सोमवार, ८ डिसेंबर, २०१४



अनुनभवी नजरेला
खुणावतो आसमंत चारही दिशांनी अन्
कुतूहल झेप घेते सर्वांगाने तेव्हा
खरंतर अधांतरीच असते अस्तित्व कल्पनेचे
आधारासाठी धरलेली नाजूक बोटांची पकड
सुटली तर?
होतोच ना कासावीस जीव 
तान्हुलंपण जपण्यासाठी
झुकणारा तोल सावरण्यासाठी?
जाणती, अश्वासक सोबत

हवीशी वाटणं

हाच तर निसर्ग आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा