाहणाऱ्या वाऱ्यात शरीराचे भान कधी विसरते, कळत नाही. त्याचाच एक भाग
झालो की उलगडते एक अनोखे विश्व..विविध आकारांचे</span>,<span lang="HI"> नादांचे, रंगांचे</span>,<span lang="HI">वासांचे आणि स्पर्शाचे. जाणिवेचा अनोखा प्रवास सुरु होतो.</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12pt; line-height: 107%;"><span lang="HI"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">परस्परांत मिसळणारे, एकमेकांना पूरक असणारे
जग...डोंगर,नद्या,झरे,दगड,माती, कितीतरी वनस्पती,फुलं,झाडं,पक्षी आणि या सगळ्यांना
कवेत घेणारी असते आभाळाची सोबत.. चिमुकल्या रान फुलापानांचे</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,
<span lang="HI">कृमीकीटकांचे,प्राण्यांचे जगणे समजू लागते. बरोबर असलेलं कोणी
त्यांची नावं सांगत असतात..माझ्या काही ती फारशी लक्षात रहात नाहीत. त्यांच्या जगण्यातली
उर्जा मात्र मला स्पर्श करते. त्याचं असणं मला आश्वासक वाटतं. अंतर्मुख व्हायला
होते. दृष्टी विस्तारते. मातीच्या रंगाने आणि गंधाने मला वेढून घेतलेले असते.मातीच्या
कणाकणात फुलणारे जीवन बघितले की माती मला नदीसारखी ‘प्रवाही’ वाटते. जीवन उमलण्यातले
आणि विलीन होण्यातले सातत्य. या प्रवाहाशी आपलंही नातं आहे ना?</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span lang="HI"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;">
</span>डोंगरकड्यावरून आवेगाने झेपावणारे पाणी अवनीच्या कुशीत शिरते आणि ती
नखशिखांत बहरून जाते. कणाकणात प्रेम रुजतं. हिरव्यागार गवताची मृदू,मुलायम लोभस थरथर
मातीच्या रोमरोमात उमटते. जगण्याचा नुसता उत्सव सुरु असतो अवघ्या आसमंतात! निसर्गाचे
आर्जव मनात उमटणार नाही असे कसे होईल? जंगलवाटांची अतोनात ओढ लागते. आवेगाने
वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या गारव्याची, ओल्या वाऱ्याच्या मनमोकळ्या स्पर्शाची आस
लागते. मग पाय शोधत जातात कितीतरी अस्पर्शित निसर्गवाटा आणि मी समर्पित..त्या क्षणांना
संपूर्ण शरण जाते. <span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;">
</span>निसर्गातला प्रत्येक क्षण एक वेगळा अनुभव असतो. आपण केवळ साक्षी असतो. इथे काहीही
आपण बघण्यासाठी घडत नसतं. उघड्या डोळ्यांनी आणि मनाने आपण त्याचा भाग झालो की
आजूबाजूला असलेल्या कितीतरी गोष्टी दिसतात,जाणवतात. साद,प्रतिसादांची सृष्टीची भाषा
समजत जाते. आपल्या दृष्टीचा,मनाचा,जाणीवेचा परीघ आपोआप विशाल होतो..सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे आपण आनंद घ्यायला शिकतो, अनपेक्षित क्षणाचा अनुभव असा याचक होऊन
घेतल्यावर मग समजतं ‘घेणं’ किती सुंदर असू शकतं ना? </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सौंदर्याचं माप आपल्या ओंजळीत पडतांना त्यातल्या
चैतन्याचा असा काही लखलखीत स्पर्श आपल्याला होतो की त्यातल्या उर्जेने आपण
अंतर्बाह्य बदलून जातो. मनाचा डोह शांत</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">, <span lang="HI">तृप्त</span>,
<span lang="HI">समृद्ध होत जातो. जे माझ्यात आहे तेच या चराचरात सामावलंय या
अनुभूतीचा सहजभाव मनोमन उमगतो आणि मग जाणवते निसर्गाची लय माझ्याही अंतरंगात आहे. माझ्या
श्वासात आहे,रक्तातून वाहते आहे, या श्वासाने तर मी आजूबाजूच्या अनंताशी जोडलेली आहे
हे जाणवून कमालीचं मुक्त वाटतं आणि निसर्गनियमांशी असलेली जगण्याची बांधिलकी उमजत
जाते. विलक्षण आहे हे वाटणं! तृप्त,कृतार्थ..आयुष्याबद्दल,प्रवाहाबद्दल आणि सहज
वाहण्याबद्दल कमालीचा आपलेपणा वाटतो.</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span lang="HI"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">परवा अशाच एका वाटेवर कसलीतरी अनामिक ओढ वाटून
पावलं रेंगाळली. <span style="mso-spacerun: yes;"> </span>पक्षांची नादमधुर किलबिल,
झाडांच्या पानांचा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणारा आवाज यातूनही अगदी जवळ असलेल्या
झाडीत हलचाल जाणवली. एक देखणा मोर समोर. आपल्याच नादात मग्न. त्याच्यापासून थोड्या
अंतरावर जराशा मोकळ्या जागेत गेलो. आता आम्ही त्याच्यापासून दहा बारा पावलं दूर.
निसर्गाने कसली किमया केलीये ना त्याला बनवून? मानेवरचा निळा रंग, डोक्यावरचा सुंदर
तुरा आणि काळेभोर डोळे. असं वाटलं तो आणखी पुढे येणार नाही, पण तो आमच्या दिशेने हळूहळू
चालत पुढे आला आणि तिथेच असलेल्या एका उंच खडकावर बसला. आता त्याचा पिसारापण दिसत
होता. त्याने आम्हाला नक्कीच बघितलं. प्राणी,पक्षी धोका लगेच ओळखतात. शक्यतो
माणसांपासून दूर राहतात. त्याला आम्ही काही करणार नाही हा विश्वास वाटला असावा. किती
विलक्षण सुंदर होता तो! क्षणभरच त्याचा उमललेला पिसारा बघण्याची इच्छा मनात उमटली.
आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात आम्हाला तो अद्भुत क्षण अनुभवता आला. आपला लावण्यपिसारा
फुलवून तो त्याचा तो मोहक नाच! प्रियेची आराधना,तिला घातलेली साद..पापणीही न हलवता
ते सुंदर क्षण आम्ही वेचत होतो. निसर्गाचा तो चमत्कार नजरेसमोर साक्षात साकार होत
होता. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVj3EQj42yTH2b1hsCtgxNXC0vc8pdGpRW4f4hlLlZVN41Rh6SWepnzI7aG2uVZG7feHoyN1mDM25WsXGGTUthsYdOpUD1VMfN5SsCXcJzHTsjKT2BVMbqWJHJbAnkcyZVXF6malzmrps/s1600/6.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="958" data-original-width="1224" height="500" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVj3EQj42yTH2b1hsCtgxNXC0vc8pdGpRW4f4hlLlZVN41Rh6SWepnzI7aG2uVZG7feHoyN1mDM25WsXGGTUthsYdOpUD1VMfN5SsCXcJzHTsjKT2BVMbqWJHJbAnkcyZVXF6malzmrps/s640/6.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">निसर्गातला प्रत्येक क्षण वेगळा आणि काहीतरी
देणारा असतो. आमचं त्या नेमक्या क्षणाला तिथे असणं त्याने सहजतेने स्वीकारलं आणि त्या
सुंदर क्षणांचं दान घेऊन मन नतमस्तक झालं. पाच-सहा मिनटात पिसारा मिटवून तो नुसताच
इकडे-तिकडे फिरत होता. त्याला तसं बघणंही विलोभनीय होतं. ते जग त्याचं होतं,
त्याच्या विविध अदा बघतांना आमचं मन भरणार नव्हतंच. आम्ही तिघे ओल्या जमिनीवर सरळ मांडी
घालून बसलो होतो. </span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzSkrwC1B86tu3cjJR7KrGfBqCIK7qTb9JrOBWaE6BkwRMTvAMhQubkctYiqXKKqJrbeU-QynWCsWjK_XR3Qwk4os6hyphenhyphen2oaxPDqXFo-tZZMPTois-9PEZKkTCcPAnIAcBGGyFNgAQILZc/s1600/7.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="826" data-original-width="1080" height="488" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzSkrwC1B86tu3cjJR7KrGfBqCIK7qTb9JrOBWaE6BkwRMTvAMhQubkctYiqXKKqJrbeU-QynWCsWjK_XR3Qwk4os6hyphenhyphen2oaxPDqXFo-tZZMPTois-9PEZKkTCcPAnIAcBGGyFNgAQILZc/s640/7.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आता निघूया असं एकमेकांना खुणावलं तितक्यात त्याने पुन्हा एकवार प्रियेला
साद घातली आणि निमिषार्धात पुन्हा एकदा पिसारा संपूर्ण फुलवून त्याची पावलं
थिरकायला लागली. हा क्षण अगदीच अनपेक्षित होता. ते अप्रतिम दृश्य, ती वेळ..निसर्ग
मुक्तहस्ते सुंदर क्षण देत होता! लांडोर नक्की झाडीत असणार आणि त्याचा नाच बघत
असणार. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचं असं रोमरोम <span style="mso-spacerun: yes;"> </span>फुलूवून नाचणं,खरंच कमाल वाटली. डोळे भरून त्याला
मनात साठवलं आणि त्याची प्रणयसाधना परिपूर्ण होऊ दे,अशी मनात इच्छा करून त्याचा
निरोप घेतला.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मन भावविभोर झालं होतं. ही भावसमाधी मोडूच
नये,असं वाटत होतं. आज मिळालेलं निसर्गाचं हे दान इतकं परिपूर्ण होतं की चराचराबद्दल,आयुष्याबद्दल
कृतज्ञतेने मन भरून आलं..आंतरिक आनंदाची लय निसर्गाशी जोडलेली असण्यातल्या अनुभवात
‘माणूस’ असण्यातला अहंकार कधीच विलीन होऊन गेला.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">©<span lang="HI"> डॉ अंजली अनन्या </span></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"># <span lang="HI">कॅलिडोस्कोप</span></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">(फोटो सौजन्य :सतीश कुलकर्णी )</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghc-8FCpWRsTxJNBrInRY1rz3w3uuwiCCP4IoCxd_CgBlzGjSgdiTxZYzc0cx5g47Dxg5v33rh-7v8PtXGnMBzcFVqKtQy6tFyydncLraPtCMge5wiOCBbrvxpKyFjOIZ1zHBYAzNWjs4/s1600/8.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1026" data-original-width="936" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghc-8FCpWRsTxJNBrInRY1rz3w3uuwiCCP4IoCxd_CgBlzGjSgdiTxZYzc0cx5g47Dxg5v33rh-7v8PtXGnMBzcFVqKtQy6tFyydncLraPtCMge5wiOCBbrvxpKyFjOIZ1zHBYAzNWjs4/s640/8.jpg" width="583" /></a></div>
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span><br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span><span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisDNBB3aUw0fVfzFKNVeARcPcBANl8LmmgeaO1Dft_WEFKuewWWK7WUiFy0qhHRXO1tVpgHiB9VtiLBvmd24UKKkG-Q5lHrY2255m0SBGm62Nikzd9B7nsIlZkVDs8HF60vcX9jGhZwyg/s1600/3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="854" data-original-width="936" height="364" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisDNBB3aUw0fVfzFKNVeARcPcBANl8LmmgeaO1Dft_WEFKuewWWK7WUiFy0qhHRXO1tVpgHiB9VtiLBvmd24UKKkG-Q5lHrY2255m0SBGm62Nikzd9B7nsIlZkVDs8HF60vcX9jGhZwyg/s400/3.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<br />
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-91524557574065125222019-08-13T11:47:00.003+05:302019-08-13T11:48:19.996+05:30समतोल<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">“मला जराही मोकळा
श्वास घ्यायला वेळ नाही मिळालाय ग! सतत काहीतरी मानेवर असतंच. एक पूर्ण होत नाही
तोवर दुसरं काहीतरी तातडीने करायलाच हवं असं समोर असतं..असं वाटतंय मी कुठल्या
रेसमध्ये आहे आणि जीवाच्या आकांताने नाही पळाले तर सगळं जग माझ्या पुढे निघून जाईल
आणि मी मागेच..सगळ्यांच्या मागे! जगाच्या मागे! मला तर कल्पनाही नाही सहन होतेय..”</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">धरित्री कसनुसा चेहरा
करत म्हणाली. एकीकडे आईच्या हातचा गरम गरम पराठा ती उभ्यानेच भराभरा खात होती.
अद्वैतला आजीकडे नीट राहण्याबद्दल आणि शाळेतल्या कुठल्याशा स्पर्धेबद्दल ती काहीबाही
सांगत होती. अरुणा तिच्याकडे बघत राहिली. एका कॉफरन्ससाठी ती निघाली होती. आपल्या
कर्तुत्ववान मुलीचा अभिमान वाटायला हवा की तिला क्षणाचीही उसंत नाही म्हणून खंत,याची
चुटपूट नेहमीप्रमाणे अरुणाच्या मनात उमटली. आपल्या विश्वात ती खुश आहे,अशी
स्वतःच्या मनाची समजूत घालणारी अरुणा आपल्या मुलीचं बोलणं ऐकून,चेहरा बघून आतून
हलून गेली. तिच्याशी काही बोलण्याचे,काही नाही तर तिला नुसतेच जवळ घेण्याचेही घाईघाईत
राहून गेले,अर्धवट खाऊन आणि बोलून धरित्री निघूनही गेली होती.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">अभ्यासात,
वागण्या-बोलण्यात हुशार असलेल्या धरित्रीकडून नेहमी सगळ्या गोष्टी परफेक्ट
असण्याचीच अपेक्षा होती. अनेक विषयात तिचं नैपुण्य वाखाणण्याजोगे होते, जी गोष्ट
आत्मसात करायला इतर कोणाला सहा महिने लागतील ती गोष्ट धरित्री अगदी लीलया करे. लहान
वयापासून मिळालेल्या अशा कौतुकाने, अपेक्षांनी तिचाही स्वभाव तसाच बनत गेला,जणू
काही एकाचवेळी अनेक गोष्टी तिने नाही साध्य केल्या तर त्यात तिचा कमीपणा आहे. बाबांनीही
धरित्रीला सतत प्रोत्साहन दिले. तिला लागणारी प्रत्येक गोष्ट जागच्याजागी
देण्यासाठी ते तत्पर असत. अभ्यास असो नाहीतर इतर गोष्टी,कोणत्यावेळी काय करायचं
याचं दोघांचं वेळापत्रक तयार असे. बाकी घरातल्या सगळ्यांनी त्यांचा विचार करूनच आपपले
कार्यक्रम आखायचे. घरातले सणवार, नातेवाईक, लग्नकार्ये या कशातच तिला फार रमता येत
नसे,तितका वेळच नसे. सात वर्षांनी तिच्यापेक्षा लहान असलेल्या धनंजयबरोबर काय
खेळायचे हा तिला प्रश्न पडे. समवयस्क सोबत तिला नव्हती,मित्र-मैत्रिणी
शाळेपुरत्या, मोजक्याच होत्या. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">हौस,मजा,हट्ट,वेड्यासारखं
वागणं,भांडणं,रडणं,रुसून बसणं..हे तिच्या गावीही नव्हतं. तिच्या गरजा निर्माण
होण्यापूर्वीच त्या तत्परतेने पुरवल्या जात असत. घरात बाबा तिच्यासाठी आणि आई
धनंजयसाठी हे जणू अलिखितपणे ठरूनच गेलेले होते. तिचं संपूर्ण शिक्षण,उच्चपदस्थ
नोकरी,लग्न, नवरा आणि तिला झालेला मुलगा सगळं आयुष्यच आखीवरेखीव, ठरवल्यासारखं. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">सगळं असं असूनही माझी
मुलगी ‘सुखी’ आहे का ? असे आपले अरुणालाच सतत वाटत राही त्यात धरित्रीच्या बोलण्यामुळे
अरुणा आणखीनच काळजीत पडली.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">पण त्यानंतर तीन दिवसांनी
धरित्री घरी परतली, ती जणू कोणी दुसरीच व्यक्ती आहे,अशी. पहिल्यांदा तिने
स्वतःच्या घरी परतायची कसलीही घाई केली नाही. अरुणाला म्हणाली, “अगं जातांना
आमच्या विमानाने टेक ऑफ केलं आणि जरा वेळ होतोय तोवर विमानात एकदम गडबड सुरु झाली.
प्रवाशांपैकी एका बाईच्या लक्षात आलं की तिचं बाळ खालीच एअरपोर्टवर राहून
गेलंय..तिने जी रडारड सुरु केली..खूप गोंधळ झाला. नेमकं काय झालंय समजल्यावर कोणालाच
काही सुचेना. एअरहोस्टेसने तिला धीर दिला,बाकीच्या प्रवाशांनीपण. पायलटने खूप
फोनाफोनी करून मग<span style="mso-spacerun: yes;"> </span>शेवटी विमान पुन्हा माघारी
वळवलं. बाळापर्यंत पोहोचेपर्यंत आणि विमान पुन्हा निघेपर्यंत तासभर वेळ गेला,सगळ्यांचाच.
पण कोणीही काही म्हणालं नाही. एका आईला आपलं बाळ सुखरूप परत मिळालं,यातच सगळ्यांनी
समाधान मानलं.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">“काय आई म्हणावं की
काय म्हणावं या बाईला? असं कसं आई आपलं बाळ घ्यायचं साफ विसरू शकते?” अरुणाच्याच
छातीतच धस्स झालं सगळं ऐकून...</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">“हो ना, अगं अगदी हाच
प्रश्न तिथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आला असेल पण कोणीही तिला असं काही म्हणून
आणखी खजील केलं नाही. ती विसरली इतकंच खरं..का? कशी? या प्रश्नांना त्या क्षणी
महत्त्व नव्हतंच. सिक्यूरिटी चेक झाल्यावर तिने गाढ झोपलेल्या बाळाला
बेबीसीटरमध्ये ठेवलं आणि लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेली आणि त्याच नादात विमानात
बसली असावी..आणि अगं, ते गोडुलं बाळ.. नंतर त्याला विमानात घेऊन आले,तरीही
झोपलेलंच होतं,तितकंच गाढ..आपली आई आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही या
विश्वासाने..</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjISi6zqum8SG2Tc7IrSlqNkkfGb77Wv_k8i5APzxQOcANr2qS8B5C9XBZa3lYn0nWqYTA2NU8RZ8H6KXOvPCaQKGnxM0b6Y5VxO1wzYXkNsWYJ874TrHcHS4hJnlJ0ywIBjqjZ7pr_1ec/s1600/download.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="183" data-original-width="275" height="425" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjISi6zqum8SG2Tc7IrSlqNkkfGb77Wv_k8i5APzxQOcANr2qS8B5C9XBZa3lYn0nWqYTA2NU8RZ8H6KXOvPCaQKGnxM0b6Y5VxO1wzYXkNsWYJ874TrHcHS4hJnlJ0ywIBjqjZ7pr_1ec/s640/download.jpg" width="640" /></a></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आम्ही नाही का आदिला
शाळेतून आणायचं एकदा विसरून गेलो होतो..शाळा लवकर सुटणार आहे,हे ना माझ्या लक्षात राहिलं,ना
अनीलच्या..तोच प्रसंग आठवला मला.. आदि सात वर्षांचा होता, शाळा सुटून सगळे घरी
गेले तरी आपल्याला घ्यायला कोणी कसं आलं नाही, म्हणून रडवेला झाला होता. तुला
माहितीये? त्यानंतर त्याला ती सवय लागली, झोपतांना माझा गाऊन जवळ घेऊन झोपायची. मी
जवळ असो किंवा नसो,त्याला तो लागायचाच,अजूनही लागतो. या प्रसंगाचं त्यावेळी इतकं
काही मला वाटलं नव्हतं पण विमानातल्या या अनुभवाने मीच हादरून गेले. माझं नंतर
कशातच लक्ष नाही लागलं. कधी परत येते असं झालं मला.<span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">“<span lang="MR">आई, ‘जगण्यासाठी
काम’ की ‘कामासाठी जगणं’ या प्रश्नाचं उत्तरच मिळालं बघ मला. गेले काही दिवस ना,
मन अस्वस्थ होतं माझं, आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत रहायचं. इतरांनी हेवा करावा
असं आयुष्य आहे माझं. माझ्यासमोर एकापेक्षा अनेक चांगल्या संधी आल्या सतत. त्यातलं
एक स्वतःसाठी निवडून मी शांत नसायचे,मला सगळंच हवं असायचं. आणि मग ते मिळवण्यासाठी
जीवाचा आटापिटा. माझा ‘वेळ’ कायम माझ्यापुढे धावायचा. आणि मी सगळं जमवण्यासाठी
सगळ्यात आधी तडजोड करायचे ते स्वतःशीच. वेळ नाही ना,मग झोप कमी. वेळ जातो म्हणून
कोणी मैत्रिणी नाहीत. इतक्या आवडीने बंगला बांधला, सजवला..पण त्यात राहण्याचं सुख
अनुभवण्यासाठी मीच घरी नाही. आदिचं बाळपण तर माझ्या हातून निसटलंच आहे..आणि इतकं
करून मी जे मिळवलं, त्यातलं सुख अनुभवण्यासाठीसुद्धा थोड्यावेळपण थांबायची तयारी
नाही माझी. आपलं बाळ विसारणाऱ्या त्या आईमध्ये आणि माझ्यात काय फरक आहे मग? तिला
काहीही म्हणण्याचा आणि नावं ठेवण्याचा मला काही अधिकार नाही. अगं, समोर असलेल्या
क्षणात मी जागेवर नसतेच,माझं मन कायम भविष्यकाळात. असं धावून मला समजलं की आपण
कुठेच पोहोचत नाही. यश मिळवण्याची आणि पुढे जाण्याची मर्यादा नाही समजून घेतली तर
तेसुद्धा एक व्यसनच आहे, आपलं विश्व पोखरण्याची क्षमता असलेलं. जगाच्या मागे
राहण्याची मला भीती वाटायची.. आता वाटतंय ‘मी’ आहे म्हणून ‘माझं जग’ आहे. जगाच्या
पुढे जाण्यात माझी जिवलग माणसं दिसेनाशी झाली,त्याचं काय? </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">त्या निरागस बाळाचा
आश्वस्त चेहरा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला..अगदी लख्ख समजलं मला काय नेमकं
हवंय ते! आईला वेळ नाही म्हणून तिच्या गाऊनकडून ऊब,सुरक्षितता,आश्वासन मिळवणारा
माझ्या आदिला आज,आत्ता,या क्षणातली ‘आई’ हवी आहे..आणि मला हवा आहे समतोल. जगण्यची
लय सांभाळणारा. मी एकाचवेळी अनेक नाही मिळवलं तरी चालेल पण एकातला आनंद पुरेपूर
उपभोगायला शिकवणारा..मला स्थैर्य देणारा. मला थोडं थांबायची,उसंत घेण्याची गरज
आहे. माझी कोणाशीच स्पर्धा नाही, हे शहाणपण ज्या क्षणांनी दिलं ते क्षण नीट समजून
घेण्याची गरज आहे. हा अनुभव आपल्या लेकीला ‘माणूस’म्हणून समृद्ध करून गेलाय, हे
अरुणाच्या लक्षात आलं. पंखात बळ आहे म्हणून आकाशात भरारी घेणाऱ्या तिच्या पिल्लाला
उडण्यासाठी आता निश्चित दिशा सापडली होती. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">©</span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> डॉ अनन्या अंजली </span></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"># <span lang="MR">कॅलिडोस्कोप</span></span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p>फोटो सौजन्य गुगल </o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-5237481282042099142019-07-11T15:48:00.002+05:302019-08-13T11:50:33.797+05:30काही लिहावे स्वतःसाठी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<b><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 14.0pt; line-height: 107%;">काही लिहावे
स्वतःसाठी!</span></b><b><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 14.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></b></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कित्येकदा मनात असंख्य
विचार असतात. काय करावं,सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे
घडायला नको आहे असे वाटते,तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते,राग आलेला
असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही. परिस्थितीवर
आपला काहीही कंट्रोल नाही,हे कधीतरी लक्षात येते. अगतिक,अस्वस्थ,अस्थीर वाटत असते.
कोणाशी काहीही बोलावेसे वाटत नाही. एकटे रहावेसे वाटते आणि एकटेपणा मिळाला की तो असह्यही
होतो. अनुभवतो ना असे काहीतरी आपणही? </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मनात खोलवर जाणवणारी
भावना नेमकी काय आहे, हे आपल्या लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी मनात येणाऱ्या
विचारांची फक्त दखल घ्या. ते विचार मनात येण्यासाठी काही कारण घडलेय का,आठवा. बरं प्रत्येकवेळी
काही घडलेलेच असते,असे काही नाही, कधी ‘काही वाईट घडेल का’ या मनातल्या आशंकेमुळेसुद्धा
मन अस्वस्थ झालेले असू शकते. यावेळी एका गोष्टीची नक्की मदत होऊ शकते, ती म्हणजे <b>एकांतात
मनातले सगळे विचार एका कागदावर लिहून काढण्याची.</b> जे काही आणि ज्या स्वरूपात
मनात येते आहे,ते सगळे सरळ लिहून काढा. हे आपण इतर कोणासाठीही नाही फक्त स्वतःसाठीच
लिहितो आहोत,म्हणून भाषा,अक्षर,शैली, कोणी बघेल का,वाचेल का, यापैकी कशाचाच विचार
न करता फक्त लिहायला सुरवात करा. कोणताही आडपडदा नाही,कोणाची रोकठोक नाही. लक्षात
घ्या, हे स्वतःच स्वत:शी मोकळेपणानं बोलणं आहे. असे केल्याने आपले विचार नेमके काय
आहेत याची आपल्यालाच कल्पना येते. मनाला कशाचं वाईट वाटलंय,त्रास होतोय,काय नकोय,
काय हवंय यापाठीमागे नेमकी कोणती भावना जाणवते आहे,याचा उलगडा होण्याची शक्यता
जास्त असते. अनेकवेळा स्वतःला वाटणाऱ्या खऱ्या भावना वेगळ्याच असतात आणि त्या लपवून
ठेऊन आपण वरवर दुसरंच काहीतरी ओढूनताणून वागत असतो. आपले खरे वाटणे इतर कोणाला
समजले,तर ते आपल्याला काय म्हणतील? याची भीती वाटत असते. म्हणून अनेकवेळा आपण
प्रत्यक्ष जसे आहोत तसे न वागता खोटं खोटं वागत असतो आणि सगळं काही कसं चांगलं
चाललं आहे,असं इतरांना,स्वतःलाही भासवत असतो. यातली ओढाताण,ताण अस्वस्थता निर्माण
करतो.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मनातले विचार लिहिण्याची
मदत आपल्याला अनेक प्रकारे होऊ शकते. ज्या कोणत्या प्रसंगांबद्दल,त्यातल्या
व्यक्ती आणि समस्यांबद्दल,स्वतःच्या भावनांबद्दल आपण विचार करत असतो,लिहिण्याने ती
परिस्थिती अधिक नेमकेपणाने समजण्याची शक्यता असते.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div style="border: solid windowtext 1.0pt; mso-border-alt: solid windowtext .5pt; mso-element: para-border-div; padding: 1.0pt 4.0pt 1.0pt 4.0pt;">
<div class="MsoNormal" style="border: none; mso-border-alt: solid windowtext .5pt; mso-border-between: .5pt solid windowtext; mso-padding-alt: 1.0pt 4.0pt 1.0pt 4.0pt; mso-padding-between: 1.0pt; padding: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">नैराश्य आणि
भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या केलेल्या मानसशात्रीय अभ्यासानुसार त्यांनी
त्यांच्या विचार आणि भावना लिहून व्यक्त करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.
लिहिण्यामुळे अव्यक्त नकारात्मक भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते.मनातली खळबळ
कागदावर लिहून झाल्यावर तो कागद फाडून,अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकून द्या,असे
रुग्णांना सुचवले जाते. यातून त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी होते,असा अनुभव
आहे. </span><span style="font-family: "blackadder itc"; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
</div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">मनात येणारे विचार आणि
त्यापाठीमागे जाणवणारी भावना समजल्यानंतर आपल्यासमोर असलेली परिस्थिती, प्रश्न
सोडवण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा काही उपयोग होणार आहे की त्यामुळे
त्रास आणखी वाढतो आहे, हे समजते. स्वतःच्या विचारांची, मतांची अधिक स्पष्टता येते.
आपले किंवा आपल्याबाबतीत इतरांचे काही गैरसमज झालेले असतील तर लिहिण्याने ते लक्षात
येऊ शकतात. त्यामागचे आपले,इतरांचे दृष्टीकोन काय आहेत, हे समजते.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgy2J1Wswgqq1IotPAUQnT9AMU1P_WJkjZsHgoRkjnmkOrwVTviLu2iGUgXFNlDVrTqDmLjlDYxK6Rbtu7aEte6-GjQcaA5BlSwnLrRkTbO0Hbb0XxcDbDDffyJKkYqZ9ap7_aRkvpWTxc/s1600/56837256_2493232980689098_3011010741533671424_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="175" data-original-width="288" height="242" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgy2J1Wswgqq1IotPAUQnT9AMU1P_WJkjZsHgoRkjnmkOrwVTviLu2iGUgXFNlDVrTqDmLjlDYxK6Rbtu7aEte6-GjQcaA5BlSwnLrRkTbO0Hbb0XxcDbDDffyJKkYqZ9ap7_aRkvpWTxc/s400/56837256_2493232980689098_3011010741533671424_n.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आपल्याप्रमाणे इतरांनादेखील
काय वाटत असेल,त्यांचे काय म्हणणे आहे,याचा अंदाज येऊ शकतो आणि आपण शांतपणे प्रसंगाचा
विचार करण्याची शक्यता वाढते. आपले विचार तपासून बघू शकतो, त्यातल्या भावनेचा
स्वीकार करून ती व्यक्त करण्याचा दुसरा काही पर्याय असू शकतो का याचाही विचार करू
शकतो. लिहितांना नकारात्मक विचारांचा,भावनांचा पहिला प्रवाह जोरात व्यक्त होऊन
गेला की मनावरचा ताण कमी होतो आणि आपण ‘वाटण्यापासून’ सावरतो. मग बुद्धीतला विवेक,समज
जागा होऊन मेंदूला अधिक तर्कसंगत, नवीन
आणि वेगवेगळे पर्याय सुचण्याची शक्यता असते. कारण लिहितांना आपले मन, बुद्धी आणि
शरीर लिहिण्याच्या कृतीतून एकमेकांशी जोडले जाते. मनाला,शरीराला जाणवणाऱ्या
भावनांची दखल आपली बुद्धी घेऊ शकते. हेच आहे स्वतःला समजून घेणे,स्वतःशी जोडले जाणे.
आपल्या विचारांशी आणि भावनांशी असे जोडले जाणे म्हणजेच आलेल्या प्रसंगामाधल्या
अनुभवांमधून स्वतःची मानसिक,भावनिक आणि वैचारिक वाढ करत माणूस म्हणून समृद्ध होत
जाण्याचा प्रवास आहे.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">लिहिण्यातून आपली स्वप्नं,
आकांक्षा, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा नेमक्या काय आहेत,हे लक्षात येते. त्यासाठी
बाह्य परिस्थितीत काही अडथळे, आव्हाने आहेत का? असतील तर ते काय आहेत, याची
स्पष्टता येते. त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडे काय आहे? याचा शोध घेण्यासाठी मन
तयार होते. माझ्या क्षमता आणि माझ्यात असलेल्या कमतरता, उणिवा काय आहेत</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">,<span lang="MR"> हेही लक्षात येते. आपल्या आपल्याला त्या अगदी
नीट माहीत असतात. योग्य प्रयत्नांनी आणि इच्छाशक्तीने आपण त्या बदलवूसुद्धा शकतो.
पण हे मान्य करण्याऐवजी त्या टाळण्याकडे,नाकारण्याकडे, बहुतेकांची शक्ती खर्च
होते. स्वतःला आपण आहोत तसे स्वीकारणे, भल्याभल्यांनादेखील जमत नाही. मग आपल्यात
जे नाही ते दाखवण्याकडे,उगीचच आव आणण्याकडे आणि ज्ञानाचे,परिस्थितीचे,शहाणपणाचे
ढोंग इतरांना दाखवण्यात आयुष्यातला वेळ निघून जातो. काहींच्या मनात असुरक्षितता,भीती
असते म्हणून आत्मविश्वास कमी पडतो. त्या भीतीवर मात करण्याचे पर्याय आपल्याजवळ असतात.
आपल्याकडे जे कमी असेल ते मिळवण्याचे मार्ग शोधले तर सापडतात. हाच असतो आपण स्वतःचा
आपण जसे असू, तसा केलेला स्वीकार.( स्वतःचा आहे तसा स्वीकार करायचा,म्हणजे नेमके
काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर) </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">तो एकदा जमला की
स्वतःकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते.स्वप्नांकडे जातांना काय टाळायचे आणि
कशाकडे लक्ष केंद्रित करायचे हेही समजते.आपली उर्जा योग्य दिशेने वळवता येते.
आत्मविश्वास हळूहळू वाढतो. नातेसंबंध, परिस्थिती यांच्याकडे स्वीकाराच्या जाणत्या कोनातून
बघता येते.</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">स्वतःसाठी लिहिण्यातून
भूतकाळातील अनुभावांकडून आपण काय शिकलो, काय शिकायला हवे होते,हे समजते. वारंवार
त्याच त्या चुका मग शक्यतो होत नाहीत. वर्तमानात येणाऱ्या अनुभवांकडे आपली दृष्टी शहाणी,समंजस
होते. मानसिक,शारीरिक अभिव्यक्ती मोकळी,व्यापक आणि आरोग्यपूर्ण होऊ शकते. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">त्रासदायक
अनुभवांबद्दल लिहावे, हे जितके खरे तितकेच आपल्या आनंददायक अनुभवांबद्दलसुद्धा आपण
लिहायला हवे. असे केल्याने सकारात्मक भावनांचासुद्धा योग्य आदर आणि स्वीकार आपल्या
पूर्ण क्षमतेनुसार आपण करू शकतो. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhojlaHqHYul40iXh66OMfUMfYqZcbn9HcqEWh06N6gArPsDF_oN2qrBt9argJw7_cBVwqa_MiQHYW2Bo1IypIMg60_otus3oYXnBX2-cIA3RS4A25Q5VGsV5YSEup6Q0FljUbCnPeOIm8/s1600/56485680_2493233134022416_7142140978109874176_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="587" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhojlaHqHYul40iXh66OMfUMfYqZcbn9HcqEWh06N6gArPsDF_oN2qrBt9argJw7_cBVwqa_MiQHYW2Bo1IypIMg60_otus3oYXnBX2-cIA3RS4A25Q5VGsV5YSEup6Q0FljUbCnPeOIm8/s640/56485680_2493233134022416_7142140978109874176_n.jpg" width="391" /></a></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">अनुभव असा आहे की
आपल्याला आयुष्यात येणाऱ्या त्रासदायक,दु:खदायक अनुभवांचा आपल्यावर होणारा मानसिक,भावनिक
परिणाम हा जास्त तीव्र असतो. कोणाचे जिव्हारी लागलेले शब्द, केलेला अपमान, त्यातून
झालेला मनस्ताप कितीही वर्षांपूवी आयुष्यात या गोष्टी घडलेल्या असतील तरी त्या
अगदी काल घडल्या आहेत असे आपल्याला वाटावे,इतक्या ताज्या असतात मनात.कारण असे
प्रसंग एकदाच घडले तरी त्यानंतर ते आठवणींमधून सतत चघळत राहून आपणच ते वारंवार
जगतो आणि त्यांची तीव्रता आणखी वाढवतो. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">आयुष्यातले आनंदाचे,सुखाचे,
सकारात्मक भावनेचा अनुभव देणारे क्षण कितीतरी असतात पण ते मात्र आपण गृहीत धरतो
आणि किती सहजपणे विसरून जातो. खरंतर त्या सुंदर आठवणींना वारंवार उजाळा द्यायला
काय हरकत आहे? आपल्या प्रत्येकाकडे अशा जपून ठेवलेल्या सुखद अनमोल आठवणींचा खजिना
नक्कीच आहे, तो जाणीवपूर्वक उघडला की आजही आपले मन प्रसन्नतेने न्हाऊन निघते.
डोळ्यात वेगळीच चमक येते. मनात,शरीरात असलेली आनंदाची उर्जा आपल्याला जगण्याचे बळ
देते. आयुष्य सुंदर आहे,असे नक्की वाटते. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">कोणी दुसरा आपल्यासाठी
काही चांगले करेल, याची वाट आपण का बघायची? आपल्याचकडे असलेल्या या सुंदर क्षणांकडे
दुर्लक्ष करायचे आणि वेदनांचे,पराभवाचे,अपमानाचे,नकोश्या क्षणाचे दु:ख मात्र वारंवार
‘इंधन’ पुरवून मनात जागते ठेवायचे? आणखी दु:खी होत राहायचे? असे स्वतःच स्वतःचे
शत्रू होऊन का जगतो आपण? लक्षात येतंय का तुमच्या? कोणी दुसरा काय वाईट करेल आपले?
आपणच आपले वाईट करण्याचा चॉइस वेळोवेळी निवडतोय, त्याचे काय?</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">इथूनपुढे अशी शेखचिल्ली
मानसिकता नकोच आपल्याला. आपण चांगल्या आठवणीना उजाळा देऊ, सुखाचे,समाधानाचे क्षण
वेचू, आयुष्याबद्दल कृतज्ञ असू तर जगण्यातली अशी संजीवक शक्ती आपल्याला नक्की
आनंदी, समाधानी बनवेल. </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><br /></span></div>
<span lang="HI" style="font-family: "mangal" , serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"></span><br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><span style="font-family: "calibri" , sans-serif; font-size: 20pt;">©</span>डॉ.अनन्या अंजली</span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"># मनोविकास</span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="EN-US" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;">mindmattersaa@gmail.com</span><span lang="MR" style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"> </span><span style="font-family: "nirmala ui" , sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%;"><o:p></o:p></span></div>
<br /></div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2810134443467287838.post-16721034171491695152019-03-31T15:17:00.002+05:302019-03-31T15:17:50.238+05:30मन मुकाट मोकाट<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<b><span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मन मुकाट,मोकाट.. </span></b><b><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></b></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">अनेकवेळा आपण स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरवात करते. त्यात भूतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">,<span lang="MR">काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध. उलट-सुलट, सुसूत्र –विस्कळित, उपयोगी-निरुपयोगी, हवेसे-नकोसे विचार कोणत्याही क्रमाने मनात सतत एकापाठोपाठ येत असतात. असे सतत बडबडणारे मन सोबत घेऊनच आपण दिवसांचा प्रवास करत असतो. हे नुसतेच विचार असले असते तर ठीक आहे, पण मनात येणाऱ्या या विचारांच्या पाठोपाठ मनात त्याप्रमाणे भावना तयार होतात आणि त्या भावनांच्या प्रमाणे आपली मानसिकता बदलत जाते. जोपर्यंत याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यात काही बदल करावा, हे आपल्या लक्षातही येत नाही. बरं ‘त्रास’ कशाला म्हणायचं, हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. कारण प्रत्येकाची त्रास सहन करण्याची सीमा वेगवेगळी असू शकते. म्हणून अनेक व्यक्तींना आपल्या मनात येणारे असे विचार अनावश्यक आहेत,हे लक्षातही येत नाही. जर या मनातल्या विचारांचा आपल्या दैनंदिन वागण्या-बोलण्यावर विपरित परिणाम होत असेल तर अशा लोकांचे बदललेले वागणे आणि बोलणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या सहज लक्षात येते. या लोकांना मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मदतीची गरज असते. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्यापैकी अनेकजण आज या मानसिक अतिविचारांच्या चौकटींमध्ये कमीजास्त प्रमाणात अडकलेले आहेत. मनावर आलेला ताण प्रत्यक्ष व्यवहारात बाजूला ठेवणे ज्यांना शक्य होते, त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळितपणे पार पडतांना दिसतात पण काहींना यासाठी वेगळी एनर्जी द्यावी लागते, हेदेखील खरे आहे. म्हणजे प्रत्यक्ष मनोविकारांपासून आपण लांब असलो तरी मनावर सतत असणारा ताण आपल्याही जगण्याची गुणवत्ता कमीअधिक प्रमाणात हिरावून घेतोच आहे. </span><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मन म्हटलं की विचार येणारच, सगळ्यांच्याच येतात. पण येणारे विचार आपल्याला उपयुक्त आहेत की नाहीत हे कसे ओळखायचे? </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzA-QGty3ysLd194L08FSnnczLNypeZPLEEn1AAKITiTdT9eZdhRdgs84e52CO3Aaa_YuHTqZWqUa7Lp6C813axxf_iZUQGzQhjxHXfw2TiJVfMPS4WolRJuNYWWa4FoqTgo2LdNogTjg/s1600/1_basr8iGFNi6HSf_d2fMhzg.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="425" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzA-QGty3ysLd194L08FSnnczLNypeZPLEEn1AAKITiTdT9eZdhRdgs84e52CO3Aaa_YuHTqZWqUa7Lp6C813axxf_iZUQGzQhjxHXfw2TiJVfMPS4WolRJuNYWWa4FoqTgo2LdNogTjg/s640/1_basr8iGFNi6HSf_d2fMhzg.jpeg" width="640" /></a></div>
<span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span><br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">नुकताच घडलेला एक प्रसंग सांगते, दुसऱ्या दिवशी बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर म्हणून सगळी तयारी करून संज्ञा आधीच्या रात्री नेहमीपेक्षा लवकर झोपली. त्यांच्या घरापासून परीक्षेचे सेंटर जवळ असल्यामुळे सकाळी 9 वाजता घरून निघाले तरी चालणार होते. ती आठ वाजताच तयार होऊन बसली. पेपरचा सगळा अभ्यास व्यवस्थित झाला होता. सहज बसल्या बसल्या तिच्या मनात विचार आला, “सगळा अभ्यास तर झालाय माझा,पण नक्की हेच पुस्तक होते ना अभ्यासाला? की नेमके यावर्षी ते बदलले आणि मला समजलेच नाही?” हा विचार मनात आला आणि तिला काही सुचेना. तिचे हातपाय कापायला लागले. अंग घामाने भरून गेलं. चेहरा पांढराफटक पडला आणि ओठ थरथरायला लागले. आई जवळच होती. तिच्या ते लक्षात आले. तिला परीक्षेचे टेन्शन आलेय,हे आईला समजले. आईने तिला धीर दिला. आपल्या मनात आलेल्या विचारांवर ती आणखी विचार करायला लागली. “कसं शक्य आहे? मला काही वर्षभर ते समजणार नाही?” दुसरं मन लगेच म्हणालं,” का शक्य नाही? तुझं सगळं लक्ष तर ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्याकडे, कॉलेजला गेलीस कधी तू?” या सगळ्यात नऊ कधी वाजले आणि आई-बाबा तयार होऊन कधी आले तिला समजलं सुद्धा नाही. सगळे खाली उतरले तर नेमकी गाडीचं चाक पंक्चर. तिला<b> </b>तो<b> </b>अपशकून<b> </b>वाटला.<b> </b>बाबांनी<b> ‘</b>ओला’<b> </b>बोलावली<b> </b>आणि<b> </b>तिघे<b> </b>सेंटरकडे<b> </b>निघाले<b>,</b>तिचं<b> </b>मन अस्वस्थच होते. रस्त्यात दोनवेळा ट्रॅफिक जाम लागला तरी ते वेळेवर सेंटरपाशी पोहोचले आणि ती घाईघाईत क्लासरूमकडे निघाली. आई-बाबा काही म्हणतायेत हे पण तिच्या लक्षात आलं नाही. रायटिंग पॅड मागेच राहिला होता. पेपर मिळाला आणि तिच्या लक्षात आले की तिने जो अभ्यास केलाय त्याचेच प्रश्न आहेत. मग कुठे तिला एकदम हायसं वाटलं. पेपर तिच्यासाठी अवघड नव्हता पण तिला अक्षर काही चांगलं काढता आलं नाही. तिला अपेक्षित होता तसा,तिच्या मनासारखा पेपर लिहिता आला नाही.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">हे सगळं घडलं ते केवळ मनात आलेल्या त्या एका विचारामुळे. तिला प्रिलीम देता आलेली नव्हती. म्हणून तिच्या मनात या विचाराने घर केले. आपल्या मनातले विचार जवळच्या कोणालाही वेळेवर सांगणे तिला जमले नाही आणि साध्या अडचणी तिला अपशकून वाटल्या. यातल्या कोणत्याही विचारांची तिला प्रत्यक्षात मदत न होता त्रासच झाला.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मनात विचार येणे, आपल्या हातात नसते. पण त्या विचाराचे काय करायचे हे मात्र प्रत्येकवेळी आपल्याच हातात असते. आपला वेळ,दिवस, उर्जा आणि उत्पादकता यावर प्रभाव टाकणारे आणि ती वाया घालवणारे कोणतेही विचार आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त असू शकत नाहीत. अशा विचारांमुळे आपली मानसिकता बिघडत असेल तर ते विचार पुढे चालू ठेवण्यापेक्षा ताबडतोब ते मनातून काढून टाकणे जमायला हवे. हे म्हणणे सोपे आहे पण प्रत्यक्षात जमवायचे कसे? हे समजून घेण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की मनात येणारा कोणताही ‘विचार’ नेमका कसा असतो. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">“हिरव्यागार कुरणातून तो अनवाणी पायांनी चालला होता, थंडगार गवताचा तो स्पर्श त्याच्या अंगावर शहारा उमटवून गेला. भर दुपारची वेळ असूनही जंगल इतके दाट होते,की प्रकाशाचे किरण जमिनीपर्यंत पोहोचूच शकत नव्हते. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज आणि हिरव्यागार जंगलाचा वास..जवळून कुठूनतरी उंचावरून धों धों आवाज करत खाली झेपावणारा धबधब्याचा आवाज येत होता. त्या दिशेने त्याने हळूहळू सरकायला सुरवात केली. आपल्याच हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते,घसा कोरडा पडला होता..”</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">हे वाचलं की आपल्या मनात काहीतरी संवेदना निर्माण होतात. आपल्या पूर्वानुभवातून किंवा कल्पनेने डोळ्यासमोर प्रतिमा उभ्या राहतात. आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाटायला लागते. हे सगळे तर आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवत नसतो तरी त्या जंगलाचा दाटपणा आपल्याला जाणवतो, त्याची प्रतिमा मनात तयार होते कारण केवळ शब्द वाचून मनात जे विचार आले ते प्रत्येकाच्या आपापल्या पूर्वअनुभवातून किंवा कल्पनेतून आलेले असतात. कोणाला त्याला जोडून आणखी काहीदेखील आठवू शकतं. विचार म्हणजे मनात नुसतेच शब्द येत नाहीत तर काही दृश्य प्रतिमा आणि आवाज, स्पर्श,वास यांचाही अनुभव येतो. म्हणजेच विचारांना एक ‘रचना’ असते.</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मनाला त्रास देणारे विचार येत असतील तर ते नुसतेच नाहीत,त्याबरोबरीने आणखी काय काय आहे,हे बघायला हवे. भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या माझ्या एका पेशंटला स्वतःच्याच मृत्यूची चित्रं डोळ्यासमोर दिसत असत. स्वतःच्या मरणाचा हा संपूर्ण मूव्ही अचानक मनात सुरु झाला की त्याची भीतीने गाळण उडत असे. कोणी कितीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी भीती काही कमी होत नसे. नेमकं होतं काय, हे त्याचे त्यालाही समजत नसे. या भीतीतून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत करतांना त्याच्या मनातल्या या सगळ्या घडामोडींची दखल घ्यावी लागली. त्या विचारांचे नेमके करायचे काय हे त्याला समजल्यावर त्याचा आजार आटोक्यात यायला वेळ लागला नाही. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">मनातल्या विचारांमधून संवेदना,भावना निर्माण होतात आणि एक अनुभव तयार होतो, त्यातून मनाची सध्या आहे ती अवस्था बदलते. विचारांच्या,अनुभवांच्या तीव्रतेनुसार ती त्रासदायक असू शकते किंवा आनंददायक ठरते. </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">आपल्या प्रत्येकाच्या विचारांचा एक स्वयंचलित मोड असतो, सततच्या सरावाने,सवयीने विचार त्याच ठराविक दिशेने किंवा पद्धतीने केले जातात. आपल्या सगळ्यांकडेच एक जागृत मन असते आणि एक (किंवा एकापेक्षा जास्तदेखील) सुप्त मन असते. जागृत मन आपल्यासोबत वर्तमानातल्या अनुभवात असते. परंतु सुप्त मन हे संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ते आलेल्या अनुभवांचा लगेच अर्थ लावायला सुरवात करते. अनुभवाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचायची त्याला घाई असते. अनुभवांना, त्यातल्या व्यक्तींना लेबल लावायची घाई असते. त्याने जोपासलेल्या,वाढवलेल्या धरणांपैकी एका साच्यात एकदाचा तो अनुभव बसवण्याची घाई असते. यातून आपल्या मनाचे विचारांचे पॅटर्न,सवयी ठरतात. आपल्या जागृत आणि सुप्त मनाच्या मध्ये एक ‘पॉझ बटण’ आहे. म्हणून इथूनपुढे मनात कोणताही विचार आला तरी त्या पॉझपाशी जरा वेळ थांबायचे आहे. मनात येणारा विचार मला मदत करतो आहे की माझी मनस्थिती आणखी बिघडवतो आहे, हे तपासण्यासाठी हा क्षणभराचा पॉझ पुरे आहे. तुम्हीदेखील या पॉझपाशी जरावेळ थांबून वेध घ्या, आत्ता या क्षणी तुमचे मन नेमका कोणता विचार करते आहे?</span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">डॉ. अनन्या अंजली </span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="EN-US" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-ansi-language: EN-US; mso-bidi-language: MR;">mindmatteraa@gmail.com<o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"># मनोविकास </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;">(फोटो सौजन्य गुगल) </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"> </span><span style="font-family: "Nirmala UI",sans-serif; font-size: 12.0pt; line-height: 107%; mso-bidi-language: MR;"><o:p></o:p></span></div>
<br />
<div class="MsoNormal">
<br /></div>
</div>
ananyaahttp://www.blogger.com/profile/09780307147650468083noreply@blogger.com0